शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

सांगोल्यातील मध्यम, लघू प्रकल्पांत ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:23 IST

त्या-त्या तलावाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू ,मका, हरभरा ही पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवर्तन सोडले जात आहे. ...

त्या-त्या तलावाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू ,मका, हरभरा ही पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवर्तन सोडले जात आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तनाचे नियोजन मार्च महिन्यात केले जाणार आहे.

तालुक्यात शेती व पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पाटबंधारे विभागाकडून बुद्धेहाळ मध्यम, हंगिरगे, घेरडी, जवळा, अचकदाणी, चिंचोली या ठिकाणी लघु प्रकल्पाची निर्मिती केली. त्यामुळे त्या -त्या भागातील लाभक्षेत्र ओलिताखाली आणले. तालुक्यात नेहमीच कमी अधिक पर्जन्यमानामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. परिणामी तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले.

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाबरोबर अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील नद्या, नाले, ओढयांना पूर आल्यामुळे पाण्याची परिस्थिती बदलली. २८ फेब्रुवारीनंतर रब्बी हंगाम संपून उन्हाळी हंगाम चालू होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा कमी होत असल्याने शेतीला व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने पाटबंधारे विभागाकडून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून शेती पिकांना पाणी दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार टेंभू योजनेतून बुद्धेहाळ तलावात तर म्हैसाळ योजनेतून घेरडी हंगिरगे जवळा तसेच नीरा उजवा कालव्यातून चिंचोली या तलावात पाणी सोडून भरून घेण्याचे नियोजन आहे.

चिंचोली तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी पाणी वापर संस्था निर्माण केल्याने उन्हाळी पिकांबरोबरच फळबागांना पाण्याची मागणी वाढणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी चार अवर्तनाची मागणी गृहीत धरून उपलब्ध पाणीसाठा मागणीचा विचार करता पुरेल इतका पाणीसाठा बुद्धेहाळ प्रकल्पात शिल्लक आहे. तरीही पाण्याची कमरता भासण्याची शक्यता निर्माण झाल्यास टेंभू योजनेतून पाणी सोडून भरून घेण्याचे नियोजन असल्याचे अभियंता बी. एल. केंगार यांनी सांगितले.

प्रकल्पातील पाणीसाठा

तालुक्यातील मध्यम व लघु पाटबंधारे तलावातील उपलब्ध पाणीसाठा व टक्केवारी

बुद्धेहाळ ५३० दलघफू (७९ टक्के ), घेरडी ६०.९३ दलघफू (७०.१७ टक्के), हंगिरगे १९.८० दलघफू (४२.०८ टक्के), जवळा ३४.७८ दलघफू (७४.४९ टक्के), अचकदाणी ३६.२३ दलघफू (७५.९५ टक्के), चिंचोली ७९.७५ दलघफू (७३.८३ टक्के) असा पाणीसाठा उपलब्ध आहे.