शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

शेतकऱ्यांनीच अडथळा निर्माण केल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

सोलापूर : उजनी धरणातून कुरुल शाखा कालव्याद्वारे मंद्रूप भागासाठी पाणी सोडण्यात आले होते. उर्ध्व भागातील शेतकऱ्यांनी दारे उघडल्यामुळे अडथळा ...

सोलापूर : उजनी धरणातून कुरुल शाखा कालव्याद्वारे मंद्रूप भागासाठी पाणी सोडण्यात आले होते. उर्ध्व भागातील शेतकऱ्यांनी दारे उघडल्यामुळे अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पाणी परिसरातील टेलएंडच्या शेतापर्यंत पोहोचू शकले नाही. यात जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांचा दोष नसल्याचा निर्वाळा भीमा विकास विभाग क्र २ चे कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांनी दिला आहे.

१२ मे पासून २३ मे दरम्यान गुंजेगाव, कंदलगाव, गावडेवाडी, येळेगाव, मंद्रूप परिसरातील शेतीसाठी कुरुल शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते, मात्र मायनर क्रमांक २४ च्या वरील फाट्याच्या शेतकऱ्यांनी लघु वितरिकेची दारे उघडझाप केल्याने पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला. आपण स्वतः साईटवर पूर्ण वेळ थांबून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याकामी पोलिसांची मदत घेतली तरीही त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही अशी खंत कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

जलसंपदा विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. प्रत्यक्ष साइटवर काम करणारे कर्मचारी कमी असताना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. कोरोनाच्या काळात माझ्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम केले. कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी कसोशीने प्रयत्न केले. तरीही शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी गेले नसेल तर तोकडी यंत्रणा आणि हेडच्या शेतकऱ्यांची असहकार्याची भूमिकाच त्याला कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले.

----