शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

पदाधिकारी तेच राहतील, बदलण्याचा प्रश्न नाही

By admin | Updated: July 7, 2014 00:45 IST

काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांचे धोरण

सोलापूर:विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सध्या अस्तित्वात असलेली कार्यकारिणी आणि तालुकाध्यक्ष कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी घेतला आहे़काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संतोष पाटील यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत़ पदभार घेताना दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मंगळवेढा तालुक्यातील अनेक नेते अनुपस्थित होते़ या पार्श्वभूमीवर संतोष पाटील यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत़ या भेटीतून विद्यमान पदाधिकाऱ्यांना अभय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे़बाळासाहेब शेळके यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे़ त्यांच्या जागी संतोष पाटील यांची निवड झाली असून, अन्य पदाधिकारी पदासह कायम राहतील, अशी भूमिका पाटील यांनी घेतली आहे़ जुन्या कार्यकारिणीत सर्व तालुक्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न झाला होता़ असमतोल असल्यास गरज असेल त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा नव्या कार्यकारिणीत समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व तालुकाध्यक्षांना सक्रिय करण्यात येईल, तत्पूर्वी त्यांना पदावर कायम ठेवण्याचा आणि पक्षाच्या वाढीसाठी मरगळ झटकून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे़ विद्यमान तालुकाध्यक्षांना हटवण्यासाठी आलेल्या राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़ ---------------------------------बार्शी, सांगोल्यात पोकळीबार्शी आणि सांगोला तालुक्यातील नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे़ त्यामुळे दोन्ही तालुक्यात पोकळी निर्माण झाली आहे़ आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी म्हणून दोन्ही तालुक्यात नव्याने संघटना बांधणीचे काम हाती घेणार आहे, असे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगितले़