शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नगर परिषद व नगर पंचायतीसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST

माळशिरस तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी १० वाजता अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्राम पंचायतीच्या ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला आरंभ केला. ...

माळशिरस तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी १० वाजता अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्राम पंचायतीच्या ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला आरंभ केला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, सभापती शोभा साठे, उपसभापती प्रताप पाटील, झेडपीचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील, झेडपी सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, भाजपचे सोपानराव नारनवर, बाळासाहेब सरगर, झेडपी सदस्या सुनंदा फुले, पं.स. सदस्या हसिना शेख, हेमलता चांडोले, अनिसा तांबोळी, शिवसेनेचे दत्ता पवार, आण्णा कुलकर्णी, आरपीआय(अ)चे नंदकुमार केंगार, किरण धाईंजे, अजित मोरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोमनाथ भोसले, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, मुख्तार कोरबू यांच्यासह व्यापारी, विधिज्ञ उपस्थित होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक राजकारण करीत आहे. या सरकारने २२ तारखेपर्यंत आपला निर्णय जाहीर केला नाही तर २२ जूनपासून अकलूज येथे साखळी उपोषण करू, असे भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले. अकलूज-माळेवाडीची लोकसंख्या ही ४५ हजार झाली आहे, तर नातेपुते ग्राम पंचायतीची लोकसंख्या १८ हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे विकासाला अडचण येते. नगर परिषदेत रूपांतर झाले तर मोठ्या प्रमाणात निधी येईल व नागरी सुविधा देता येतील, असे शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

शासनाने दुजाभाव केला

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज-माळेवाडी ग्राम पंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर व्हावे म्हणून शासनाला ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये, तर नातेपुते ग्राम पंचायतीने २८ जून २०१८ मध्ये शासनाकडे प्रस्ताव सादर केला. शासनस्तरावर चौकशी होऊन सदरचे प्रकरण अंतिम टप्प्यात असल्याचे नगर विकास मंत्रालयाने १६ डिसेंबर २०२० रोजी निवडणूक आयोगास कळविले व ग्राम पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली. परंतु, शासनाने दुजाभाव केला, असे आ. राम सातपुते यांनी सांगितले.