शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

विवाहितेच्या छळाचे दीड वर्षात १९० गुन्हे

By admin | Updated: July 23, 2014 00:46 IST

दुभंगलेली मने एकत्र : १७१८ अर्जांपैकी ९४१ मध्ये तडजोड

 सोलापूर: विवाह सोहळ्यात पती-पत्नी शेवटपर्यंत साथ देण्याची शपथ घेत असतात. काही जणांच्या बाबतीत संसारात खीळ बसते. या ना त्या कारणांमुळे पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होतात. हे मतभेद अगदी टोकाला गेल्यानंतर पोलिसांचाही नाईलाज होतो. अखेर ४९८ (अ) अन्वये गुन्हे दाखल करावे लागतात. २०१३ आणि १ जानेवारी ते ३० जून २०१४ म्हणजे दीड वर्षामध्ये पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या स्टेशन डायरीवर प्रकाश टाकला असता १९० गुन्ह्यांची नोंद झाली. दरम्यान, दोन्ही विभागात कार्यरत असलेल्या महिला तक्रार निवारण केंद्रात दुभंगलेल्या पती-पत्नीचे मन एकत्र जोडण्याचे काम अगदी प्रामाणिकपणाने होत असते. शहर आणि ग्रामीणचा विचार करता १७१८ अर्जांपैकी ९४१ प्रकरणे तडजोडीने काढून पती-पत्नीच्या सुखी संसाराला वाट मोकळी करून दिली. पोलीस आयुक्तालयाच्या तक्रार निवारण केंद्रात गेल्या वर्षी ८५० अर्जांपैकी ४१६ जणांचे अर्ज तर चालू सहा महिन्यांमध्ये ३१३ पैकी ११३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. ग्रामीण पोलीस दलातील केंद्रात दीड वर्षामध्ये ५५५ अर्जांपैकी तडजोडीने २७८ प्रकरणे निकाली काढून एकमेकांपासून दूर गेलेल्या पती-पत्नीला एकत्र आणण्याचे काम झाले आहे. ----------------------------------------छळामागची कारणे चारित्र्य, कन्यारत्न, व्यसनी पतीहुंडाविरोधी कायदा असताना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. व्यसनी पतीचे घराकडे असणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे घर कसे चालणार ही चिंता ‘त्या’ पत्नीला असते. शेवटी दोघांमध्ये भांडणाला सुरुवात होते. कधी-कधी ही भांडणे इतक्या टोकाला पोहोचतात की त्यात पती पत्नीचा कधी घात करेल, याचा नेम नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पतीचा पत्नीवर चारित्र्याचा संशय. कधी-कधी तसा प्रकारही नसतो. चारित्र्याच्या संशयावरून अनेक विवाहितांचे मुडदे पडले आहेत. तिसरा प्रकार म्हणजे मुलीचा जन्म. स्त्री-भ्रूणहत्येच्या विरोधात जनजागरण मोहीम असतानाही स्त्री जन्माचे स्वागत करताना कोणी दिसत नाही. कन्यारत्न प्राप्त होणे ही एक विवाहितांच्या छळाचे प्रमुख कारण आहे. काहींचा अपवाद वगळता माहेर आणि सासरच्या मंडळींचे कधी पटतच नाही. माहेरची माणसं आली तर त्यांचे उत्साहाने स्वागत कधीच होत नाही. सासरच्या मंडळींमध्ये माहेरच्या माणसांचा हस्तक्षेपही छळाला कारण ठरू शकते. माहेरच्या मंडळींकडून सातत्याने पैशाची मागणी. ती मागणी पूर्ण झाली नाही तर विवाहितेच्या छळास कळत-नकळत प्रारंभ होतो. --------------------------------मुलीचा जन्म, चारित्र्याचा संशय, व्यसनी पती अन् माहेरच्या मंडळींच्या हस्तक्षेपामुळेच विवाहितांच्या छळाचे प्रमाण वाढल्याची आकडेवारी पाहता निदर्शनास येते. घरातील एक-दोघांचा छळ असताना संपूर्ण परिवारामधील सदस्यांना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागते. -----------------------------पतीविरुद्ध पत्नीची फिर्याद आली तर ती सहसा दाखल करून घेत नाही. महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार नोंदवल्यानंतर दोघांची मने एकत्र कशी येतील, त्यांच्या संसाराची घडी पुन्हा कशी बसेल, याचाच विचार पोलीस दल करीत असतो. -संदीप गुरमे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखापती-पत्नीमध्ये मतभेद येण्याचे खूप मोठे कारणही नसते. अगदी क्षुल्लक कारणावरून दोघे एकमेकांपासून लांब जातात. दोघांना एकत्र आणून त्यांच्यात सुसंवाद घडवला जातो. जर दोघे एकत्र येण्यास नकार देत असतील तरच गुन्हा दाखल करून घेतला जातो. -नितीन कौसडीकर, पोलीस निरीक्षक- गुन्हे शाखा (ग्रामीण)आमच्या कक्षेत दुरावलेल्या पती-पत्नींना एकत्र बोलावले जाते. त्यांच्यातील मतभेद दूर कसे होतील, यावर आमच्या विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याचा प्रयत्न असतो. जे-जे काही चांगले सांगता येईल, तेवढे सांगून दोघांना पुन्हा एकत्र कसे आणता येतील, यावरच आमचा भर असतो. जेव्हा दोघे एकत्र नांदतात, त्यातच आमचा आनंद आहे. -चंद्रकांत काकडे, पोलीस निरीक्षक- महिला अत्याचार