शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

राज्याचे मंत्री म्हणतात कोरोना नाही, तर व्यापाऱ्यांची दुकाने बंद का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:23 IST

पंढरपूर येथे व्यापारी कमिटीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी आ. परिचारक यांच्याजवळ मांडल्या. यावेळी ...

पंढरपूर येथे व्यापारी कमिटीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी आ. परिचारक यांच्याजवळ मांडल्या. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. यावेळी समाधान आवताडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड, उपाध्यक्ष सत्यविजय मोहळकर, दीपक शेटे, राजेश कपडेकर, दिगंबर गडम, एम. पाटील, वसंतराव जवंजाळ उपस्थित होते.

पुढे परिचारक म्हणाले, विठ्ठल मंदिरामुळे पंढरपुरातील व्यापारी जगतात. आता पुन्हा मंदिर पुन्हा बंद केले आहे. यामुळे व्यवसाय मंदावला आहे. अशातच सरकारने लॉकडाऊन करत दुकाने बंदचे आदेश काढले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली. यामुळे तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असेल तर करा आम्ही दुकाने उघडणार, असा पवित्रा पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

----

कोरोना आहे तर निवडणुका कशाला लावल्या?

निर्बंध घालून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनला विरोध करत दुकाने उघडण्याचा निर्णय पंढरपूरमधील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. कोरोना आहे तर निवडणुका कशाला लावल्या असा सवाल देखील आ. परिचारक यांनी सरकारला केला.

हिटलरशाही लॉकडाऊन : धोत्रे

देशात पुण्यात जादा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ते पुणे शहर सुरु आहे. मात्र सोलापूर जिल्हा लॉकडाऊन करण्याचे काम प्रशासनाने केले आहे. वर्षभरापासून व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या हिटलरशाही पद्धतीच्या लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे संसार उदध्वस्त करण्याचे काम प्रशासनाकडून होत असल्याचाआरोप मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे केला.

----

राष्ट्रवादीचा असफल प्रयत्न

व्यापारी कमिटीची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते व्यापारी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी भट्टड यांना उपमुख्यमंत्री तुमच्याशी बोलतील म्हणून फोन लावून देण्याचा प्रयत्न केला मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक सुरु होती. यामुळे त्यांचे बोलणे झाले नाही. पवार तुम्हाला पुन्हा बोलतील असा निरोप देण्यात आला. दरम्यान आ. परिचारकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोन लावून देण्याचे आश्वासन दिले मात्र व्यापारी आपल्या भूमिकेवर ठार राहिले.