शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

दीड महिन्यात केवळ ८४० दस्तनोंदणी; २५ लाख रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:27 IST

राज्य शासनाने १२ जुलैपासून राज्यात तुकडेबंदी कायदा लागू केला आहे. त्यामुळे गुंठेवारीची दस्त नोंदणी बंद झाली आहे. त्याचप्रमाणे तहसील ...

राज्य शासनाने १२ जुलैपासून राज्यात तुकडेबंदी कायदा लागू केला आहे. त्यामुळे गुंठेवारीची दस्त नोंदणी बंद झाली आहे. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयातून केलेल्या लेआऊटला जर नगर रचना विभागाची मान्यता नसेल तर अशा ठिकाणचेसुद्धा दस्तऐवज नोंदणीसाठी येत नाहीत. त्यामुळे मंगळवेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी अत्यंत संथगतीने सुरू आहे.

हा आदेश लागू होण्यापूर्वी मंगळवेढा दुय्यम निबंधक कार्यालयात १ जून ते १५ जुलै या दीड महिन्यात ८९० दस्त नोंदणी झाल्या होत्या. यामधून १ कोटी ३० लाख २४ हजार रुपये, तर जुलै १६ ते ३१ ऑगस्टपर्यंत ८४० दस्तनोंदणीतून १ कोटी ५ लाख रुपये महसूल जमा झाला होता. मात्र, या दस्त नोंदणीत डीसीसी बँकेचे गहाणखत व उजनी कॅनॉल जमीन संपादितचे जवळपास २३० दस्त असून, यातून २२ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे डीसीसी व उजनी कॅनॉलचे दस्त व त्यातून मिळालेला महसूल वगळता गुंठेवारी बंदी कायद्याचा एकूण महसुलावर मोठा परिणाम जाणवत आहे. यापूर्वी १ लाख रुपयांच्या कर्जाला डीसीसी बँक गहाणखत घेत नव्हते. मात्र, सध्या गहाणखत घेण्याची संख्या वाढली आहे.

यांना झाला पश्चात्ताप

मंगळवेढा शहरात प्लॉटच्या ले-आऊटला तहसीलदारांची ४२ ब ची परवानगी घेऊन बहुतांशी प्लॉट विक्री केले. मात्र, आता शिल्लक राहिलेल्या प्लॉटची विक्री कशी करावी याबाबत विक्रीदार व खरेदीदार यांचा मनस्ताप वाढला आहे.

----

असा आहे गुंठेवारी बंदीचा आदेश

जमिनीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने जमिनीचे तुकडे मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे धारण जमिनीचे तुकडे पाडण्यासाठी प्रतिबंध केला असून, कलम ८ ब नुसार सुधारणा केली आहे. यामध्ये बागायती शेती ही एक एकर त्याच गटातील शेतकरी घेऊ किंवा विक्री करू शकतो.

मात्र, २ एकर क्षेत्र घेण्यासाठी कोणताही शेतकरी पात्र होऊ शकतो, तर कोरडवाहू शेतीला २ एकरची मर्यादा दिली आहे. याशिवाय तहसीलदारांनी दिलेले ले आऊटचे परवाने आता संपुष्टात आले आहेत. आता गुंठेवारी ले आऊटला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. शासन निर्णय आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक मुंबई यांच्या निर्देशानुसार कामकाज सुरू आहे, अशी माहिती दुय्यम निबंधक शंकरराव सांगळे यांनी दिली.

-----

१२ जुलैपासून तुकडेबंदी कायदा लागू झाला आहे. त्यामुळे गुंठेवारी दस्त नोंदणी बंद झाली आहे. दिवसभरात जी दस्त नोंदणी होते त्यामध्ये गहाणखताची नोंदणी जास्त आहे. सध्या पीक कर्ज, उजनी कॅनॉल व इतर कर्जासाठी गहाणखत मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, इतर दस्त नोंदणी मंदावली आहे.

- शंकरराव सांगळे, दुय्यम निबंधक मंगळवेढा

-----

मंगळवेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.