शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

पाणीटंचाईसाठी नऊ कोटींची मागणी

By admin | Updated: July 16, 2014 01:03 IST

उपजिल्हाधिकारी : १५ आॅगस्टपर्यंत पाणीटंचाई नाही

सोलापूर: शहरात तसेच ग्रामीण भागातील पाणीसाठ्यांमध्ये पुरेसे पाणी असल्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही; मात्र जिल्ह्यात २१२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिली़महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची पाणीटंचाईसंदर्भात पाटील यांनी मंगळवारी बैठक घेतली़ यावेळी महापालिकेने पाणीटंचाईचा ८७ लाख ८७ हजारांचा आराखडा दिला आहे़ उजनीतील पाणीपातळी खाली गेल्यास १५ आॅगस्टपासून उजनीतून दुबार पाणी पंपिंग करण्यासाठी ३७़३८ लाख, हिप्परगा दुबार पंपिंगसाठी ७़९० लाख, विंधन विहिरी घेण्यासाठी २४़९४ लाख, विंधन विहिरीवर पंप बसविण्यासाठी १५़६५ लाख असा ८५़८७ लाखांचा मनपाने टंचाई आराखडा दिला आहे तर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १७ कोटींचा टंचाई आराखडा दिला आहे़ उजनीमधील पाणीपातळी सध्या वजा २६ टक्के असून १५ आॅगस्टपर्यंत पाऊस न पडल्यास पाणीटंचाई जाणवणार आहे़ सर्व पाणीसाठे फक्त पिण्यासाठी आरक्षित केल्याची माहिती पाटील यांनी दिली़ पाऊस न पडल्यास महापालिकेसाठी उजनीतून साडेचार टीएमसी पाणी सोडावे लागेल; मात्र याबाबत शासन निर्णय घेईल, असेही त्या म्हणाल्या़ --------------------पंढरपूर वगळता सर्व तालुक्यांमध्ये सध्या पिण्यासाठी टँकर सुरू केले आहेत़ सर्वाधिक ४९ टँकर मंगळवेढ्यात असून, ते भरण्यासाठीदेखील पाणी नसल्यामुळे सांगोल्यात टँकर भरावे लागत आहे़ टँकरची संख्या २१२ झाली आहे़ सध्या तरी पाणीसाठे फक्त पिण्यासाठी राखीव ठेवले आहेत. त्यामुळे पाऊस न पडला तर १५ आॅगस्टनंतर पाणीटंचाई जाणवेल़ - ज्योती पाटीलउपजिल्हाधिकारी, नरेगा --------------------------मनपासाठी ८५ लाखांचा आराखडामहापालिकेसाठी ८५.८७ लाखांचा पाणीटंचाई आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. उजनी जलाशयातून दुबार पंपिंगसाठी ३७.३८ लाख, हिप्परगाव तलावातून दुबार पंपिंगसाठी ७.९० लाख, विंधनविहरी घेण्यासाठी २५ लाख त्यावर पंप बसविण्यासाठी १५ लाख या कामांचा आरखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.