शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

सांगोल्यातील मध्यम, लघू प्रकल्पांत ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:23 IST

त्या-त्या तलावाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू ,मका, हरभरा ही पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवर्तन सोडले जात आहे. ...

त्या-त्या तलावाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू ,मका, हरभरा ही पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवर्तन सोडले जात आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तनाचे नियोजन मार्च महिन्यात केले जाणार आहे.

तालुक्यात शेती व पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पाटबंधारे विभागाकडून बुद्धेहाळ मध्यम, हंगिरगे, घेरडी, जवळा, अचकदाणी, चिंचोली या ठिकाणी लघु प्रकल्पाची निर्मिती केली. त्यामुळे त्या -त्या भागातील लाभक्षेत्र ओलिताखाली आणले. तालुक्यात नेहमीच कमी अधिक पर्जन्यमानामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. परिणामी तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले.

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाबरोबर अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील नद्या, नाले, ओढयांना पूर आल्यामुळे पाण्याची परिस्थिती बदलली. २८ फेब्रुवारीनंतर रब्बी हंगाम संपून उन्हाळी हंगाम चालू होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा कमी होत असल्याने शेतीला व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने पाटबंधारे विभागाकडून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून शेती पिकांना पाणी दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार टेंभू योजनेतून बुद्धेहाळ तलावात तर म्हैसाळ योजनेतून घेरडी हंगिरगे जवळा तसेच नीरा उजवा कालव्यातून चिंचोली या तलावात पाणी सोडून भरून घेण्याचे नियोजन आहे.

चिंचोली तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी पाणी वापर संस्था निर्माण केल्याने उन्हाळी पिकांबरोबरच फळबागांना पाण्याची मागणी वाढणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी चार अवर्तनाची मागणी गृहीत धरून उपलब्ध पाणीसाठा मागणीचा विचार करता पुरेल इतका पाणीसाठा बुद्धेहाळ प्रकल्पात शिल्लक आहे. तरीही पाण्याची कमरता भासण्याची शक्यता निर्माण झाल्यास टेंभू योजनेतून पाणी सोडून भरून घेण्याचे नियोजन असल्याचे अभियंता बी. एल. केंगार यांनी सांगितले.

प्रकल्पातील पाणीसाठा

तालुक्यातील मध्यम व लघु पाटबंधारे तलावातील उपलब्ध पाणीसाठा व टक्केवारी

बुद्धेहाळ ५३० दलघफू (७९ टक्के ), घेरडी ६०.९३ दलघफू (७०.१७ टक्के), हंगिरगे १९.८० दलघफू (४२.०८ टक्के), जवळा ३४.७८ दलघफू (७४.४९ टक्के), अचकदाणी ३६.२३ दलघफू (७५.९५ टक्के), चिंचोली ७९.७५ दलघफू (७३.८३ टक्के) असा पाणीसाठा उपलब्ध आहे.