शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सांगोल्यातील मध्यम, लघू प्रकल्पांत ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:23 IST

त्या-त्या तलावाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू ,मका, हरभरा ही पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवर्तन सोडले जात आहे. ...

त्या-त्या तलावाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू ,मका, हरभरा ही पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवर्तन सोडले जात आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तनाचे नियोजन मार्च महिन्यात केले जाणार आहे.

तालुक्यात शेती व पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पाटबंधारे विभागाकडून बुद्धेहाळ मध्यम, हंगिरगे, घेरडी, जवळा, अचकदाणी, चिंचोली या ठिकाणी लघु प्रकल्पाची निर्मिती केली. त्यामुळे त्या -त्या भागातील लाभक्षेत्र ओलिताखाली आणले. तालुक्यात नेहमीच कमी अधिक पर्जन्यमानामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. परिणामी तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले.

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाबरोबर अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील नद्या, नाले, ओढयांना पूर आल्यामुळे पाण्याची परिस्थिती बदलली. २८ फेब्रुवारीनंतर रब्बी हंगाम संपून उन्हाळी हंगाम चालू होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा कमी होत असल्याने शेतीला व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने पाटबंधारे विभागाकडून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून शेती पिकांना पाणी दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार टेंभू योजनेतून बुद्धेहाळ तलावात तर म्हैसाळ योजनेतून घेरडी हंगिरगे जवळा तसेच नीरा उजवा कालव्यातून चिंचोली या तलावात पाणी सोडून भरून घेण्याचे नियोजन आहे.

चिंचोली तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी पाणी वापर संस्था निर्माण केल्याने उन्हाळी पिकांबरोबरच फळबागांना पाण्याची मागणी वाढणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी चार अवर्तनाची मागणी गृहीत धरून उपलब्ध पाणीसाठा मागणीचा विचार करता पुरेल इतका पाणीसाठा बुद्धेहाळ प्रकल्पात शिल्लक आहे. तरीही पाण्याची कमरता भासण्याची शक्यता निर्माण झाल्यास टेंभू योजनेतून पाणी सोडून भरून घेण्याचे नियोजन असल्याचे अभियंता बी. एल. केंगार यांनी सांगितले.

प्रकल्पातील पाणीसाठा

तालुक्यातील मध्यम व लघु पाटबंधारे तलावातील उपलब्ध पाणीसाठा व टक्केवारी

बुद्धेहाळ ५३० दलघफू (७९ टक्के ), घेरडी ६०.९३ दलघफू (७०.१७ टक्के), हंगिरगे १९.८० दलघफू (४२.०८ टक्के), जवळा ३४.७८ दलघफू (७४.४९ टक्के), अचकदाणी ३६.२३ दलघफू (७५.९५ टक्के), चिंचोली ७९.७५ दलघफू (७३.८३ टक्के) असा पाणीसाठा उपलब्ध आहे.