शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

टँकरची संख्या ७० वर

By admin | Updated: May 25, 2014 00:41 IST

सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाई : उपाययोजनांचा प्रभाव नाही

सोलापूर: अनेक वर्षांपासून पाणी अडविण्याची कामे मोठ्या प्रमाणावर होऊनही तसेच उजनी धरणाचे पाणी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सोडूनही सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई काही केल्या हटेना झाली आहे. ८४ गावे व ४०७ वाड्यांसाठी तब्बल ७० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात असले तरी दररोज टँकरची मागणी येतच आहे. सोलापूर जिल्ह्यावर दरवर्षीच पाणीटंचाईचे सावट येते. पाऊस चांगला पडला तरीही काही गावात तरी टँकर द्यावेच लागतात. टँकरमुक्त जिल्हा होण्यासाठी अनेक वेळा आराखडे तयार झाले व त्यानुसार कामेही झाली. अनेक ठिकाणच्या पाण्याच्या स्रोताच्या आधारे अनेक गावांसाठी स्वतंत्र व संयुक्त पाणीपुरवठा योजना राबल्या गेल्या. बोअर, विहिरीचा आधार घेत नवनव्या योजना राबवूनही काही गावे दरवर्षीच टँकरच्या पाण्यावर विसंबून राहतात. मागील दोन वर्षांत पाऊस कमी झाल्याने वाड्यावस्त्यांच्या नागरिकांना पाण्यासाठी टँकर दिले होते. दोन वर्षे पाण्याच्या टंचाईने त्रासून गेल्याने पाणी अडविण्याच्या कामात जनतेनेही झोकून दिले होते. जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या आवाहनानुसार तलाव व बंधार्‍यातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले होते. नाल्याच्या खोलीकरणाचा प्रयोग मागील वर्षी यशस्वी झाला होता. अनेक ठिकाणच्या नाल्याचा गाळ शासनाच्या पैशातून निघाला. सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही पाणी अडविण्यासाठीची कामे झाली होती. तरीही यावर्षी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. २० मेपर्यंत यंदा जिल्ह्यात ८४ गावे व ४०७ वाड्यांना ७० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर व माळशिरस वगळता अन्य तालुक्यात टँकर सुरू झाले आहेत. या संख्येत दररोज भर पडताना दिसत आहे.

-------------------------

एवढे पाणी जाते तरी कुठे ? उजनीसह शेजारच्या जिल्ह्यातील धरणाचे पाणी जिल्ह्यातील बर्‍याच गावांच्या परिसरातून उन्हाळ्यातही मिळत आहे. गावोगावी पाणी अडविण्याची कामेही मागील वर्षी झाली होती. सरत्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी अडल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. याशिवाय गाळ काढण्याची कामेही झाली होती; तरीही टँकरची मागणी येतच आहे.

------------------------------

जिल्हाधिकार्‍यांनी शोध घेतला तर..? ज्या गावात टँकर सुरू आहेत व ज्या गावातून टँकरची मागणी आहे त्या गावांची जिल्ह्याधिकार्‍यांनी स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्याची गरज आहे. काही गावातील पाणीपुरवठ्यासाठी किरकोळ (विहिरी खोलीकरण, गाळ काढणे, बोअरमध्ये मोटार टाकणे, पाईपलाईनची दुरुस्ती करणे) कामे केली तर काही गावचे टँकर बंद होऊ शकतात. मात्र तातडीने तपासणी व उपाययोजना केली तरच टँकरची संख्या कमी होणार आहे.

---------------------------------

मागणी आली की टँकर द्यावा लागतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मागील वर्षी केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा फायदा झाला. त्यामुळे टँकरची मागणी कमी झाली आहे. - डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी