शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

टँकरची संख्या ७० वर

By admin | Updated: May 25, 2014 00:41 IST

सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाई : उपाययोजनांचा प्रभाव नाही

सोलापूर: अनेक वर्षांपासून पाणी अडविण्याची कामे मोठ्या प्रमाणावर होऊनही तसेच उजनी धरणाचे पाणी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सोडूनही सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई काही केल्या हटेना झाली आहे. ८४ गावे व ४०७ वाड्यांसाठी तब्बल ७० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात असले तरी दररोज टँकरची मागणी येतच आहे. सोलापूर जिल्ह्यावर दरवर्षीच पाणीटंचाईचे सावट येते. पाऊस चांगला पडला तरीही काही गावात तरी टँकर द्यावेच लागतात. टँकरमुक्त जिल्हा होण्यासाठी अनेक वेळा आराखडे तयार झाले व त्यानुसार कामेही झाली. अनेक ठिकाणच्या पाण्याच्या स्रोताच्या आधारे अनेक गावांसाठी स्वतंत्र व संयुक्त पाणीपुरवठा योजना राबल्या गेल्या. बोअर, विहिरीचा आधार घेत नवनव्या योजना राबवूनही काही गावे दरवर्षीच टँकरच्या पाण्यावर विसंबून राहतात. मागील दोन वर्षांत पाऊस कमी झाल्याने वाड्यावस्त्यांच्या नागरिकांना पाण्यासाठी टँकर दिले होते. दोन वर्षे पाण्याच्या टंचाईने त्रासून गेल्याने पाणी अडविण्याच्या कामात जनतेनेही झोकून दिले होते. जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या आवाहनानुसार तलाव व बंधार्‍यातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले होते. नाल्याच्या खोलीकरणाचा प्रयोग मागील वर्षी यशस्वी झाला होता. अनेक ठिकाणच्या नाल्याचा गाळ शासनाच्या पैशातून निघाला. सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही पाणी अडविण्यासाठीची कामे झाली होती. तरीही यावर्षी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. २० मेपर्यंत यंदा जिल्ह्यात ८४ गावे व ४०७ वाड्यांना ७० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर व माळशिरस वगळता अन्य तालुक्यात टँकर सुरू झाले आहेत. या संख्येत दररोज भर पडताना दिसत आहे.

-------------------------

एवढे पाणी जाते तरी कुठे ? उजनीसह शेजारच्या जिल्ह्यातील धरणाचे पाणी जिल्ह्यातील बर्‍याच गावांच्या परिसरातून उन्हाळ्यातही मिळत आहे. गावोगावी पाणी अडविण्याची कामेही मागील वर्षी झाली होती. सरत्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी अडल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. याशिवाय गाळ काढण्याची कामेही झाली होती; तरीही टँकरची मागणी येतच आहे.

------------------------------

जिल्हाधिकार्‍यांनी शोध घेतला तर..? ज्या गावात टँकर सुरू आहेत व ज्या गावातून टँकरची मागणी आहे त्या गावांची जिल्ह्याधिकार्‍यांनी स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्याची गरज आहे. काही गावातील पाणीपुरवठ्यासाठी किरकोळ (विहिरी खोलीकरण, गाळ काढणे, बोअरमध्ये मोटार टाकणे, पाईपलाईनची दुरुस्ती करणे) कामे केली तर काही गावचे टँकर बंद होऊ शकतात. मात्र तातडीने तपासणी व उपाययोजना केली तरच टँकरची संख्या कमी होणार आहे.

---------------------------------

मागणी आली की टँकर द्यावा लागतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मागील वर्षी केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा फायदा झाला. त्यामुळे टँकरची मागणी कमी झाली आहे. - डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी