शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

उजनी धरणातील लाखो मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST

भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण गेली महिनाभर पाण्याच्या वादाने चर्चेत असतानाच आता दूषित पाण्याचा फटका उजनी धरणातील माशांना ...

भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण गेली महिनाभर पाण्याच्या वादाने चर्चेत असतानाच आता दूषित पाण्याचा फटका उजनी धरणातील माशांना बसला आहे. पावसाळ्यात पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरामधून व एमआयडीसीतून सोडलेले केमिकल्स उजनी धरणाच्या तळाशी साठलेले असते; परंतु अशा प्रकारे मोठे वारे अथवा धरणातील पाणीसाठा मृत झाला की हा केमिकल्सचा गाळ वरती येतो, हे पाणी हिरवट होते. त्यामुळे धरणातील अनेक सजीव मृत्यू पावतात. त्यामुळे उजनीतील अनेक दुर्मिळ जातीचे लाखो मासे मरून खच पडला आहे. या पाण्याचा अत्यंत घाण वास मारत असून यामुळे उजनीतील अनेक प्रकारच्या माशांचा जसे की दुर्मिळ मासे, औषधी गुणधर्म असणारे आहेर जातीचा मासा, कटला, मरळ, शिंगाडा, वांब,खद्री, डोकडा या जातीचे मासे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उजनी जलाशयाच्या किनारी तर माशांचा खच पडला असून यामुळे परिसरात पाण्याची दुर्गंधी व मेलेल्या माशांची दुर्गंधी पसरली आहे या दूषित पाण्याचा पिकांना सुद्धा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे उजनीच्या काठावरील शेतकरी वर्गाने धसका घेतला आहे.

-----

कोट

अशाप्रकारे उजनीतील मासे प्रदूषित पाण्याने मेले तर मत्स्य व्यवसाय संपुष्टात येईलच व यावर अवलंबून असणारे अनेक संसार उद्ध्वस्त होतील; प्रशासनाने पाणी शुद्ध करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात व मत्स्यबीज धरणात प्रत्येक वर्षी सोडावेत.

- संजय पाटील, माजी कृषी व पशुसंवर्धन

कोट

पुणे, पिंपरी चिंचवड, इंदापूर, शिरूर, बारामती, दौंड, लोणावळा, हवेली सांडपाणी नदीत येते, त्याचबरोबर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील १९४ गावे व शेती यासाठी कसलीही प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्यामुळे हे पाणी उजनीत येते, पुण्यामध्ये अनेक कंपन्या छोट्या-मोठ्या तलावांमधून हे केमिकल पाणी साठवून ठेवतात व पावसाळ्यात सोडून देतात यामुळे उजनीतील पाणी गेली दहा ते बारा वर्ष दूषित झालेले पाहायला मिळते.

- अनिल पाटील, जलतज्ज्ञ, वरवडे, ता.माढा

----

फोटो : १८ भीमनगर