शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करण्यासाठी जनावरे घेऊन भिमा नदीपात्रात आंदोलन

By दिपक दुपारगुडे | Updated: August 23, 2023 13:03 IST

उशाला धरण, पायथ्याला नदी... बाजूला कालवा तरीही गावे पाण्यावाचून उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सोलापूर : उजनीतून भीमा नदीत आणि उजवा व डाव्या कालव्यात पाणी सोडा आणि सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेच्यावतीने माळशिरस तालुक्यातील संगम येथे भीमा नदीच्या कोरड्या पात्रात जनावरे सोबत घेऊन आंदोलन केले.

उशाला धरण, पायथ्याला नदी... बाजूला कालवा तरीही गावे पाण्यावाचून उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे. उजनी धरण, भिमा नदी व उजवा व डावा कालवा कधी काळी सोलापूर जिल्हासाठी जीवनदायिनी ठरलेली व लाखो एकर शेतीला पाणीपुरवठा करून परिसर सुजलाम सुफलाम करणार्या नदीचे पात्र ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप कोरडेच पडले आहे. यामुळे भीमेच्या पाण्यावर अवलंबून असलेली परिसरातील हजारो हेक्टर शेती व नदीकाठच्या गावांच्या पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस, फळबागा, चारा व इतर,पिकांबरोबरच दुष्काळासारखी दाहकता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. परंतु उजनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना आत्ता बसताना दिसत आहे. काहीही करून उजनी धरणातील पाणी भीमा नदीच्या पात्रात व कालव्यात सोडणे आवश्यक आहेत. तसेच दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, नामदेव पराडे, दत्ता साळुंखे, गणेश भिताडे, सागर साळुंखे, मगन भोई, मुकुंद गायकवाड, हरिदास पराडे, देविदास इंगळे, बबन पराडे, लाला भोई, अशोक भोई, सोमनाथ भोई, महादेव पराडे, गोवर्धन भोई, बापू भोई, सोमनाथ इंगळे, अर्जुन लांवड, अंकुश इंगळे, आकाश पराडे, प्रवीण पराडे आदी उपस्थित होते.