सोलापूर : केगाव येथे पाण्याच्या टाकीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या मोटरसायकलची धडक बसून चालक आणि पादचारी असे दोघे जण मरण पावल्याची घटना बुधवारी रात्री ११़३० वाजता घडली़ मोटरसायकलस्वार अजिंक्य शिवाजी मोहिते (रा़ वैराग) आणि पादचारी विनायक गोपाळराव रणसुभे (वय ३०, रा़ केगाव, ता़ उत्तर सोलापूर) असे मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत़ या अपघाताबाबत व्यंकटेश गोपाळराव रणसुभे (राख़डकगल्ली, बाळे) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ विनायक रणसुभे हा एमआयडीसी चिंचोळीतून बुधवारी रात्री काम संपवून तो कंपनीच्या बसमधून केगावजवळ आला़ पाण्याच्या टाकीपासून तो घराकडे पायी निघाला होता़ इतक्यात पाठीमागून अजिंक्य हा भरधाव वेगात मोटरसायकल (एम़एच़१३/ बीक़े़९६८०) वरुन येत होता़ यावेळी त्याला मोटरसायकल नियंत्रणात आणता आली नाही आणि विनायकला जोरात धडक बसली़
मोटरसायकल अपघात
By admin | Updated: July 4, 2014 01:32 IST