शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

दार उघडा... साहेब! कालव्याचे दार उघडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:22 IST

पंढरपूर : तिसंगी- सोनके तलावाचे कालवा गेट नादुरुस्त झाल्याने वाखरी, गादेगाव, उपरी, भंडीशेगावसह नऊ गावांतील उभी पिके धोक्यात आली ...

पंढरपूर : तिसंगी- सोनके तलावाचे कालवा गेट नादुरुस्त झाल्याने वाखरी, गादेगाव, उपरी, भंडीशेगावसह नऊ गावांतील उभी पिके धोक्यात आली आहेत. कालव्याचे दार काढा, साहेब! कालव्याचे दार... असे म्हणण्याची वेळ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर आली आहे. दोन दिवसांत दार काढून पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. रबी व उन्हाळी हंगामात तिसंगी तलावातून दरवर्षी तीन पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात येते. यंदा रबी हंगामासाठीची पाणीपाळी सोडण्याचे नियोजन करण्यात येत असताना काही समाजकंटकांनी कालवा गेटच्या ठिकाणी खडीसह इतर घाण टाकल्याने दार काढता आले नाही. गेले दोन-तीन दिवस प्रयत्न करूनही दार न निघाल्याने आता वरिष्ठ पातळीवरून अभियांत्रिकीची यंत्रणा मागविण्यात येत असल्याचे उपविभागीय अभियंता नागेंद्र ताटे यांनी सांगितले.

तिसंगी तलाव यंदा शंभर टक्के भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, मका यासह ऊस, डाळिंब, अशी बागायती पिके घेतली आहेत. तलावाच्या पाण्याचा गादेगाव, वाखरी, उपरी, भंडीशेगाव, शेळवे, शिरढोण, खेडभाळवणी आदी गावांना फायदा होतो. तलावात पाणी असताना शेतातील उभी पिके करपून चालल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. यामुळे तलावाचे कालवा दार तात्काळ काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

नादुरुस्त दारामुळे पाणी सोडण्यास अडचण

कालव्याचे दार नादुरुस्त झाल्याने रबी हंगामासाठीचे पाणी सोडण्यास अडचणी येत आहेत. यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. गेले दोन-तीन दिवस पाणबुडीच्या साहाय्याने दार काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अद्याप दार निघालेले नाही. लवकरच अभियांत्रिकीची टीम बोलविण्यात येणार असून, त्यांच्याकडून दार काढण्यात येईल, अशी माहिती शाखा अभियंता अभिजित म्हात्रे यांनी दिली.

---

तिसंगी तलावातून पाणीपाळी सुरू असताना अचानक दार बंद करण्याचे, तसेच तलावाच्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होतो. त्याला तात्काळ आळा घालण्यात यावा. तलावाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. उभी पिके वाचवण्यासाठी तात्काळ कालव्याचे दार काढून पाणी सुरू करावे; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन छेडले.

-तानाजी बागल,

जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना