शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

दहा वर्षांपासून नाही ऑडिट.. महिला पतसंस्थेचं दप्तर घेतलं ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:19 IST

२० ऑक्टोबर-२०१० रोजी शहरात प्रथमच महिला संस्था अस्तित्वात आली. तेव्हापासून आर्थिक व्यवहार सुरू झाले. बघता बघता तब्बल ३१८ सभासद ...

२० ऑक्टोबर-२०१० रोजी शहरात प्रथमच महिला संस्था अस्तित्वात आली. तेव्हापासून आर्थिक व्यवहार सुरू झाले. बघता बघता तब्बल ३१८ सभासद झाले. त्यांचे लाखो रुपये पिग्मी, आरडी, फिक्स डिपॉझिट वगैरे ठेवी झाल्या. काही दिवस सुरळीत व्यवहार सुरू राहिला. नंतर ही संस्था अचानकपणे डबघाईला आली. तेव्हा दर वर्षी केले जाणारे ऑडिट झालेच नाही. दप्तर अपूर्ण राहू लागले. म्हणून अक्कलकोट येथील सहायक निबंधक कार्यालयाने संबंधिताना बोलावून घेऊन सर्व प्रकारचे दप्तर ताब्यात घेतले. यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला आहे.

अनेक वर्षांपासून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. संस्थेची एकूण उलाढाल ५० लाखापर्यंत असून इतके दिवस का लागतात चौकशीला हेच कळत नसल्याची खंत सभासद ज्येष्ठ नागरिक सुरेशचंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

कोट ::::::::

या संस्थेचे दप्तर अपूर्ण असल्याने पूर्ण करून घेऊन ऑडिटसाठी सोलापूर येथे पाठवून दिले आहे. ऑडिटअंती कर्जदारांना वसुलीसाठी नोटीस काढण्यात येणार आहेत. १३ संचालक असून, पूर्णपणे बरखास्त करण्यात आले आहेत. संस्था अंतरिम अवसायकात आहे.

- सिद्धेश्वर कुंभार, तपासी अधिकारी

कोट ::::::::::

माझे २ लाख ५० हजार रुपये आरडी, पिग्मी या माध्यमातून या संस्थेकडे जमा आहे. पूर्णपणे आर्थिक व्यवहार बंद होऊन चार वर्ष झाले आहे. याबाबत संबंधित कार्यालयाकडे चौकशी केली असता, व्यवस्थित उत्तर मिळत नाही. सतत चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे.

- अंकुश केत, ग्राहक.

----ज्यावेळी मी चेरअमन झाले, तेव्हा आर्थिक व्यवहार बंद होते. दोन वर्षे झाले ऑडिटसाठी दप्तर सहायक निबंधक कार्यालयाने घेऊन गेले आहे. संस्थेचे पैसे घेतलेल्यांनी नीतिमत्ता बाळगून परत करावे. माझेही प्रामाणिक मत आहे की, ज्यांची ज्यांची रक्कम पतसंस्थेत आहेत, त्यांना त्यांची रक्कम मिळायला हवी.

- सुनंदा राजेगावकर, चेअरमन