शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत राज मंत्रालयाने घेतली चिंचणीच्या कोविड व्यवस्थापन, वृक्षारोपणाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:19 IST

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव सातारा जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यातून विस्थापित झाल्यानंतर पिराची कुरोलीच्या माळावर त्याचे पुनर्वसन करण्यात आले. ...

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव सातारा जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यातून विस्थापित झाल्यानंतर पिराची कुरोलीच्या माळावर त्याचे पुनर्वसन करण्यात आले. ओसाड माळावर वसलेल्या या गावातील नागरिकांनी मोठ्या कष्टाने नंदनवन फुलवले आहे. विविध प्रकारची हजारो झाडे लावली आहेत. रेन हार्वेस्टिंग, सौरऊर्जा प्रकल्प, औषधी वनस्पती, पशु-पक्ष्यांचे संगोपन याशिवाय अनेक लोकाभिमुख पर्यावरणपूरक उपक्रम या गावाने स्वखर्चातून राबविले आहेत. त्यामुळे हे गाव राज्यभरात चर्चेत आले आहे.

सध्या देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेकडो जणांना प्राण गमवावे लागले असताना या महामारीच्या काळात चिंचणी गाव मात्र कोरोनामुक्त राहिले आहे. ग्रामस्थांनी कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्याने गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. गावच्या या कार्याची दखल केंद्रीय पंचायत राज विभागाने घेतली आहे.

शुक्रवारी पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गोवा, दिल्ली आदी राज्यांतील मोजक्याच गावातील नागरिकांशी कोरोना महामारी, पर्यावरण आदी विषयांवर संवाद साधला. यामध्ये राज्यातील चंद्रपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील काही नागरिकांशी संवाद साधला. यात चिंचणी, हिवरेबाजार आदी गावांचा समावेश होता.

या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह चिंचणीचे ग्रामस्थही गावातूनच सहभागी झाले होते. यामध्ये हिवरेबाजारची माहिती पोपटराव पवार यांनी तर चिंचणी गावाची माहिती मोहन अनपट यांनी पंचायत राज विभागाच्या सचिवांना दिली. ही माहिती ऐकून ते चांगलेच प्रभावित झाल्याचे यावेळी दिसून आले.

हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा संवाद संपल्यानंतर केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवांनी स्वत: फोन करून गावाची माहिती, फोटो मागवून घेतले आणि आपल्या ट्विटर हँडलवर ३ वेगवेगळ्या पोस्ट करत चिंचणीच्या कामाचे कौतुक केले आहे. शिवाय, गावातील स्वच्छता, वृक्षराजी, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, प्रशस्त आणि दुतर्फा झाडांनी बहरलेले रस्ते, स्मशानभूमी यांचे फोटोही शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चिंचणी हे गाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जात असून, गावाने केलेल्या या प्रयत्नांची दखल केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने घेतली असल्याने ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले आहे.

देशपातळीवर मॉडेल गाव

देशात काही राज्यातील अनेक गावांना नैसर्गिक वारसा लाभला आहे. त्या जोरावर तेथे पर्यटन केंद्र उभारत स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, स्वत:चा नैसर्गिक वारसा सोडून माळरानावर पुनर्वसन झाल्यानंतरही तेथे पुन्हा त्याच जोमाने नैसर्गिक वातावरण उभा करणे ही सोपी गोष्ट नाही. हे काम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील चिंचणीने केले असल्याचे देशाच्या पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले. या गावाची सध्याची वाटचाल पाहता पुढील काळात हे गाव देशपातळीवर मॉडेल म्हणून नावारूपास येईल, असे कौतुक केले.