शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शेतकऱ्यांनीच अडथळा निर्माण केल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

सोलापूर : उजनी धरणातून कुरुल शाखा कालव्याद्वारे मंद्रूप भागासाठी पाणी सोडण्यात आले होते. उर्ध्व भागातील शेतकऱ्यांनी दारे उघडल्यामुळे अडथळा ...

सोलापूर : उजनी धरणातून कुरुल शाखा कालव्याद्वारे मंद्रूप भागासाठी पाणी सोडण्यात आले होते. उर्ध्व भागातील शेतकऱ्यांनी दारे उघडल्यामुळे अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पाणी परिसरातील टेलएंडच्या शेतापर्यंत पोहोचू शकले नाही. यात जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांचा दोष नसल्याचा निर्वाळा भीमा विकास विभाग क्र २ चे कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांनी दिला आहे.

१२ मे पासून २३ मे दरम्यान गुंजेगाव, कंदलगाव, गावडेवाडी, येळेगाव, मंद्रूप परिसरातील शेतीसाठी कुरुल शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते, मात्र मायनर क्रमांक २४ च्या वरील फाट्याच्या शेतकऱ्यांनी लघु वितरिकेची दारे उघडझाप केल्याने पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला. आपण स्वतः साईटवर पूर्ण वेळ थांबून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याकामी पोलिसांची मदत घेतली तरीही त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही अशी खंत कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

जलसंपदा विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. प्रत्यक्ष साइटवर काम करणारे कर्मचारी कमी असताना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. कोरोनाच्या काळात माझ्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम केले. कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी कसोशीने प्रयत्न केले. तरीही शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी गेले नसेल तर तोकडी यंत्रणा आणि हेडच्या शेतकऱ्यांची असहकार्याची भूमिकाच त्याला कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले.

----