शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करण्यासाठी जनावरे घेऊन भिमा नदीपात्रात आंदोलन

By दिपक दुपारगुडे | Updated: August 23, 2023 13:03 IST

उशाला धरण, पायथ्याला नदी... बाजूला कालवा तरीही गावे पाण्यावाचून उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सोलापूर : उजनीतून भीमा नदीत आणि उजवा व डाव्या कालव्यात पाणी सोडा आणि सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेच्यावतीने माळशिरस तालुक्यातील संगम येथे भीमा नदीच्या कोरड्या पात्रात जनावरे सोबत घेऊन आंदोलन केले.

उशाला धरण, पायथ्याला नदी... बाजूला कालवा तरीही गावे पाण्यावाचून उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे. उजनी धरण, भिमा नदी व उजवा व डावा कालवा कधी काळी सोलापूर जिल्हासाठी जीवनदायिनी ठरलेली व लाखो एकर शेतीला पाणीपुरवठा करून परिसर सुजलाम सुफलाम करणार्या नदीचे पात्र ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप कोरडेच पडले आहे. यामुळे भीमेच्या पाण्यावर अवलंबून असलेली परिसरातील हजारो हेक्टर शेती व नदीकाठच्या गावांच्या पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस, फळबागा, चारा व इतर,पिकांबरोबरच दुष्काळासारखी दाहकता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. परंतु उजनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना आत्ता बसताना दिसत आहे. काहीही करून उजनी धरणातील पाणी भीमा नदीच्या पात्रात व कालव्यात सोडणे आवश्यक आहेत. तसेच दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, नामदेव पराडे, दत्ता साळुंखे, गणेश भिताडे, सागर साळुंखे, मगन भोई, मुकुंद गायकवाड, हरिदास पराडे, देविदास इंगळे, बबन पराडे, लाला भोई, अशोक भोई, सोमनाथ भोई, महादेव पराडे, गोवर्धन भोई, बापू भोई, सोमनाथ इंगळे, अर्जुन लांवड, अंकुश इंगळे, आकाश पराडे, प्रवीण पराडे आदी उपस्थित होते.