शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लस देणार नाही, तर बोलावलेच कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:26 IST

कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संसर्गावर मात करण्यासाठी शासन स्तरावरून नागरिकांना मोफत लसीकरणाचे धोरण राबविले जात आहे; परंतु लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा ...

कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संसर्गावर मात करण्यासाठी शासन स्तरावरून नागरिकांना मोफत लसीकरणाचे धोरण राबविले जात आहे; परंतु लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा होत असलेला अपुरा पुरवठा यामुळे तालुकास्तरावर उपलब्ध लसीनुसार पुरवठा करून शासकीय रुग्णालयातून लस दिली जात आहे; परंतु अपुरा पुरवठा आणि नागरिकांची मागणी यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे रुग्णालयात गोंधळ निर्माण होत आहे. ग्रामपंचायतस्तरावरून टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाला उपलब्ध होणाऱ्या लसीनुसार रुग्णालयांतर्गत येणाऱ्या गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत लसीचे नियोजन करण्यात येत आहे.

रुग्णालयात नियोजनाचा अभाव

४ सप्टेंबर रोजी उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रात दुसऱ्या डोससाठी २०० लसी प्राप्त झाल्या होत्या. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार उंबरे गावासाठी लोकसंख्येच्या तुलनेत ३८ डोस होते. याबाबतची माहिती उंबरे ग्रामपंचायतीला देणे गरजेचे होते; परंतु रुग्णालयप्रमुख डॉ. साखरे यांनी तसे न सांगता संबंधित ग्रामपंचायतीला दुसरे डोस आहेत, असे सांगितल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पहिल्या डोसचा कालावधी संपलेल्या नागरिकांना टोकन दिले; परंतु रुग्णालय प्रशासनाने ३८ पेक्षा जास्त लस उंबरे येथील नागरिकांना देता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि आम्हाला लस द्या; अन्यथा आम्ही लसीकरण होऊ देणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली.

स्थानिकांच्या दबावापुढे रुग्णालय प्रशासन झुकले.

४ सप्टेंबर रोजी उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राला दुसऱ्या डोससाठी २०० लस प्राप्त झाल्या. रुग्णालय प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला कळविल्याने नागरिकांनी टोकन घेऊन रुग्णालय गाठले; परंतु उंबरे येथील ग्रामस्थांनी अगोदर स्थानिकांना लस देण्याबाबत रुग्णालय प्रशासनावर दबाव टाकला. त्यामुळे लसीकरण बंद केल्याचा फार्स करून रुग्णालय प्रशासनाने बाहेरगावच्या नागरिकांना माघारी पाठविले आणि स्थानिक नागरिकांवर लसीची मेहरबानी केली. त्यामुळे बाहेरगावच्या नागरिकांना लस घेण्यासाठी किती दिवस हेलपाटे मारावे लागणार? हे मात्र अनुत्तरितच आहे.

कोट ::::::::::::

लस कमी आल्यामुळे अडचण निर्माण झाली. माघारी गेलेल्या नागरिकांना ६ सप्टेंबर रोजी लस देण्याचे नियोजन करू.

-डॉ. प्रभावती साखरे,

प्राथमिक आरोग्य केंद्र, उंबरे

कोट :::::::::::::::

ज्या पद्धतीने डॉ. साखरे यांनी आम्हाला दुसऱ्या डोससाठी टोकन देण्यास सांगितले, त्या पद्धतीने आम्ही टोकन दिले होते.

-महादेव शिंदे,

सरपंच प्रतिनिधी, उंबरे

कोट ::::::::::::

लस घेण्यासाठी ४० किमी अंतर जावे लागत आहे. असे असताना लस बंद करण्यात आल्याचे खोटे सांगून आम्हाला माघारी पाठवून पुन्हा लसीकरण करणे म्हणजे बाहेरगावच्या नागरिकांना रुग्णालय प्रशासनाकडून वेठीस धरण्याचा प्रकार चुकीचा आहे.

-अभिजित पाटील,

वंचित नागरिक, नेमतवाडी