शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

अल्पभूधारकांना पंचायत समितीने घडवली अद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST

सोलापूर : अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण अहिल्यादेवी सिंचन योजनेतून खोदलेल्या विहीर लाभार्थ्यांना उत्तर तालुका ...

सोलापूर : अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण अहिल्यादेवी सिंचन योजनेतून खोदलेल्या विहीर लाभार्थ्यांना उत्तर तालुका पंचायत समितीने चांगलीच अद्दल घडवली आहे. विहिरींची कामे पूर्ण करून दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी शेतकऱ्यांना पैसे देण्यास तयार नाहीत. पूर्ण विहिरीचे पैसे मिळत नाहीत व मंजूर विहिरींची कामे सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने योजनाच ठप्प झाली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी, बीबीदारफळ, रानमसले, भागाईवाडी, गावडीदारफळ, एकरुख, हगलूर, हिरज, कळमण, नान्नज, पडसाळी व पाकणी या १२ गावांत ७२ विहिरींना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये मंजुरी दिली. २ जानेवारी रोजी भागाईवाडी व बीबीदारफळच्या चार शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर ८ मार्च, २४ जुलै व ९ सप्टेंबर अशा ७२ विहिरी मंजूर केल्या. सीईओंनी मंजूर केलेल्या विहिरी पूर्ण करण्याची जबाबदारी पंचायत समितीची आहे.

मंजूर विहिरींची कामे सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांना अकुशल कामाचे पैसे मिळताना अनेक अडचणी आल्या. त्यातूनही शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे खर्चून विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. याला दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. दीड वर्षापासून हे शेतकरी रोजगार सेवक, ग्रामसेवक, सरपंच व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना भेटत आहेत. मात्र कुशल कामाचे साधारण दीड व त्यापेक्षा अधिक रक्कम मिळत नाही. एकतर शासनाकडून मिळणाऱ्या पैशातून विहिरीचे काम होत नसल्याने काही रक्कम पदरची घालावी लागते. शिवाय मिळणारी रक्कमही दीड वर्षापासून अडकल्याने शेतकऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. पूर्ण झालेल्या २४ विहिरींचे पैसे मिळत नाहीत. शिवाय पूर्ण झालेल्या विहिरींचे पैसे मिळत नसल्याने सुरू असलेली कामेही शेतकऱ्यांनी बंद केली आहेत. त्यामुळे अर्धवट स्थितीत विहिरींची कामे थांबली आहेत.

---

सही करणाऱ्यांची अपेक्षा..

गरिबांचे घरकुल असो अथवा अल्पभूधारक शेतकऱ्यांची विहीर असो सही करणाऱ्या प्रत्येकालाच अपेक्षा असते. त्यामुळे घरकुल व विहिरींना मिळ्णाऱ्या पैशातून काही रक्कम अशीच जाते.

---

४८ विहिरींची कामे अर्धवट

बीबीदारफळ व गावडीदारफळ प्रत्येकी पाच, रानमसले व पडसाळी प्रत्येकी चार, अकोलेकाटी व कळमण प्रत्येकी दोन, साखरेवाडी येथील एक अशा २४ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.

४८ विहिरींची कामे मागील दोन वर्षांपासून अर्धवट आहेत. पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी कोणी स्वतःचे, कोणी व्याजाने तर कोणी उसनवारीच्या पैशातून विहिरीचे काम पूर्ण केले. त्यांचेच पैसे दोन वर्षांपासून मिळत नसल्याने उर्वरित शेतकरीही कामे पूर्ण करण्याचे धाडस करीत नाहीत.

---

मंजूर विहिरींचे काम पूर्ण करा म्हणून अधिकाऱ्यांनी तगादा लावला. चार लाख खर्च केले. एक लाख ६० हजार रुपये मिळाले. बिडीओ शेख यांना सांगितले तरी बिल मिळत नाही. कोणाला भेटले तर पैसे मिळतील?.

- जयश्री आबा लामकाने

अकोलेकाटी, लाभार्थी