शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

टँकरची संख्या ७० वर

By admin | Updated: May 25, 2014 00:41 IST

सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाई : उपाययोजनांचा प्रभाव नाही

सोलापूर: अनेक वर्षांपासून पाणी अडविण्याची कामे मोठ्या प्रमाणावर होऊनही तसेच उजनी धरणाचे पाणी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सोडूनही सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई काही केल्या हटेना झाली आहे. ८४ गावे व ४०७ वाड्यांसाठी तब्बल ७० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात असले तरी दररोज टँकरची मागणी येतच आहे. सोलापूर जिल्ह्यावर दरवर्षीच पाणीटंचाईचे सावट येते. पाऊस चांगला पडला तरीही काही गावात तरी टँकर द्यावेच लागतात. टँकरमुक्त जिल्हा होण्यासाठी अनेक वेळा आराखडे तयार झाले व त्यानुसार कामेही झाली. अनेक ठिकाणच्या पाण्याच्या स्रोताच्या आधारे अनेक गावांसाठी स्वतंत्र व संयुक्त पाणीपुरवठा योजना राबल्या गेल्या. बोअर, विहिरीचा आधार घेत नवनव्या योजना राबवूनही काही गावे दरवर्षीच टँकरच्या पाण्यावर विसंबून राहतात. मागील दोन वर्षांत पाऊस कमी झाल्याने वाड्यावस्त्यांच्या नागरिकांना पाण्यासाठी टँकर दिले होते. दोन वर्षे पाण्याच्या टंचाईने त्रासून गेल्याने पाणी अडविण्याच्या कामात जनतेनेही झोकून दिले होते. जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या आवाहनानुसार तलाव व बंधार्‍यातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले होते. नाल्याच्या खोलीकरणाचा प्रयोग मागील वर्षी यशस्वी झाला होता. अनेक ठिकाणच्या नाल्याचा गाळ शासनाच्या पैशातून निघाला. सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही पाणी अडविण्यासाठीची कामे झाली होती. तरीही यावर्षी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. २० मेपर्यंत यंदा जिल्ह्यात ८४ गावे व ४०७ वाड्यांना ७० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर व माळशिरस वगळता अन्य तालुक्यात टँकर सुरू झाले आहेत. या संख्येत दररोज भर पडताना दिसत आहे.

-------------------------

एवढे पाणी जाते तरी कुठे ? उजनीसह शेजारच्या जिल्ह्यातील धरणाचे पाणी जिल्ह्यातील बर्‍याच गावांच्या परिसरातून उन्हाळ्यातही मिळत आहे. गावोगावी पाणी अडविण्याची कामेही मागील वर्षी झाली होती. सरत्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी अडल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. याशिवाय गाळ काढण्याची कामेही झाली होती; तरीही टँकरची मागणी येतच आहे.

------------------------------

जिल्हाधिकार्‍यांनी शोध घेतला तर..? ज्या गावात टँकर सुरू आहेत व ज्या गावातून टँकरची मागणी आहे त्या गावांची जिल्ह्याधिकार्‍यांनी स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्याची गरज आहे. काही गावातील पाणीपुरवठ्यासाठी किरकोळ (विहिरी खोलीकरण, गाळ काढणे, बोअरमध्ये मोटार टाकणे, पाईपलाईनची दुरुस्ती करणे) कामे केली तर काही गावचे टँकर बंद होऊ शकतात. मात्र तातडीने तपासणी व उपाययोजना केली तरच टँकरची संख्या कमी होणार आहे.

---------------------------------

मागणी आली की टँकर द्यावा लागतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मागील वर्षी केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा फायदा झाला. त्यामुळे टँकरची मागणी कमी झाली आहे. - डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी