शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

राज्यात दुधाचा दर कोसळला ! ‘महानंद’सह खासगी संघांचा दूध दर २१ रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:30 IST

शासन अखत्यारित ‘महानंद’सह राज्यातील खासगी दूध डेअरी चालकांनी गाईच्या दुधाचा दर २१ रुपये प्रति लिटर केला असून, सहकारी संघाला मात्र प्रति लिटर २७ रुपये दर देण्याबाबतचे बंधन आहे.

ठळक मुद्देदुधाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता खासगी दूध संघांनी २५ रुपयांपेक्षा अधिक दर देणे परवडणार नाहीदुग्धविकास मंत्र्यांचा आदेश झुगारुन दुधाचा दर वारंवार कमी

अरूण बारसकरसोलापूर दि २ : शासन अखत्यारित ‘महानंद’सह राज्यातील खासगी दूध डेअरी चालकांनी गाईच्या दुधाचा दर २१ रुपये प्रति लिटर केला असून, सहकारी संघाला मात्र प्रति लिटर २७ रुपये दर देण्याबाबतचे बंधन आहे. एकीकडे सहकारी संघ मोडित निघत असताना दुधाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.राज्यातील शेतकºयांनी संप केल्यानंतर राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी २१ जून रोजी गाईच्या दुधाचा दर प्रति लिटर २४ रुपयांवरुन २७ रुपये वाढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा वाढीव दर देणे सहकारी संघानेही मान्य केले नव्हते. मात्र शासनाच्या कारवाईच्या भीतीने सहकारी संघाने दूध दरवाढ दिली. ‘महानंद’नेही आठ सप्टेंबरपर्यंत २७ रुपये दराने गाईचे दूध खरेदी केले.  मात्र खासगी दूध संघांनी २५ रुपयांपेक्षा अधिक दर देणे परवडणार नाही, असा पवित्रा घेत दर वाढवून दिला नाही़ ‘महानंद’ने आठ सप्टेंबर रोजी गाईच्या दुधाचा दर २५ रुपयांवर आणला, त्यावेळी खासगी संघांनी दर २३ रुपये केला. त्यानंतर ‘महानंद’ने एक आॅक्टोबरपासून दुधाचा दर २४ रुपये केला. ११ आॅक्टोबरपासून हा दर ‘महानंद’ने २३ रुपये, २१ आॅक्टोबरपासून २२ रुपये व एक नोव्हेंबरपासून २१ रुपये केल्याचे लेखी पत्र काढले आहे. महानंद व खासगी दूध संघांनी गाईच्या दुधाचा दर परवडत नसल्याने २१ रुपयांवर आणला असताना सहकारी संघांनी मात्र २७ रुपयेच दर दिला पाहिजे, असा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे अधिक  दर देऊन कमी दराने दूध विक्री करणे परवडत नसल्याने सहकारी संघांचा सध्या आतबट्ट्याचा व्यवसाय सुरू आहे. असाच प्रकार काही महिने राहिला तर सहकारी दूध संघ मोडित निघतील, अशी भीती महानंदचे संचालक डी. के. पवार यांनी व्यक्त केली.------------------खासगी संघांचा दर कमीएकीकडे शासन अखत्यारित महानंद दुग्धविकास मंत्र्यांचा आदेश झुगारुन दुधाचा दर वारंवार कमी करत २१ रुपयांवर आणत असताना खासगी संघांनी तर शासन आदेशाप्रमाणे दरवाढ न करता ती कमी केली आहे. खासगी दूध संघांनी २१ आॅक्टोबरपासून गाईच्या दुधाचा दर २१ रुपये इतका केला आहे. राज्यात अतिरिक्त झालेल्या दुधाची पावडर तयार करुन ती निर्यात केली पाहिजे तरच दुधाचे दर टिकतील अन्यथा आणखीन खाली येतील. सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होत आहे.- डी. के. पवार, संचालक,महानंद, मुंबई--------------------दुधाचे भविष्य अंधकारमय आहे. दूध पावडर १६० रुपये किलोवर आली तर दूध दर परवडणारा देणे शक्य नाही. शासनच शेतकºयांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या २१ रुपयांचा दर दिला असला तरी तो १८-१९ रुपयेही होऊ शकतो.- दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध-------------------------दररोज तीन लाख रुपयांचा तोटा सहन करुन दूध संकलन सुरू ठेवले आहे. शासनाने २७ रुपयांनी दूध खरेदी करावे किंवा शेतकºयांना थेट अनुदान द्यावे तरच सहकारी संघ व शेतकरी जगणार आहे. अन्यथा खासगी संघांनी उद्या १५ रुपयांनी जरी दुधाला भाव दिला तरी शेतकºयांचा नाईलाज आहे.- आ. प्रशांत परिचारक, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा दूध संघ