शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वेगळा विदर्भ नको; कुटुंबासारखे एकत्र राहू

By admin | Updated: June 9, 2014 00:59 IST

कवी नारायण कवठेकर : मराठी साहित्यिकांची राजकीय समज पोरकट

सोलापूर : वेगळा विदर्भ होईल का?, यावर चर्चा होईल तेव्हा मी नको, असेच म्हणेन. आपण सारे मोठ्या कुटुंबाप्रमाणे एकत्र राहू. स्वतंत्र राज्याची मागणी, ही राजकीय आहे. राजकीय लोकांना दुसरे कोणते काम नसते. म्हणूनच ते अशी मागणी करत असतात, असे स्पष्ट मत विदर्भातील ज्येष्ठ कवी नारायण कवठेकर - कुलकर्णी यांनी आज येथे व्यक्त केले.कवी दत्ता हलसगीकर स्मृती समितीच्या वतीने कवठेकर-कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुस्कार समितीचे अध्यक्ष विवेक घळसासी यांनी आपल्या भाषणात आता विदर्भही आमच्यावर अन्याय करेल, असे वक्तव्य केले होते. तो धागा पकडून कवठेकर - कुलकर्णी यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, वेगळ्या विदर्भाची मागणी होत असतानाच आता वेगळ्या मराठवाड्याचीही मागणी झाली आहे. एका धरणाच्या पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात चाळीस एक आंदोलनकर्त्यांनी ही मागणी केली होती. चाळीसचे चारशे होण्याला वेळ लागणार नाही. या मागणीलाही जोर धरला जाईल.आपण जी भाषा बोलतो, तिची अवस्था आज चिंताजनक आहे. ही भाषा बहुसंख्यांनी बोलली पाहिजे. नवी दिल्लीत मराठीचा स्वर बुलंद झाला पाहिजे, असे स्पष्ट करून कवठेकर - कुलकर्णी म्हणाले, विदर्भावर अन्याय होतो म्हणजे काय? अन्याय आम्ही करू देतो. विदर्भातील लोक आळशी आहेत, असाही एक आरोप होतो; पण आम्ही सुखी आहोत म्हणून आळशी आहोत, अशीही टिपण्णी त्यांनी केली. विदर्भावर हिंदी भाषेचा प्रभाव आहे; पण मराठी बोलू नका, असे कुणी सांगितले आहे काय? संस्कार फक्त मातृभाषेतूनच होत असतात. अन्य कोणत्याही भाषेतून नाही, असे ते म्हणाले.सामान्य माणूस राजकारणविरहित राहू शकत नाही. कवीचेही तसेच आहे. राजकारण ही समाज आणि व्यक्तीजीवनावर प्रभाव टाकणारी संस्था आहे. तिची प्रतिक्रिया व्यक्त करणे, हा कवीचाही भाव असतो. त्यामुळे राजकारणाचे अनुभव कविता, कादंबरीत आले पाहिजेत; मात्र आपल्या साहित्यिकांची राजकीय समज पोरकट आहे, अशी टीका त्यांनी केली.-------------------------------------------काव्यक्षेत्रात बाजारपाऊस, चांदणे, ढग हे कवितांचे विषय आहेत. पाऊस पडू लागता की कवीच्या भावना दाटून येतात.डोळ्यातून आसवं घळघळू लागतात; पण पाऊस जर जीवन उद्ध्वस्त करत असेल तर पावसावर कविता कशी लिहिणार? असा सवाल करून काव्यक्षेत्रात बाजार मांडला आहे. पैसे देवून काव्यसंग्रह छापून घेतले जातात. पुरस्कार मिळविले जातात. या कवींना तुकाराम आणि नरेंद्रचे नाव घेण्याचा काय अधिकार, असाही प्रश्न कवठेकर - कुलकर्णी यांनी उपस्थित केला.