शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यात

By admin | Updated: January 31, 2017 17:31 IST

माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यात

माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यातकुर्डूवाडी : आॅनलाईन लोकमत मुंबईत भाजपा-शिवसेनेची युती तुटल्याने माढा तालुक्यात आ. बबनराव शिंदे यांच्या विरोधात ‘महायुती’ करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेला वेगळी चूल मांडण्याचे आदेश पक्षाकडून मिळाले आहेत.माढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा फिवर सध्या गावोगावी वाढत असून ज्यांना नेत्यांनी कानमंत्र दिला आहे, त्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात गाठीभेटी वाढविल्या आहेत; मात्र व ज्या इच्छुकांना उमेदवारीची खात्री नाही त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत नेत्यांजवळ फिल्डिंग सुरू ठेवली आहे.सर्वच वरिष्ठ नेते आपला कार्यकर्ता इतर पक्षात जाऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच पत्ते उघडण्याची शक्यता आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण पुरुष असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे. आ.शिंदे बंधू विरोधात सर्वपक्षीय महायुती असे एकंदर चित्र रंगले होते; मात्र शिवसेना व भाजपा या पक्षांचा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काडीमोड झाला त्याचे पडसाद माढा तालुक्यात उमटतात का याची उत्सुकता लागली आहे. पक्षीय आदेश म्हणून शिवसेनेची वेगळी चूल मांडण्यात येणार आहे त्याबाबत जिल्हास्तरीय नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत.भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी पुढाकार घेत सर्व विरोधकांना एकत्र करून मोट बांधण्याच्या कामात आघाडी घेतली होती; मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ.धनाजीराव साठे, शिवसेना नेते प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, जि.प.चे माजी सभापती संजय पाटील भीमानगरकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर, विजय शुगरचे संचालक भारत पाटील, तालुका पंचायत समितीचे सदस्य भारत शिंदे यांनी एकत्र चर्चा केली पण भूमिका मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे; मात्र हे नेते एकास एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मानेगाव गटातील उमेदवारीवर महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे.शिवसेनेचे संपर्कमंत्री खा. राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते आ.तानाजीराव सावंत हे जो आदेश देतील तो आम्ही पाळू, असे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षानेही सध्या ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे; मात्र वरिष्ठ पातळीवरुन राष्ट्रवादीशी आघाडी झाल्यास रणनीतीत बदल करावा लागणार आहे.------------------------काही जागांचा तिढा कायमआ. बबनराव शिंदे यांनी कारखान्यावर प्रत्येक गावातील नेत्यांना बोलावून त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर काही उमेदवार फायनल केले; मात्र काही जागांचा तिढा अजूनही कायमच आहे. एक नाव पुढे केले की, तो उमेदवार नको म्हणून सांगणारा वर्ग अचानकच पुढे येत असल्यामुळे सर्वांचा मेळ आ. शिंदे कसे घालतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.