शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नगर परिषद व नगर पंचायतीसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST

माळशिरस तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी १० वाजता अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्राम पंचायतीच्या ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला आरंभ केला. ...

माळशिरस तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी १० वाजता अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्राम पंचायतीच्या ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला आरंभ केला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, सभापती शोभा साठे, उपसभापती प्रताप पाटील, झेडपीचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील, झेडपी सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, भाजपचे सोपानराव नारनवर, बाळासाहेब सरगर, झेडपी सदस्या सुनंदा फुले, पं.स. सदस्या हसिना शेख, हेमलता चांडोले, अनिसा तांबोळी, शिवसेनेचे दत्ता पवार, आण्णा कुलकर्णी, आरपीआय(अ)चे नंदकुमार केंगार, किरण धाईंजे, अजित मोरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोमनाथ भोसले, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, मुख्तार कोरबू यांच्यासह व्यापारी, विधिज्ञ उपस्थित होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक राजकारण करीत आहे. या सरकारने २२ तारखेपर्यंत आपला निर्णय जाहीर केला नाही तर २२ जूनपासून अकलूज येथे साखळी उपोषण करू, असे भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले. अकलूज-माळेवाडीची लोकसंख्या ही ४५ हजार झाली आहे, तर नातेपुते ग्राम पंचायतीची लोकसंख्या १८ हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे विकासाला अडचण येते. नगर परिषदेत रूपांतर झाले तर मोठ्या प्रमाणात निधी येईल व नागरी सुविधा देता येतील, असे शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

शासनाने दुजाभाव केला

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज-माळेवाडी ग्राम पंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर व्हावे म्हणून शासनाला ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये, तर नातेपुते ग्राम पंचायतीने २८ जून २०१८ मध्ये शासनाकडे प्रस्ताव सादर केला. शासनस्तरावर चौकशी होऊन सदरचे प्रकरण अंतिम टप्प्यात असल्याचे नगर विकास मंत्रालयाने १६ डिसेंबर २०२० रोजी निवडणूक आयोगास कळविले व ग्राम पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली. परंतु, शासनाने दुजाभाव केला, असे आ. राम सातपुते यांनी सांगितले.