शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एक वर्ष झाले तरी ‘कोरोना’चे भूत कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:23 IST

२२ मार्च २०२० रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लोकांना घरातच राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र ...

२२ मार्च २०२० रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लोकांना घरातच राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करताना भारतात लॉकडाऊनची घोषणा केली. घराघरात लोकांना टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल फोनवरून लागलीच माहिती मिळाली. पुढच्या २१ दिवसांची तजवीज करण्यासाठी दुकानांबाहेर गर्दी करून लोकांनी साठाही करून घेतला.

या देशातला एक वर्ग लॉकडाऊन झाला, पण हातावर पोट असणारा या देशातील मोठा वर्ग आपोआप रस्त्यावर आला. शासनाने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर नागरिकांची भंबेरी उडाली होती. चौकाचौकात तसेच ग्रामीण भागात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात होती. तसेच अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत होती. त्यादिवशी अनेक व्यक्तींवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.

अचानक लागलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते. मोठ्या शहरातून रोजगारासाठी गेलेल्यांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे शेकडो लोक बेरोजगार झाले. बाहेरगावी असलेल्या मजुरांचे लोंढे ग्रामीण भागातून परतू लागले. सार्वजनिक वाहतूक नसल्याने अनेक लोक आपापल्या गावी पायी चालत परतू लागले, हे चित्र पहायला मिळाले होते. त्यामुळे अक्षरश: सर्व व्यवहार ठप्प होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद होते. तेव्हापासून आजही कोरोनाचे भूत कायम आहे. एक वर्ष झाले तरी अद्याप कोरोनाची साखळी तोडण्यास शासन-प्रशासनाला यश आले नाही आणि त्यासंदर्भात नागरिकांनी गांभीर्यही घेतले नाही. यापुढेही कोरोनाशी दोन हात करून जगावे लागणार आहे.