शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे नेते उजनी धरणग्रस्तांच्या उठले मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

उजनी धरणग्रस्तांच्या जमिनी १९७६ ला संपादित झाल्या आहेत. त्याचवेळी जमिनीचे संपादन झाले. सध्या उजनी धरणग्रस्तांच्या ज्या पूर्वी संपादन केलेल्या ...

उजनी धरणग्रस्तांच्या जमिनी १९७६ ला संपादित झाल्या आहेत. त्याचवेळी जमिनीचे संपादन झाले. सध्या उजनी धरणग्रस्तांच्या ज्या पूर्वी संपादन केलेल्या जमिनी आहेत, त्यावर सरकारी संपादन असे नाव असले तरी आज मूळ धरणग्रस्त शेतकरी स्वतःची जमीन कसत आहेत. त्यामुळे उजनी धरणाची उंची वाढवण्यासाठी कोणताही उजनी धरणग्रस्त बॅकवॉटरवरील शेतकरी आपली स्वतःची संपादित जमीन (फक्त सातबारा स्वतःच्या नावे नसलेली) तो कधीही संपादित करू देणार नाही. त्यासाठी उजनी धरणग्रस्त वेगळा लढा उभा करतील. त्यामुळे उजनी धरणाची उंची वाढवण्याचा जो कोणी प्रयत्न करेल किंवा प्रस्ताव आणेल, त्यास आमचा पूर्णपणे विरोध राहील, असे प्रा. पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या पालकमंत्र्यांच्या भूमिकेला विरोध करताना, त्यांनी ज्या शेतकऱ्यांचे उजनी धरण होतानाचे योगदान आहे, त्यांच्याच मुळावर आपली भूमिका मांडली. उजनी धरणामध्ये इतर ठिकाणांवरून पाणी आणण्याबद्दल ते बोलत नाहीत. उजनीतला गाळ काढून पाणी वाढवण्यावर पण ते बोलले नाहीत. पण, उजनी धरणाच्या गेटची उंची १ मीटरने वाढवली पाहिजे, असे म्हणत आहेत, हे चुकीचे असल्याचे रयत क्रांतीचे म्हणणे आहे.

त्यांचे समर्थन चुकीचे

अगोदरच शेतकरी धरणग्रस्त झाले आहेत. त्यांच्या जमिनींचे अधिग्रहण झाले आहे. १९९३ ला त्यावेळी बॅकवॉटरच्या सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला होता. म्हणून, धरणाच्या गेटची उंची वाढवण्याचे काम थांबले होते.

आताही राजन पाटील धरणाच्या गेटची उंची वाढवण्याचे समर्थन करीत आहेत. ते चुकीचं सांगत आहेत.

शेतकरी हवालदिल

धरणाची उंची वाढवण्यामुळे माढा, करमाळा तालुक्यांतील शेती, रस्ते आणि पुन्हा काही गावे पाण्याखाली जातील. उजनी धरणासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी, घरेदारे व गावांचा त्याग करून धरण स्थापनेमध्ये योगदान आहे. सध्या उर्वरित जमिनीमध्ये कष्ट करून उदरनिर्वाह करतो आहे. धरणाची उंची वाढवण्याच्या वृत्ताने शेतकरी हवालदिल झाला आहे.

-----

पवारांना विरोध करण्याची हिम्मत नाही म्हणून पर्याय

जिल्ह्यातील नेत्यांना कृष्णा नदीतून, निरेतून पाणी आणायला नको, पाणी बाहेरून आणायला नको, हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. जिल्ह्यातील नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांना विरोध करण्याची हिम्मत नाही. म्हणून हा पर्याय सुचवून त्यांनी एक प्रकारे मूक संमतीच दिलेली आहे. याला उजनी बॅकवॉटर वरील सर्व धरणग्रस्थांचा विरोध असेल. वेळप्रसंगी रक्त सांडू पण उजनी धरणाच्या गेटची उंची वाढवू देणार नाही, अशी भूमिका रयत क्रांतीचे जिल्हा संपर्कप्रमुक प्रा. सुहास पाटील यांनी मांडली आहे.