शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

माळेवाडी गावाची बदनामी थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST

श्रीपूर : माळेवाडी (बोरगाव) मध्ये झालेल्या घटनेमुळे गावाची बदनामी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ याबाबत म्हणणे मांडणार आहेत. सर्व समाज ...

श्रीपूर : माळेवाडी (बोरगाव) मध्ये झालेल्या घटनेमुळे गावाची बदनामी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ याबाबत म्हणणे मांडणार आहेत. सर्व समाज एकत्र बसून मार्ग काढू असे माळेवाडी (बोरगाव) गावाच्या वतीने भाजप कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील यांनी सांगितले.

ग्रामपंचायत वरील अंत्यसंस्कार प्रकरणावर अकलूज येथे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ही घटना कशामुळे घडली याबाबत त्यांनी सांगितले. यावेळी हिंमतराव पाटील, माळेवाडी (बोरगाव) मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

माळेवाडी हे गाव जेमतेम हजार लोकसंख्येचे असणारे गाव आहे. माळेवाडी (बोरगाव) चा एक भाग असला तरी एक स्वतंत्र विचार धारणेची रचना असणारे गाव आहे. गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती सुसंस्कृत व सुशिक्षित आहे. या ठिकाणचे अनेक व्यक्ती जिल्हाधिकारी, डीएसपी, डीवायएसपी, कृषी खात्यामध्ये अधिकारी ते शिक्षक अशा उच्च पदावर काम करीत आहेत. येथील लोक जास्त करून राजकारणात नसतात. स्वत:चे काम भले अशी भूमिका येथील नागरिकांची आहे. २० ऑगस्ट रोजी घटनेमुळे हे गाव पूर्ण हादरून गेले. एका समाजाच्या व्यक्तीचे २० ऑगस्ट २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्यावर माळेवाडी (बोरगाव) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातून अंत्ययात्रा नेण्यासाठी विरोध केला. काही महिन्यापूर्वी मृताच्या नातेवाईकांनी त्या शेतकऱ्यावर दोन जातीवाचक शिवीगाळीच्या केसेस केल्या होत्या. त्यामुळे संबंधित शेतकरी त्यांच्या शेतातून जाण्यासाठी मनाई केली. तरी सुद्धा त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी मृतांच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायत समोर अंत्यविधी केला. त्या घटनेपासून येथील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. गावाची बदनामी होत आहे हे थांबले पाहिजे अशी अपेक्षा भाजपचे कार्यकारी सदस्य पाटील यांनी सांगितले.

----

२०१५ साली गावाला महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त गाव म्हणून जाहीर केले आहे. तरीसुद्धा रस्त्याच्या वादावरून माळेवाडी (बोरगाव) मध्ये १२ एप्रिल २०२१ रोजी पहिली ॲट्रॉसिटी दाखल झाली. दुसरी ॲट्रॉसिटी १८ मे २०२१ रोजी झाली. वाद मिटवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत पण ते निष्फळ ठरले. या घटनेवरून माळेवाडी (बोरगाव) गावाची बदनाम करू नका. आमची सामंजस्याने भूमिका राहणार आहे.

- राजकुमार पाटील

भाजप कार्यकारिणी सदस्य