शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आता सोलापूरकरांना दुसऱ्या वंदे भारतची मिळणार गिफ्ट; पुणे, मुंबईप्रमाणे हैदराबाद प्रवासही सुखकर

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 5, 2023 13:26 IST

सोलापूरकरांसाठी गुड न्यूज आहे. सोलापूरला आणखी एक वंदे भारत रेल्वे मिळणार आहे. दक्षिण रेल्वे विभागाने मागच्या आठवड्यात सिकंदराबाद-पुण्यासाठी वंदे भारत गाडीची घोषणा

सोलापूर :

सोलापूरकरांसाठी गुड न्यूज आहे. सोलापूरला आणखी एक वंदे भारत रेल्वे मिळणार आहे. दक्षिण रेल्वे विभागाने मागच्या आठवड्यात सिकंदराबाद-पुण्यासाठी वंदे भारत गाडीची घोषणा केली असून, ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. त्यामुळे सोलापूर, मुंबईनंतर आता सोलापूरला दुसरी वंदे भारत गाडी मिळणार आहे. यामुळे सोलापूरकरांचा पुणे आणि हैदराबादचा प्रवास आणखीन सुखकर आणि गतिमान होणार आहे.

सिकंदराबाद-पुणे सोबत सिकंदराबाद-तिरुपती, सिकंदराबाद-बंगळुरू अशा तीन वंदे भारत गाड्यांची घोषणा झाली आहे. या गाड्या कधी सुरू होतील, याच्या तारखाही लवकरच जाहीर होतील. दक्षिण रेल्वे विभागाकडून त्याची तयारी सुरू आहे. सिकंदराबाद पुणे वंदे भारत सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणार असल्याने सोलापूरकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या पुणे ते हैदराबादसाठी शताब्दी एक्सप्रेस गाडी सुरू आहे. यासह इतर अनेक गाड्या सुरू आहेत. वंदे भारत ही गाडी आरामदायी आणि वेगवान असल्याने उद्योजकांना याचा मोठा मोठा फायदा होईल.