शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यात

By admin | Updated: January 31, 2017 17:31 IST

माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यात

माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यातकुर्डूवाडी : आॅनलाईन लोकमत मुंबईत भाजपा-शिवसेनेची युती तुटल्याने माढा तालुक्यात आ. बबनराव शिंदे यांच्या विरोधात ‘महायुती’ करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेला वेगळी चूल मांडण्याचे आदेश पक्षाकडून मिळाले आहेत.माढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा फिवर सध्या गावोगावी वाढत असून ज्यांना नेत्यांनी कानमंत्र दिला आहे, त्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात गाठीभेटी वाढविल्या आहेत; मात्र व ज्या इच्छुकांना उमेदवारीची खात्री नाही त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत नेत्यांजवळ फिल्डिंग सुरू ठेवली आहे.सर्वच वरिष्ठ नेते आपला कार्यकर्ता इतर पक्षात जाऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच पत्ते उघडण्याची शक्यता आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण पुरुष असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे. आ.शिंदे बंधू विरोधात सर्वपक्षीय महायुती असे एकंदर चित्र रंगले होते; मात्र शिवसेना व भाजपा या पक्षांचा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काडीमोड झाला त्याचे पडसाद माढा तालुक्यात उमटतात का याची उत्सुकता लागली आहे. पक्षीय आदेश म्हणून शिवसेनेची वेगळी चूल मांडण्यात येणार आहे त्याबाबत जिल्हास्तरीय नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत.भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी पुढाकार घेत सर्व विरोधकांना एकत्र करून मोट बांधण्याच्या कामात आघाडी घेतली होती; मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ.धनाजीराव साठे, शिवसेना नेते प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, जि.प.चे माजी सभापती संजय पाटील भीमानगरकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर, विजय शुगरचे संचालक भारत पाटील, तालुका पंचायत समितीचे सदस्य भारत शिंदे यांनी एकत्र चर्चा केली पण भूमिका मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे; मात्र हे नेते एकास एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मानेगाव गटातील उमेदवारीवर महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे.शिवसेनेचे संपर्कमंत्री खा. राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते आ.तानाजीराव सावंत हे जो आदेश देतील तो आम्ही पाळू, असे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षानेही सध्या ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे; मात्र वरिष्ठ पातळीवरुन राष्ट्रवादीशी आघाडी झाल्यास रणनीतीत बदल करावा लागणार आहे.------------------------काही जागांचा तिढा कायमआ. बबनराव शिंदे यांनी कारखान्यावर प्रत्येक गावातील नेत्यांना बोलावून त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर काही उमेदवार फायनल केले; मात्र काही जागांचा तिढा अजूनही कायमच आहे. एक नाव पुढे केले की, तो उमेदवार नको म्हणून सांगणारा वर्ग अचानकच पुढे येत असल्यामुळे सर्वांचा मेळ आ. शिंदे कसे घालतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.