शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

अल्पभूधारकांना पंचायत समितीने घडवली अद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST

सोलापूर : अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण अहिल्यादेवी सिंचन योजनेतून खोदलेल्या विहीर लाभार्थ्यांना उत्तर तालुका ...

सोलापूर : अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण अहिल्यादेवी सिंचन योजनेतून खोदलेल्या विहीर लाभार्थ्यांना उत्तर तालुका पंचायत समितीने चांगलीच अद्दल घडवली आहे. विहिरींची कामे पूर्ण करून दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी शेतकऱ्यांना पैसे देण्यास तयार नाहीत. पूर्ण विहिरीचे पैसे मिळत नाहीत व मंजूर विहिरींची कामे सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने योजनाच ठप्प झाली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी, बीबीदारफळ, रानमसले, भागाईवाडी, गावडीदारफळ, एकरुख, हगलूर, हिरज, कळमण, नान्नज, पडसाळी व पाकणी या १२ गावांत ७२ विहिरींना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये मंजुरी दिली. २ जानेवारी रोजी भागाईवाडी व बीबीदारफळच्या चार शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर ८ मार्च, २४ जुलै व ९ सप्टेंबर अशा ७२ विहिरी मंजूर केल्या. सीईओंनी मंजूर केलेल्या विहिरी पूर्ण करण्याची जबाबदारी पंचायत समितीची आहे.

मंजूर विहिरींची कामे सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांना अकुशल कामाचे पैसे मिळताना अनेक अडचणी आल्या. त्यातूनही शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे खर्चून विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. याला दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. दीड वर्षापासून हे शेतकरी रोजगार सेवक, ग्रामसेवक, सरपंच व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना भेटत आहेत. मात्र कुशल कामाचे साधारण दीड व त्यापेक्षा अधिक रक्कम मिळत नाही. एकतर शासनाकडून मिळणाऱ्या पैशातून विहिरीचे काम होत नसल्याने काही रक्कम पदरची घालावी लागते. शिवाय मिळणारी रक्कमही दीड वर्षापासून अडकल्याने शेतकऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. पूर्ण झालेल्या २४ विहिरींचे पैसे मिळत नाहीत. शिवाय पूर्ण झालेल्या विहिरींचे पैसे मिळत नसल्याने सुरू असलेली कामेही शेतकऱ्यांनी बंद केली आहेत. त्यामुळे अर्धवट स्थितीत विहिरींची कामे थांबली आहेत.

---

सही करणाऱ्यांची अपेक्षा..

गरिबांचे घरकुल असो अथवा अल्पभूधारक शेतकऱ्यांची विहीर असो सही करणाऱ्या प्रत्येकालाच अपेक्षा असते. त्यामुळे घरकुल व विहिरींना मिळ्णाऱ्या पैशातून काही रक्कम अशीच जाते.

---

४८ विहिरींची कामे अर्धवट

बीबीदारफळ व गावडीदारफळ प्रत्येकी पाच, रानमसले व पडसाळी प्रत्येकी चार, अकोलेकाटी व कळमण प्रत्येकी दोन, साखरेवाडी येथील एक अशा २४ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.

४८ विहिरींची कामे मागील दोन वर्षांपासून अर्धवट आहेत. पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी कोणी स्वतःचे, कोणी व्याजाने तर कोणी उसनवारीच्या पैशातून विहिरीचे काम पूर्ण केले. त्यांचेच पैसे दोन वर्षांपासून मिळत नसल्याने उर्वरित शेतकरीही कामे पूर्ण करण्याचे धाडस करीत नाहीत.

---

मंजूर विहिरींचे काम पूर्ण करा म्हणून अधिकाऱ्यांनी तगादा लावला. चार लाख खर्च केले. एक लाख ६० हजार रुपये मिळाले. बिडीओ शेख यांना सांगितले तरी बिल मिळत नाही. कोणाला भेटले तर पैसे मिळतील?.

- जयश्री आबा लामकाने

अकोलेकाटी, लाभार्थी