शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
7
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
8
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
9
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
10
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
11
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
12
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
13
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
14
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
15
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
16
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
17
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
18
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
19
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
20
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...

वेगळा विदर्भ नको; कुटुंबासारखे एकत्र राहू

By admin | Updated: June 9, 2014 00:59 IST

कवी नारायण कवठेकर : मराठी साहित्यिकांची राजकीय समज पोरकट

सोलापूर : वेगळा विदर्भ होईल का?, यावर चर्चा होईल तेव्हा मी नको, असेच म्हणेन. आपण सारे मोठ्या कुटुंबाप्रमाणे एकत्र राहू. स्वतंत्र राज्याची मागणी, ही राजकीय आहे. राजकीय लोकांना दुसरे कोणते काम नसते. म्हणूनच ते अशी मागणी करत असतात, असे स्पष्ट मत विदर्भातील ज्येष्ठ कवी नारायण कवठेकर - कुलकर्णी यांनी आज येथे व्यक्त केले.कवी दत्ता हलसगीकर स्मृती समितीच्या वतीने कवठेकर-कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुस्कार समितीचे अध्यक्ष विवेक घळसासी यांनी आपल्या भाषणात आता विदर्भही आमच्यावर अन्याय करेल, असे वक्तव्य केले होते. तो धागा पकडून कवठेकर - कुलकर्णी यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, वेगळ्या विदर्भाची मागणी होत असतानाच आता वेगळ्या मराठवाड्याचीही मागणी झाली आहे. एका धरणाच्या पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात चाळीस एक आंदोलनकर्त्यांनी ही मागणी केली होती. चाळीसचे चारशे होण्याला वेळ लागणार नाही. या मागणीलाही जोर धरला जाईल.आपण जी भाषा बोलतो, तिची अवस्था आज चिंताजनक आहे. ही भाषा बहुसंख्यांनी बोलली पाहिजे. नवी दिल्लीत मराठीचा स्वर बुलंद झाला पाहिजे, असे स्पष्ट करून कवठेकर - कुलकर्णी म्हणाले, विदर्भावर अन्याय होतो म्हणजे काय? अन्याय आम्ही करू देतो. विदर्भातील लोक आळशी आहेत, असाही एक आरोप होतो; पण आम्ही सुखी आहोत म्हणून आळशी आहोत, अशीही टिपण्णी त्यांनी केली. विदर्भावर हिंदी भाषेचा प्रभाव आहे; पण मराठी बोलू नका, असे कुणी सांगितले आहे काय? संस्कार फक्त मातृभाषेतूनच होत असतात. अन्य कोणत्याही भाषेतून नाही, असे ते म्हणाले.सामान्य माणूस राजकारणविरहित राहू शकत नाही. कवीचेही तसेच आहे. राजकारण ही समाज आणि व्यक्तीजीवनावर प्रभाव टाकणारी संस्था आहे. तिची प्रतिक्रिया व्यक्त करणे, हा कवीचाही भाव असतो. त्यामुळे राजकारणाचे अनुभव कविता, कादंबरीत आले पाहिजेत; मात्र आपल्या साहित्यिकांची राजकीय समज पोरकट आहे, अशी टीका त्यांनी केली.-------------------------------------------काव्यक्षेत्रात बाजारपाऊस, चांदणे, ढग हे कवितांचे विषय आहेत. पाऊस पडू लागता की कवीच्या भावना दाटून येतात.डोळ्यातून आसवं घळघळू लागतात; पण पाऊस जर जीवन उद्ध्वस्त करत असेल तर पावसावर कविता कशी लिहिणार? असा सवाल करून काव्यक्षेत्रात बाजार मांडला आहे. पैसे देवून काव्यसंग्रह छापून घेतले जातात. पुरस्कार मिळविले जातात. या कवींना तुकाराम आणि नरेंद्रचे नाव घेण्याचा काय अधिकार, असाही प्रश्न कवठेकर - कुलकर्णी यांनी उपस्थित केला.