शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

मोडनिंबच्या नव्या पुलावरुन वाहतुकीला ‘नो एन्ट्री’ !

By admin | Updated: May 13, 2014 02:05 IST

रेल्वे अन् महामार्गाचा वाद: रेल्वे क्रॉसिंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम

सोलापूर: सोलापूर ते पुणे या महामार्गाचे बहुतांश काम झाले; मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष, भूसंपादनाचे अडथळे, रेल्वेची अडेलतट्टू भूमिका यामुळे सुपरफास्ट प्रवासाला काही ठिकाणी ‘ब्रेक’ लागला आहे़ मोडनिंब येथे उड्डाणपूल (रेल्वे ओव्हर ब्रीज- आरओबी) बांधून तयार झाला; मात्र या नव्या पुलावरुन सुरू झालेली वाहतूक बंद करण्यात आली आहे़ रेल्वे आणि महामार्गाच्या वादामुळे येथे रेल्वे क्रॉसिंगच्या वेळी दररोज वाहतुकीची भली मोठी कोंडी होते़ मोडनिंब येथे रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे येथे सहापदरी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे़ यासाठी तब्बल १० कोटींहून अधिक निधी खर्च झाला़ पुलावरुन वाहतूक सुरू झाल्यानंतर रेल्वेकडून महामार्गावरील गेट बंद केले जाणार आहे़ त्यामुळे जुना रस्ता पूर्ववत सुरू ठेवावा नाहीतर दुसरा एक पूल मोडनिंबसाठी बांधावा अशी मागणी पुढे येत आहे़मोडनिंबमध्ये ये-जा करण्यासाठी नव्या पुलाचा उपयोग नाही़ त्यामुळे मोडनिंबकडे जाणारा आणखी एक पूल करावा अशी मागणी गावकर्‍यांची आहे; मात्र त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिल्याशिवाय हे काम होणार नाही़ भव्यदिव्य चकाचक चारपदरी रस्ता, दुभाजक, सर्व्हिस रोड, मध्यभागी रंगीबेरंगी फुलझाडी यामुळे साहजिकच या मार्गावरील वाहतूक सुपरफास्ट आणि आरामदायी होऊ लागली आहे़ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते भीमानगर (भीमा नदी पूल हिंगणगाव) या १०२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम आयएल अ‍ॅण्ड एफएस या कंपनीने केले़ सध्या ८९ टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे़ झालेल्या कामाच्या प्रमाणात सावळेश्वर आणि वरवडे या दोन ठिकाणी टोल सुरू झाला आहे़ भीमा आणि सीना नदीवरील पूल, मोहोळ येथे उड्डाणपूल, सावळेश्वर , बाळे आणि जुना पुणे नाका या ठिकाणी सात मोठ्या पुलांचा या कामात समावेश असून, मोडनिंब आणि सावळेश्वर येथे रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम झाले आहे तेथून वाहतूकही सुरू झाली मात्र मोडनिंबचा प्रश्न अद्याप सुटला नाही़

----------------------------------------------

महामार्ग पोलिसांचा ‘अडथळा’ महामार्गावर मदतीसाठी महामार्ग पोलीस कार्यरत असतात; मात्र मोडनिंबमध्ये असलेले महामार्ग पोलीस कार्यालय उड्डाणपुलामध्येच अडकले आहे़ वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्वत्र पत्रव्यवहार झाला तरीही हे कार्यालय निघाले नाही़ यामुळे १० कोटींच्या उड्डाणपुलाचे काम अर्धवट झाले आहे़ जिल्हाधिकारी तरी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देतील काय अशी विचारणा होत आहे़

------------------------------------