शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

गोपीनाथराव नाहीत; महाराष्ट्र पोरका झाला!

By admin | Updated: June 8, 2014 01:14 IST

मुंडे यांना श्रद्धांजली : नेते, कार्यकर्त्यांनी जागवल्या आठवणी

सोलापूर : गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यांना तळागाळातील जनतेच्या समस्या ठाऊक होत्या. कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र पोरका झाला, अशा भावना भारतीय जनता पार्टीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी आज येथे व्यक्त केल्या.भाजपाच्या ग्रामीण संघटनेने मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील शिवस्मारक सभागृहात सभेचे आयोजन केले होते. शहर आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंचावर होते. यावेळी मुंडे यांच्या आठवणीने अनेक जण भावनाविवश झाले. किशोर देशपांडे : जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात मुंडे हे पुण्याचे नेतृत्व करीत होते. माझ्याकडे सोलापूरचे नेतृत्व होते. या आंदोलनात प्रमोद महाजन, मुंडे यांच्यासह मलाही अटक झाली. आम्हाला नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आले होते, तेव्हापासून माझे गोपीनाथरावांशी संबंध आहेत. मुंडे आज आपल्यात नाहीत; पण विपरीत काळात संघर्ष करीत विधायक काम कसे करायचे, हे आपण मुंडे यांच्या जीवनाकडे पाहून शिकू शकतो. स्वत: मोठे होत असताना इतरांना कसे मोठे करायचे, ही शिकवणही आपणाला त्यांच्याकडून मिळते. ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते.सुभाष देशमुख : भाजपाची सत्ता स्वबळावर येण्यात मुंडे यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल ते नेहमीच संवेदनाशील असायचे. वंजारी समाज त्यांना देव मानायचा. त्यांची गाडी रस्त्यावरून गेली तर वंजारी समाजाचे लोक तेथील माती कपाळाला लावायचे. शहाजी पवार : मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाची पायाभरणी केली. अलीकडेच दुष्काळावर चर्चा करण्यासाठी त्यांनी माझ्यासह चार जिल्हाध्यक्षांना आपल्या निवासस्थानी बोलावले होते. त्यावेळी सोलापुरातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी त्यांनी काढल्या. मुंडे यांना राज्याचा अभ्यास होता. ते धाडसी नेते होते. मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाचा पाया घातला, त्यामुळेच आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आज कळस होण्याचा मान मिळाला आहे.रामचंद्र जन्नू : मुंडे हे १२ मे रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. त्यावेळी त्यांनी सोलापुरातील सर्व जुन्या नेत्या, कार्यकर्त्यांबद्दल चौकशी केली. तेव्हाच त्यांचं बोलणं मला खटकलं. ते निर्वाणीचे बोल बोलत आहेत, असे वाटले.नागेश वल्याळ : माझ्या वयाच्या सहाव्या वर्षापासून मी मुंडे यांना पक्षवाढीसाठी कार्य करताना पाहत आलो आहे. ते पक्षासाठी अहोरात्र काम करायचे. माझे वडील लिंगराज वल्याळ यांना अर्धांगवायू झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सावरले. वडिलांच्या मृत्यूनंतर मला उद्योग उभा करून देण्यास सहकार्य केले.आणीबाणीच्या काळापासून नंतर दीर्घकाळ सोलापूर भाजपाचे नेतृत्व किशोर देशपांडे यांच्याकडे होते. त्यामुळे देशपांडेंचा मुंडेंशी घनिष्ट संबंध होता. देशपांडे यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. सोलापूरचा कोणताही निर्णय घेताना मुंडे माझ्याशी चर्चा करायचे; नव्हे मला विचारूनच ते निर्णय घ्यायचे.यावेळी चन्नवीर चिट्टे, वीरभद्रेश बसवंती, विष्णू जगताप, पंडितराज कोरे, दत्तुसा कल्पवृक्ष, सय्यद मुलाणी, गणेश चिवटे यांनीही मुंडे यांना शब्दांजली वाहिली.-----------------------------------बापूंना दिली होती जबाबदारीसुभाष देशमुख (बापू) आणि मुंडे यांच्यात अलीकडे राजकीय सख्य नव्हते; पण २७ मे रोजी नवी दिल्लीत बापू-मुंडे भेट झाली. त्यावेळी बापूंवर भाजपाची जिल्हा कार्यालये बांधून देण्याची जबाबदारी टाकल्याची आठवण मुंडे यांनी करून दिली आणि पुन्हा ते काम सुरू करायला सांगितले. बीड येथे पाच एकर जागा देतो. ते भाजपाचे कार्यालय बांधून बीडपासून या मोहिमेची सुरुवात करा, असेही मुंडे म्हणाल्याची आठवण देशमुख यांनी यावेळी सांगितली.