शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

शेतकऱ्यांनीच अडथळा निर्माण केल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

सोलापूर : उजनी धरणातून कुरुल शाखा कालव्याद्वारे मंद्रूप भागासाठी पाणी सोडण्यात आले होते. उर्ध्व भागातील शेतकऱ्यांनी दारे उघडल्यामुळे अडथळा ...

सोलापूर : उजनी धरणातून कुरुल शाखा कालव्याद्वारे मंद्रूप भागासाठी पाणी सोडण्यात आले होते. उर्ध्व भागातील शेतकऱ्यांनी दारे उघडल्यामुळे अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पाणी परिसरातील टेलएंडच्या शेतापर्यंत पोहोचू शकले नाही. यात जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांचा दोष नसल्याचा निर्वाळा भीमा विकास विभाग क्र २ चे कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांनी दिला आहे.

१२ मे पासून २३ मे दरम्यान गुंजेगाव, कंदलगाव, गावडेवाडी, येळेगाव, मंद्रूप परिसरातील शेतीसाठी कुरुल शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते, मात्र मायनर क्रमांक २४ च्या वरील फाट्याच्या शेतकऱ्यांनी लघु वितरिकेची दारे उघडझाप केल्याने पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला. आपण स्वतः साईटवर पूर्ण वेळ थांबून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याकामी पोलिसांची मदत घेतली तरीही त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही अशी खंत कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

जलसंपदा विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. प्रत्यक्ष साइटवर काम करणारे कर्मचारी कमी असताना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. कोरोनाच्या काळात माझ्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम केले. कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी कसोशीने प्रयत्न केले. तरीही शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी गेले नसेल तर तोकडी यंत्रणा आणि हेडच्या शेतकऱ्यांची असहकार्याची भूमिकाच त्याला कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले.

----