शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्वत:ला निवडून यायला जमत नाही म्हणून परिचारकांनी केले दुसऱ्याला उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:19 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालकेंच्या प्रचाराचा नारळ राझंणी (ता. पंढरपूर) येथे फोडण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालकेंच्या प्रचाराचा नारळ राझंणी (ता. पंढरपूर) येथे फोडण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, उमेश पाटील, बळिरामकाका साठे, उत्तमराव जानकर, प्रकाश पाटील, शिवाजीराव काळुंगे, साईनाथ अभंगराव, संभाजी शिंदे, विजयसिंह देशमुख, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे उपस्थित हाेते.

पुढे जयंत पाटील म्हणाले, पंढरपूर व मंगळवेढ्यातील अपूर्ण विकासकामे हे आता भगीरथ भालके यांच्या माध्यमातून पूर्ण करावयाची आहेत. ही पोटनिवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे.

आपला उमेदवार नाही म्हणून भाजपने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा विकास केला नाही. तसेच पंढरपूर शहरातील इसबावी परिसरातील बाबर यांचा जीव गेला, त्यावेळी भालके यांनी अर्धा तास थांबून स्पीड ब्रेकर केला असा जनमानसातला नेता म्हणून भारत भालके यांची ओळख असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुढे दत्तात्रय भरणे म्हणाले, मी पण पालकमंत्री आहे. घरचा वाडपी असला तर जादा वाढतो. परंतु मागील वर्षी कोरोनाची अडचण नसती तर खूप काही केले असते. यापुढे पंढरपूर मंगळवेढ्याला जादा विकास निधी देण्याचा प्रयत्न करू. आपण कोणावर टीका करू नका असा सल्लादेखील भरणे यांनी दिला आहे.

पुढे भगीरथ भालके म्हणाले, रांझणी (ता. पंढरपूर) येथील श्री शंभू महादेव देवस्थानासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून दोन कोटींचा निधी दिलेला असूनदेखील विरोधक मागील ११ वर्षांचा विकासकामांचा हिशेब मागून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे भालके यांनी सांगितले.

पाच हजार कोटींची कामे सुरू आहेत, गबाळ आल तर सोडू नका : साळुंखे :::::::::::::::::::

विधानसभेची पोटनिवडणूक ठेकेदार लढवत आहे. त्याची पाच हजार रुपयांची कामे सुरू आहेत. गबाळ आल तर सोडू नका असे आवाहन सभेदरम्यान जनतेला माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केले आहे.

संजय मामा म्हणतात, मी खानदानी शिकारी आहे... :::::::::::

नेतेमंडळी गबाळ किती आहे बघून निर्णय घेतात; पण अडचणीत किती आहे बघून निर्णय घेतो. जयंत पाटील तुम्ही टप्प्यात आले की टिपता, पण मी खानदानी शिकारी आहे. मी बागलला काढून टिपतो. प्रस्तपाच्या विरोधात लढत असताना माझी मैत्री एकाशी झाली. पण, मैत्री वेगळी अन‌् राजकारण वेगळे आहे. जसे नानांनी सांगितले होते की, मी कुठेही असलो तरी मी शरद पवारांचाच आहे. तसं मी कुठेही हिंडत असलो तरी मी अजित पवारांचाच असल्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी सष्ट केले.