शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट तालुक्यातील अद्यापही दीड हजार शेतीपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST

यंदाच्या महापुराने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे आर्थिक चक्र बिघडून ठेवले आहे. अक्कलकोट तालुक्यात बोरी, हरणा, भीमा, सीना या ...

यंदाच्या महापुराने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे आर्थिक चक्र बिघडून ठेवले आहे. अक्कलकोट तालुक्यात बोरी, हरणा, भीमा, सीना या चारही नद्यांना महापूर येऊन गेला यामुळे त्या त्या परिसरातील काही ट्रान्स्फॉर्मर, खांब वाहून गेले. हजारो खांबे तुटून पडली आहेत. ते सर्व पूर्ववत करण्यासाठी शासनाने तत्काळ निधीही मंजूर केला. त्यानंतर तालुक्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. आतापर्यंत २ हजार ५०० खांबाचे काम पूर्ण झालेले आहेत. उर्वरित १०० खांबाचे काम सुरू आहे.

अद्याप मैंदर्गी, दुधनी, तडवळ, करजगी या भागातील कामे प्रलंबित आहेत. यामुळे या भागातील हजारो शेतकऱ्यांचे शेतीपंप पाणी असूनही बंद आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी, जनावरांचे हाल सुरू आहेत. काही शेतकऱ्यांनी आज,उद्या वीज सुरू होईल, अशी अपेक्षा ठेवून रब्बीतील गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली. तर काही शेतकरी वीज जोडणी झाल्यानंतर पेरणी करू हा उद्देश ठेवून वाट पाहत आहेत. परिणामी शेकडो हेक्टर क्षेत्र पेरणीविना तसेच आहे.

वीज जोडणी विलंब होण्याची कारणे

अजूनही काही भागात चिखल असल्यामुळे पोल घेऊन जाणारी वाहने जात नाहीत. सर्वत्र झाडेझुडपी वाढल्यामुळे घटनास्थळी जाऊन काम करणे जिकिरीचे बनले आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा आहे. तो कारखान्याला गेल्याशिवाय काम करणे अशक्य आहे. अशा विविध अडचणीमुळे आजही १५०० शेतकऱ्यांच्या शेतात वीज चालू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.

कोट :::::::::::

मागील एक महिन्यापेक्षा जास्त दिवसात शेकडो कर्मचारी काम करीत आहेत. महापुरात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही तब्बल २ हजार ५०० पेक्षा अधिक विजेचे खांब नव्याने उभारले आहेत. ज्या ठिकाणी जाणेच अशक्य आहे. तेथील काम रखडले आहे. लवकरच १०० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे.

- राजकुमार म्हेत्रे,

उपकार्यकारी अभियंता