शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर ग्रामीण पोलीस साकारताहेत शहिदांचे स्मारक; कोंडी, हिरजला घेतले दत्तक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:04 IST

सोलापूर : समाजातील सज्जनांचे रक्षण आणि खल प्रवृत्तीचा नायनाट करण्याचे ब्रीद घेऊन सेवा देणारे पोलीस आता सामाजिक कार्यातही आघाडीवर ...

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे शहिदांचे स्मारक ग्रामीण पोलीस साकारत आहेतवेल्फेअर विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक नाना कदम हे आपल्या सहकार्यांबरोबर या मोहिमेला मूर्त स्वरूप देत आहेत

सोलापूर : समाजातील सज्जनांचे रक्षण आणि खल प्रवृत्तीचा नायनाट करण्याचे ब्रीद घेऊन सेवा देणारे पोलीस आता सामाजिक कार्यातही आघाडीवर आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अशा कार्यात आपला ठसा  उमटविला असून, स्वयंपूर्ण दत्तक खेडेगाव योजनेंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे शहिदांचे स्मारक ग्रामीण पोलीस साकारत आहेत.

वेल्फेअर विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक नाना कदम हे आपल्या सहकार्यांबरोबर या मोहिमेला मूर्त स्वरूप देत आहेत. त्यांच्या कार्यात गावातील पायाभूत सुविधांचा विकास व लोकसहभागातून सामाजिक विषयांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. यातून या गावातील  मंदिरं व दर्गाहची दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली. गावात दररोज विविध विषयांवर बैठका घेऊन लोकांना गरजेच्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यात येत आहे. 

कोंडी गावाचा विकास करीत असताना आत्तापर्यंत या गावातील तीन जवान शहीद झाल्याचे दिसून आले. यामध्ये हुतात्मा शिवराम गेनू निंबाळकर (सन: १९३९-४५), शहीद रघुनाथ विठोबा भालेकर (सन: १९६९), शहीद मधुकर सोपान भोसले (सन: १९९३) यांचा समावेश आहे. या शहिदांच्या प्रेरणेतून ग्रामस्थांना विकासाचा मार्ग दिसावा म्हणून स्मारक उभारण्याचे ठरले. १ डिसेंबर २०१७ रोजी भाभा अनुसंशोधन केंद्रांचे शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेने या कामाची दखल घेत स्मारकासाठी १२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. 

या निधीतून स्मारक व त्याभोवती बगीचा, ट्रॅक व इतर गोष्टी उभारण्यात येत आहेत. हे काम भाभा अनुसंशोधन केंद्राच्या आकृती या संस्थेमार्फत सुरू आहे. आता स्मारकाचे काम पूर्णत्वावर आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या ठिकाणी शहिदांचे स्मृतीशिल्प उभारण्यात येणार आहे. 

पोलिसांची गरज का ?गावात राजकारण व गट असतात. त्यामुळे विकासाला खीळ बसते. त्यामुळे ग्राम विकासाला पोलिसांनी मदत केली तर गावात बदल होऊ शकतो असा विचार करून दहा वर्षांपासून ग्रामविकासात काम करीत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक नाना कदम यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस