शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

ब्रिटिशकालीन दीड किमी बोगद्यातील गाळ काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:19 IST

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुलभरीत्या पाणी मिळावे यासाठी राजेवाडी-म्हसवड कालवा क्र. १ ते लक्ष्मीनगरपर्यंतच्या कालव्यातील झाडेझुडपे काढण्याचे नियोजन करण्यात आले ...

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुलभरीत्या पाणी मिळावे यासाठी राजेवाडी-म्हसवड कालवा क्र. १ ते लक्ष्मीनगरपर्यंतच्या कालव्यातील झाडेझुडपे काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे म्हसवड कालवा क्र. १ मध्ये अनेक ठिकाणी अस्तरीकरणाची दुरवस्था झाली आहे. राजेवाडी तलावापासून लक्ष्मीनगरपर्यंतच्या कालव्यात झाडेझुडपे, गवत वाढले आहे, तर ब्रिटिशकालीन दीड किमी राजेवाडी बोगद्यामध्ये गाळ साचल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली होती.

या पाण्याची वहनक्षमता वाढविण्यासाठी व राजेवाडी तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्याना रब्बी हंगामाचे पाणी सुलभरीत्या मिळावे म्हणून कालव्याची आवश्यक ती दुरुस्तीची कामे करावीत, यासंदर्भात पाटबंधारे अधिकाऱ्यांना आ. शहाजीबापू पाटील यांनी सूचना केल्या होत्या.

यावेळी नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता संजय बोडखे, उपविभागीय अभियंता नागेंद्र ताटी, शाखा अभियंता अभिमन्यू जाधव, पंचायत समिती सदस्य दादासाहेब लवटे, रवींद्र कदम, सुरेश कदम, प्रमोद हुबाले यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

कोट :::::::::::::

कालवा दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी तातडीने सुमारे एक कोटी ५० लाख रुपये खर्चाचे आपत्कालीन अंदाजपत्रक तयार केले. कालवा व बोगद्यातील गाळ काढून पाण्याचा प्रवाह वेगाने वाहण्यासाठी स्वच्छतेची कामे तत्काळ पूर्ण करावीत.

- ॲड. शहाजीबापू पाटील, आमदार, सांगोला

फोटो ओळ :::::::::::::::::

राजेवाडी - म्हसवड कालवा क्र. १ ब्रिटिशकालीन बोगद्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करताना आ. शहाजीबापू पाटील, पाटबंधारे अधिकारी, लाभधारक शेतकरी.