शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

उजनी धरणातील लाखो मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST

भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण गेली महिनाभर पाण्याच्या वादाने चर्चेत असतानाच आता दूषित पाण्याचा फटका उजनी धरणातील माशांना ...

भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण गेली महिनाभर पाण्याच्या वादाने चर्चेत असतानाच आता दूषित पाण्याचा फटका उजनी धरणातील माशांना बसला आहे. पावसाळ्यात पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरामधून व एमआयडीसीतून सोडलेले केमिकल्स उजनी धरणाच्या तळाशी साठलेले असते; परंतु अशा प्रकारे मोठे वारे अथवा धरणातील पाणीसाठा मृत झाला की हा केमिकल्सचा गाळ वरती येतो, हे पाणी हिरवट होते. त्यामुळे धरणातील अनेक सजीव मृत्यू पावतात. त्यामुळे उजनीतील अनेक दुर्मिळ जातीचे लाखो मासे मरून खच पडला आहे. या पाण्याचा अत्यंत घाण वास मारत असून यामुळे उजनीतील अनेक प्रकारच्या माशांचा जसे की दुर्मिळ मासे, औषधी गुणधर्म असणारे आहेर जातीचा मासा, कटला, मरळ, शिंगाडा, वांब,खद्री, डोकडा या जातीचे मासे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उजनी जलाशयाच्या किनारी तर माशांचा खच पडला असून यामुळे परिसरात पाण्याची दुर्गंधी व मेलेल्या माशांची दुर्गंधी पसरली आहे या दूषित पाण्याचा पिकांना सुद्धा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे उजनीच्या काठावरील शेतकरी वर्गाने धसका घेतला आहे.

-----

कोट

अशाप्रकारे उजनीतील मासे प्रदूषित पाण्याने मेले तर मत्स्य व्यवसाय संपुष्टात येईलच व यावर अवलंबून असणारे अनेक संसार उद्ध्वस्त होतील; प्रशासनाने पाणी शुद्ध करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात व मत्स्यबीज धरणात प्रत्येक वर्षी सोडावेत.

- संजय पाटील, माजी कृषी व पशुसंवर्धन

कोट

पुणे, पिंपरी चिंचवड, इंदापूर, शिरूर, बारामती, दौंड, लोणावळा, हवेली सांडपाणी नदीत येते, त्याचबरोबर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील १९४ गावे व शेती यासाठी कसलीही प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्यामुळे हे पाणी उजनीत येते, पुण्यामध्ये अनेक कंपन्या छोट्या-मोठ्या तलावांमधून हे केमिकल पाणी साठवून ठेवतात व पावसाळ्यात सोडून देतात यामुळे उजनीतील पाणी गेली दहा ते बारा वर्ष दूषित झालेले पाहायला मिळते.

- अनिल पाटील, जलतज्ज्ञ, वरवडे, ता.माढा

----

फोटो : १८ भीमनगर