शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

नियामक मंडळाच्या बैठकीला आमदारांची दांडी

By admin | Updated: July 11, 2014 01:40 IST

दोन आमदार हजर : उद्दिष्ट १४,४४३ घरांचे, झाली अवघी ३४१ घरे

सोलापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने गुरुवारी आयोजित केलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीस आमदार आणि खासदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित असताना आ़ गणपतराव देशमुख आणि आ़ बबनराव शिंदे हे दोन आमदार वगळता उर्वरित लोकप्रतिनिधींनी बैठकीला दांडी मारली़ केंद्राने देखील या योजनेकडे हात आखडता घेतल्यामुळे दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबांच्या घरांचे स्वप्न धुळीस मिळत आहे़जि़प़ अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नियामक मंडळाची तिमाही बैठक पार पडली़ यामध्ये गरिबांच्या घरांसाठी केंद्राच्या असणाऱ्या इंदिरा आवास आणि राजीव निवारा या योजनांबद्दल चर्चा झाली़ सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील बीपीएल कुटुंबांसाठी १४ हजार ४४३ घरे बांधण्याचे नियोजन केले होते, मात्र केंद्राने हे उद्दिष्ट कमी केले़ त्यामुळे उद्दिष्ट १४४३ वर आले़ या घरांसाठी केंद्राकडून ५२ हजार ५०० तर राज्याकडून ३७ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते़ या १४४३ पैकी ३४१ घरकुले पूर्ण झाली असून, उर्वरित ११४२ घरकुले अपूर्ण असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली़ -------------------------आ़ बबनराव शिंदेंचा ठिय्यामाढा तालुक्यातील रखडलेल्या विविध कामांबद्दल आ़ बबनराव शिंदे यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या मांडला होता़ रस्ते, तीर्थक्षेत्र योजनेतील कामे तातडीने सुरू करा, असे आदेश त्यांनी बांधकाम विभागातील संजय माळी यांना दिले़ आम्ही वारंवार पाठपुरावा करतो, काही कारणास्तव कामे सुरू होत नाहीत़ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि माढा तालुक्यातील आम्ही दिलेल्या प्रस्तावानुसार कामे सुरू करावीत, असे त्यांनी सांगितले़ यावेळी जि़प़ अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी, समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते़ सन २०१३-१४ या वर्षासाठी १४ हजार ४४३ घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते़ त्याप्रमाणे प्रशासकीय मान्यता दिली मात्र केंद्राने हे उद्दिष्ट १४४३ वर आणले़ त्यामुळे दारिद्र्यरेषेखाली अनेक लोकांना घरे मिळणे अवघड झाले आहे़ याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़- डॉ़ निशिगंधा माळीजि़ प़ अध्यक्षा