शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

गोपीनाथराव नाहीत; महाराष्ट्र पोरका झाला!

By admin | Updated: June 8, 2014 01:14 IST

मुंडे यांना श्रद्धांजली : नेते, कार्यकर्त्यांनी जागवल्या आठवणी

सोलापूर : गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यांना तळागाळातील जनतेच्या समस्या ठाऊक होत्या. कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र पोरका झाला, अशा भावना भारतीय जनता पार्टीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी आज येथे व्यक्त केल्या.भाजपाच्या ग्रामीण संघटनेने मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील शिवस्मारक सभागृहात सभेचे आयोजन केले होते. शहर आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंचावर होते. यावेळी मुंडे यांच्या आठवणीने अनेक जण भावनाविवश झाले. किशोर देशपांडे : जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात मुंडे हे पुण्याचे नेतृत्व करीत होते. माझ्याकडे सोलापूरचे नेतृत्व होते. या आंदोलनात प्रमोद महाजन, मुंडे यांच्यासह मलाही अटक झाली. आम्हाला नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आले होते, तेव्हापासून माझे गोपीनाथरावांशी संबंध आहेत. मुंडे आज आपल्यात नाहीत; पण विपरीत काळात संघर्ष करीत विधायक काम कसे करायचे, हे आपण मुंडे यांच्या जीवनाकडे पाहून शिकू शकतो. स्वत: मोठे होत असताना इतरांना कसे मोठे करायचे, ही शिकवणही आपणाला त्यांच्याकडून मिळते. ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते.सुभाष देशमुख : भाजपाची सत्ता स्वबळावर येण्यात मुंडे यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल ते नेहमीच संवेदनाशील असायचे. वंजारी समाज त्यांना देव मानायचा. त्यांची गाडी रस्त्यावरून गेली तर वंजारी समाजाचे लोक तेथील माती कपाळाला लावायचे. शहाजी पवार : मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाची पायाभरणी केली. अलीकडेच दुष्काळावर चर्चा करण्यासाठी त्यांनी माझ्यासह चार जिल्हाध्यक्षांना आपल्या निवासस्थानी बोलावले होते. त्यावेळी सोलापुरातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी त्यांनी काढल्या. मुंडे यांना राज्याचा अभ्यास होता. ते धाडसी नेते होते. मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाचा पाया घातला, त्यामुळेच आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आज कळस होण्याचा मान मिळाला आहे.रामचंद्र जन्नू : मुंडे हे १२ मे रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. त्यावेळी त्यांनी सोलापुरातील सर्व जुन्या नेत्या, कार्यकर्त्यांबद्दल चौकशी केली. तेव्हाच त्यांचं बोलणं मला खटकलं. ते निर्वाणीचे बोल बोलत आहेत, असे वाटले.नागेश वल्याळ : माझ्या वयाच्या सहाव्या वर्षापासून मी मुंडे यांना पक्षवाढीसाठी कार्य करताना पाहत आलो आहे. ते पक्षासाठी अहोरात्र काम करायचे. माझे वडील लिंगराज वल्याळ यांना अर्धांगवायू झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सावरले. वडिलांच्या मृत्यूनंतर मला उद्योग उभा करून देण्यास सहकार्य केले.आणीबाणीच्या काळापासून नंतर दीर्घकाळ सोलापूर भाजपाचे नेतृत्व किशोर देशपांडे यांच्याकडे होते. त्यामुळे देशपांडेंचा मुंडेंशी घनिष्ट संबंध होता. देशपांडे यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. सोलापूरचा कोणताही निर्णय घेताना मुंडे माझ्याशी चर्चा करायचे; नव्हे मला विचारूनच ते निर्णय घ्यायचे.यावेळी चन्नवीर चिट्टे, वीरभद्रेश बसवंती, विष्णू जगताप, पंडितराज कोरे, दत्तुसा कल्पवृक्ष, सय्यद मुलाणी, गणेश चिवटे यांनीही मुंडे यांना शब्दांजली वाहिली.-----------------------------------बापूंना दिली होती जबाबदारीसुभाष देशमुख (बापू) आणि मुंडे यांच्यात अलीकडे राजकीय सख्य नव्हते; पण २७ मे रोजी नवी दिल्लीत बापू-मुंडे भेट झाली. त्यावेळी बापूंवर भाजपाची जिल्हा कार्यालये बांधून देण्याची जबाबदारी टाकल्याची आठवण मुंडे यांनी करून दिली आणि पुन्हा ते काम सुरू करायला सांगितले. बीड येथे पाच एकर जागा देतो. ते भाजपाचे कार्यालय बांधून बीडपासून या मोहिमेची सुरुवात करा, असेही मुंडे म्हणाल्याची आठवण देशमुख यांनी यावेळी सांगितली.