शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

नगर परिषद व नगर पंचायतीसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST

माळशिरस तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी १० वाजता अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्राम पंचायतीच्या ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला आरंभ केला. ...

माळशिरस तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी १० वाजता अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्राम पंचायतीच्या ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला आरंभ केला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, सभापती शोभा साठे, उपसभापती प्रताप पाटील, झेडपीचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील, झेडपी सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, भाजपचे सोपानराव नारनवर, बाळासाहेब सरगर, झेडपी सदस्या सुनंदा फुले, पं.स. सदस्या हसिना शेख, हेमलता चांडोले, अनिसा तांबोळी, शिवसेनेचे दत्ता पवार, आण्णा कुलकर्णी, आरपीआय(अ)चे नंदकुमार केंगार, किरण धाईंजे, अजित मोरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोमनाथ भोसले, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, मुख्तार कोरबू यांच्यासह व्यापारी, विधिज्ञ उपस्थित होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक राजकारण करीत आहे. या सरकारने २२ तारखेपर्यंत आपला निर्णय जाहीर केला नाही तर २२ जूनपासून अकलूज येथे साखळी उपोषण करू, असे भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले. अकलूज-माळेवाडीची लोकसंख्या ही ४५ हजार झाली आहे, तर नातेपुते ग्राम पंचायतीची लोकसंख्या १८ हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे विकासाला अडचण येते. नगर परिषदेत रूपांतर झाले तर मोठ्या प्रमाणात निधी येईल व नागरी सुविधा देता येतील, असे शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

शासनाने दुजाभाव केला

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज-माळेवाडी ग्राम पंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर व्हावे म्हणून शासनाला ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये, तर नातेपुते ग्राम पंचायतीने २८ जून २०१८ मध्ये शासनाकडे प्रस्ताव सादर केला. शासनस्तरावर चौकशी होऊन सदरचे प्रकरण अंतिम टप्प्यात असल्याचे नगर विकास मंत्रालयाने १६ डिसेंबर २०२० रोजी निवडणूक आयोगास कळविले व ग्राम पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली. परंतु, शासनाने दुजाभाव केला, असे आ. राम सातपुते यांनी सांगितले.