मोहोळ पं़ स़ निवडणुक : राजन पाटील यांच्याविरोधात डोंगरे, महाडिक यांनी दंड थोपटलेअशोक कांबळे - मोहोळ१९६२ साली स्थापन झालेल्या तालुका पंचायत समितीवर गेली ५५ वर्षे एकहाती सत्ता उपभोगण्यात काँग्रेस व राष्ट्रवादीने यश मिळविले आहे. आजतागायत १३ सभापती पंचायत समितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या माध्यमातून खुर्चीवर बसले आहेत. तालुक्यातील सोसायट्यांपासून ते दूध संघापर्यंत ते आमदारकीपर्यंत आजतागायत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजी आमदार राजन पाटील यांनी व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी एकहाती सत्ता ठेवण्यात यश मिळविले आहे. आजतागायत राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्ष एका बाजूला येऊन प्रत्येक निवडणुकीत लढले आहेत. तरी राष्ट्रवादीची बाजू भक्कम टिकवून ठेवण्यात या दोन्ही नेत्यांना यश आले आहे, परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे विजयराज डोंगरे यांच्या गटाने माजी आमदार राजन पाटील यांच्याच विरोधात दंड थोपटून राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे व अन्य समविचारी संघटना एकत्रित येऊन राजन पाटील यांना आवाहन केले आहे.
पूर्वाश्रमीचे कट्टर विरोधक असणारे सेना व भाजपही राष्ट्रवादीच्या विरोधात नव्या ताकदीने उभे आहेत. या सर्वांच्या विरोधकांच्या विरोधात एकला चलो रे म्हणत राजन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून हे आव्हान स्वीकारले आहे. अशा स्फोटक वातावरणात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आजतागायत टिकवून ठेवलेले यश पुन्हा मिळविण्यात राजन पाटील यशस्वी होणार का? की सर्व विरोधक मिळून राष्ट्रवादीची सत्ता हिसकावून घेणार का ? या निवडणुकीकडे तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.गत २०१२ साली झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील राष्ट्रवादीची सत्ता रोखण्यासाठी भीमा परिवाराचे नेते धनंजय मडाडिक यांनी लक्ष घालून सेना भाजपसह सर्व पक्षांना बरोबर घेऊन आघाडी स्थापन केली होती. या आघाडीला पंचायत समितीच्या १४ पैकी ७ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीला रोखण्यात चांगले यश मिळाले होते. जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी तीन जागा मिळविण्यात यश मिळविले होते. पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी चिठ्ठी निघाली अन् भारत गायकवाड सभापती झाले होते. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीने वर्चस्व दाखवित आमदार रमेश कदम यांना निवडून आणले.---------------------------मोहोळ गट नगरपरिषदेत विलीनमोहोळ जिल्हा परिषदेचा गट हा मोहोळ नगरपरिषदेत विलीन झाला. मोहोळ नगरपरिषदेवर आजही पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आहे. एक जिल्हा परिषद गट कमी झाल्याने पंचायत समितीच्या बारा जागा व जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये आष्टी जिल्हा परिषद मतदार २७९११, अनगर जिल्हा परिषद गट मतदार २८१४८, नरखेड जिल्हा परिषद गट मतदार ३५२९५, कामती (बु.) जिल्हा परिषद मतदार ३०१४७, पेनूर जिल्हा परिषद गट मतदार ३००१७, कुरुल जिल्हा परिषद गट मतदार ३००५०, एकूण मतदार १८१५६८़-------------------------आघाडी आणि युती...गत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सेना, भाजपा, काँग्रेस, रिपाइं, भीमा परिवार असे सर्वजण एकत्र होते. परंतु या निवडणुकीत तालुक्यातील सेना व भाजपाची ताकद वाढल्याने सेना व भाजपा युती करुन चिन्हावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीची ताकद कमी झाली आहे.------------------------पंचायत समितीआष्टी- १४०५०, खंडाळी १३८६१, पोखरापूर १५५८४, अनगर १२५६४, नरखेड १८९५५, कोळेगाव १६३४०, सावळेश्वर १५९५०, कामती १४९१७, पेनूर -१५९८३, टाकळी १४०३४, कुरुल १५२३१, घोडेश्वर १४८१९ पंचायत समितीसाठी मतदार आहेत.----------------------सोयीनुसार निर्णयआजमितीला मनोहर डोंगरे व भीमा परिवार यांची आघाडी आहे. तर सेना-भाजपाची वेगळी आघाडी आहे. इतर मित्रपक्ष व संघटना आपल्या सोयीनुसार निर्णय घेत आहेत. सर्वच पक्षांमध्ये आपापल्या पद्धतीने व्यूहरचना आखली जात असून, राष्ट्रवादीच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्वजण प्रश्न करताना दिसून येत आहेत. हे सर्व पक्ष अखेर एकत्र येऊन राष्ट्रवादीला धडा शिकविणार का, विरोधकांच्या अंतर्गत कुरघोडींचा फायदा घेत पुन्हा राष्ट्रवादीचा बोलबाला होणार का, हे चित्र आज तरी गुलदस्त्यात असून, या रंगतदार निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.