शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

राष्ट्रवादीचा जनसंवाद, शिवसेनेचे सदस्य नोंदणी; भाजपकडून सावध चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:20 IST

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागल्यानंतर त्यांच्याच कुटुंबात त्यांची पत्नी किंवा मुलगा विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून ...

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागल्यानंतर त्यांच्याच कुटुंबात त्यांची पत्नी किंवा मुलगा विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारीबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे सांगत उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. शिवाय राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनीही पंढरपुरात आल्यानंतर भाजपचे आजी-माजी आमदार राष्ट्रवादीच्या प्रवेशासाठी संपर्कात असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे पोटनिवडणुकीत उमेदवारी नक्की भालके कुटुंबीयांना मिळणार का? याबाबत कोणीही ठामपणे सांगत नसले तरी त्यांच्या परिवारातच उमेदवारी मिळावी, याबाबत कार्यकर्त्यांचा दबाव पक्षावर नक्कीच आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असे गृहित धरून भगीरथ भालके यांनी जनसंवाद यात्रेद्वारे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात गावभेट दौरा सुरू करीत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर गेल्या दोन महिन्यांपासून महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी पुन्हा शिवसेना सदस्यत्व नोंदणी अभियान राबवित घरोघरी जाऊन नागरिकांचा संपर्क वाढविला आहे. यादरम्यान त्यांनी शिवसेनेचे सोलापूर सहसंपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहरात पक्षाचे कार्यालयही उघडले आहे. शिवाय विविध आंदोलनात सहभाग नोंदवत शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करीत येणाऱ्या पोटनिवडणुकीत आपण स्वत: उतरणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्तेही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. मागीलवेळीही पूर्ण तयारीनिशी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या शिवसेनेला महाआघाडीतही जागा मिळणार का? याबाबत उत्सुकता आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भालके, परिचारक, आवताडे यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाली होती. या निवडणुकीत मात्र भालके परिवारातील उमेदवार पुन्हा तयारीला लागला असताना भाजपाकडून मात्र आवताडे की परिचारक याबाबत स्पष्टता नाही. दोघांकडूनही सावध भूमिका घेत पोटनिवडणुकीविषयी चाचपणी केली जात आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंगळवेढ्यात आवताडे तर पंढरपुरात परिचारक गटाचे प्राबल्य असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय परिचारकांच्या घरात एक आमदारकी असताना दुसऱ्यावेळी भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळणार की दामाजीचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना पुढे केले जाणार, याबाबत दररोज नव्या चर्चा मतदारसंघात रंगत आहेत.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर कल्याणराव काळे यांना विठ्ठल परिवाराची जबाबदारी सांभाळण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते. त्यामुळे काळे पुन्हा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. तेही यामध्ये काही संधी मिळते का? याची चाचपणी करीत आहेत. तर डिव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी गेल्या चार महिन्यांपासून विठ्ठल कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या गावागावात जाऊन कार्यकर्त्यांचे नवीन जाळे तयार केले आहे. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीही त्यांनी वाढविल्या आहेत. त्यामुळे त्यांनीही यामध्ये उतरण्याचे संकेत दिले आहेत.

फोटो :::::::::::::::

भगीरथ भालके, प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, शैला गोडसे, कल्याणराव काळे, अभिजीत पाटील