शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

नगराध्यक्षांनी वॉर्डात निवडून येऊन दाखवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:16 IST

बागल गटाचे विरोधी पक्षनेते श्रीनिवास कांबळे, नगरसेविका राजश्री माने, संगीता कांबळे या काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या कामाचे ...

बागल गटाचे विरोधी पक्षनेते श्रीनिवास कांबळे, नगरसेविका राजश्री माने, संगीता कांबळे या काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे शहरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. यावर बागल गटाचे नगरसेवक तांबोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तांबोळी म्हणाले, ‘शहरातील रस्ते, उद्यान, पार्क, वृक्ष लागवड, शौचालय, निधी वाटप हे किती झाले, कसे झाले, कधी झाले, हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. निवडणूक जवळ आली असताना, स्वतःचे कौतुक करून घेऊन, मी किती चांगला हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या बघायला मिळत आहे. नवीन व्यापारी संकुलाला तडे गेल्याचे प्रकरण नगरसेवक सचिन घोलप यांनी उचलताच स्वतःचे कौतुक करून घेण्याचा राजकीय स्टंट नागरिकांना समजत नाही असे समजू नये,’ असेही ते म्हणाले.

तांबोळी म्हणाले, ‘आदिनाथवर टीका करताना जगतापांनी हे लक्षात ठेवावे की, आदिनाथ वर २००६ पर्यंत सत्ता असताना, तुमचे रखडलेले कामगारांचे दोन वर्षांचे पैसे सत्ता आल्यावर बागल गटाने दिले. त्यावेळी तर सहकार क्षेत्रावर आजच्या एवढ्या अडचणी नव्हत्या. बागल गट काही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी बनवलेला गट नाही. स्व.दिगंबरमामा बागल यांच्याविषयीच्या नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या मनातील प्रेमाने तयार झाला आहे. बागल गटाचा कार्यकर्ता स्व.मामांपासून आहे व गट हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभा आहे. त्यामुळे अशा काही लोकांच्या जाण्याने बागल गटाला कोणताही फरक पडत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे सोडून गेले ते का गेले, हे सर्वश्रूत आहे. जनतेला सर्व माहिती आहे, असेही अल्ताफ तांबोळी म्हणाले.