शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

अक्कलकोट तालुक्यातील अद्यापही दीड हजार शेतीपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST

यंदाच्या महापुराने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे आर्थिक चक्र बिघडून ठेवले आहे. अक्कलकोट तालुक्यात बोरी, हरणा, भीमा, सीना या ...

यंदाच्या महापुराने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे आर्थिक चक्र बिघडून ठेवले आहे. अक्कलकोट तालुक्यात बोरी, हरणा, भीमा, सीना या चारही नद्यांना महापूर येऊन गेला यामुळे त्या त्या परिसरातील काही ट्रान्स्फॉर्मर, खांब वाहून गेले. हजारो खांबे तुटून पडली आहेत. ते सर्व पूर्ववत करण्यासाठी शासनाने तत्काळ निधीही मंजूर केला. त्यानंतर तालुक्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. आतापर्यंत २ हजार ५०० खांबाचे काम पूर्ण झालेले आहेत. उर्वरित १०० खांबाचे काम सुरू आहे.

अद्याप मैंदर्गी, दुधनी, तडवळ, करजगी या भागातील कामे प्रलंबित आहेत. यामुळे या भागातील हजारो शेतकऱ्यांचे शेतीपंप पाणी असूनही बंद आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी, जनावरांचे हाल सुरू आहेत. काही शेतकऱ्यांनी आज,उद्या वीज सुरू होईल, अशी अपेक्षा ठेवून रब्बीतील गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली. तर काही शेतकरी वीज जोडणी झाल्यानंतर पेरणी करू हा उद्देश ठेवून वाट पाहत आहेत. परिणामी शेकडो हेक्टर क्षेत्र पेरणीविना तसेच आहे.

वीज जोडणी विलंब होण्याची कारणे

अजूनही काही भागात चिखल असल्यामुळे पोल घेऊन जाणारी वाहने जात नाहीत. सर्वत्र झाडेझुडपी वाढल्यामुळे घटनास्थळी जाऊन काम करणे जिकिरीचे बनले आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा आहे. तो कारखान्याला गेल्याशिवाय काम करणे अशक्य आहे. अशा विविध अडचणीमुळे आजही १५०० शेतकऱ्यांच्या शेतात वीज चालू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.

कोट :::::::::::

मागील एक महिन्यापेक्षा जास्त दिवसात शेकडो कर्मचारी काम करीत आहेत. महापुरात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही तब्बल २ हजार ५०० पेक्षा अधिक विजेचे खांब नव्याने उभारले आहेत. ज्या ठिकाणी जाणेच अशक्य आहे. तेथील काम रखडले आहे. लवकरच १०० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे.

- राजकुमार म्हेत्रे,

उपकार्यकारी अभियंता