शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दीड महिन्यात केवळ ८४० दस्तनोंदणी; २५ लाख रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:27 IST

राज्य शासनाने १२ जुलैपासून राज्यात तुकडेबंदी कायदा लागू केला आहे. त्यामुळे गुंठेवारीची दस्त नोंदणी बंद झाली आहे. त्याचप्रमाणे तहसील ...

राज्य शासनाने १२ जुलैपासून राज्यात तुकडेबंदी कायदा लागू केला आहे. त्यामुळे गुंठेवारीची दस्त नोंदणी बंद झाली आहे. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयातून केलेल्या लेआऊटला जर नगर रचना विभागाची मान्यता नसेल तर अशा ठिकाणचेसुद्धा दस्तऐवज नोंदणीसाठी येत नाहीत. त्यामुळे मंगळवेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी अत्यंत संथगतीने सुरू आहे.

हा आदेश लागू होण्यापूर्वी मंगळवेढा दुय्यम निबंधक कार्यालयात १ जून ते १५ जुलै या दीड महिन्यात ८९० दस्त नोंदणी झाल्या होत्या. यामधून १ कोटी ३० लाख २४ हजार रुपये, तर जुलै १६ ते ३१ ऑगस्टपर्यंत ८४० दस्तनोंदणीतून १ कोटी ५ लाख रुपये महसूल जमा झाला होता. मात्र, या दस्त नोंदणीत डीसीसी बँकेचे गहाणखत व उजनी कॅनॉल जमीन संपादितचे जवळपास २३० दस्त असून, यातून २२ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे डीसीसी व उजनी कॅनॉलचे दस्त व त्यातून मिळालेला महसूल वगळता गुंठेवारी बंदी कायद्याचा एकूण महसुलावर मोठा परिणाम जाणवत आहे. यापूर्वी १ लाख रुपयांच्या कर्जाला डीसीसी बँक गहाणखत घेत नव्हते. मात्र, सध्या गहाणखत घेण्याची संख्या वाढली आहे.

यांना झाला पश्चात्ताप

मंगळवेढा शहरात प्लॉटच्या ले-आऊटला तहसीलदारांची ४२ ब ची परवानगी घेऊन बहुतांशी प्लॉट विक्री केले. मात्र, आता शिल्लक राहिलेल्या प्लॉटची विक्री कशी करावी याबाबत विक्रीदार व खरेदीदार यांचा मनस्ताप वाढला आहे.

----

असा आहे गुंठेवारी बंदीचा आदेश

जमिनीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने जमिनीचे तुकडे मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे धारण जमिनीचे तुकडे पाडण्यासाठी प्रतिबंध केला असून, कलम ८ ब नुसार सुधारणा केली आहे. यामध्ये बागायती शेती ही एक एकर त्याच गटातील शेतकरी घेऊ किंवा विक्री करू शकतो.

मात्र, २ एकर क्षेत्र घेण्यासाठी कोणताही शेतकरी पात्र होऊ शकतो, तर कोरडवाहू शेतीला २ एकरची मर्यादा दिली आहे. याशिवाय तहसीलदारांनी दिलेले ले आऊटचे परवाने आता संपुष्टात आले आहेत. आता गुंठेवारी ले आऊटला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. शासन निर्णय आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक मुंबई यांच्या निर्देशानुसार कामकाज सुरू आहे, अशी माहिती दुय्यम निबंधक शंकरराव सांगळे यांनी दिली.

-----

१२ जुलैपासून तुकडेबंदी कायदा लागू झाला आहे. त्यामुळे गुंठेवारी दस्त नोंदणी बंद झाली आहे. दिवसभरात जी दस्त नोंदणी होते त्यामध्ये गहाणखताची नोंदणी जास्त आहे. सध्या पीक कर्ज, उजनी कॅनॉल व इतर कर्जासाठी गहाणखत मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, इतर दस्त नोंदणी मंदावली आहे.

- शंकरराव सांगळे, दुय्यम निबंधक मंगळवेढा

-----

मंगळवेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.