शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

माणुसकी गहिवरली.. बेवारस महिलेचा अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST

दोन दिवसांपूर्वी अक्कलकोट बुधवार पेठ येथील स्वामी समर्थ समाधी मठाजवळ एका ७० वर्षीय अनाथ महिलेचा मृत्यू झाला. ती अनेक ...

दोन दिवसांपूर्वी अक्कलकोट बुधवार पेठ येथील स्वामी समर्थ समाधी मठाजवळ एका ७० वर्षीय अनाथ महिलेचा मृत्यू झाला. ती अनेक वर्षांपासून या ठिकाणी भिक्षा मागून गुजराण करीत होती. तिचा अचानकपणे मृत्यू झाल्याने समाजासमोर आर्थिक परिश्रमाचे प्रश्न निर्माण झाले होते. तेव्हा लहुजी शक्तीसेना अध्यक्ष वसंत देढे व रॉबिड हूड आर्मीचे रशीद खिस्तके, विक्रांत अळोळी, राम लोणारी, आकाश अळोळी, गोटू गवंडी, अनिल किलजे आदींनी तिच्याकडे शोध घेतले असता, ५ हजार ६०० रुपये रोख निघाले. तेव्हा खर्चाचा प्रश्न मिटल्याने कोणाकडेही लोकवर्गणी न करता, अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य, घेऊन जाण्यासाठी लागणारे वाहन आधी प्रकारची सोय करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर हिंदू स्मशानभूमी येथे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

---

राहिलेल्या रकमेतून अन्नदान

तिच्याकडे असलेल्या ५६०० रुपयांपैकी खर्च वजा राहिलेल्या रकमेतून अन्नदान करण्यात येणार आहे. शिवाय ती मृत्यूच्या पश्चातही कोणाची देणेकरी राहिली नाही. हे निराश्रित महिलेच्या बाबतीत विशेष म्हणावे लागेल. तिचे ना गाव, नाव, ना नातेवाईक कोणीच नसताना पुढे येऊन रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करणे म्हणजे सामाजिक कार्याला सलाम करणारी घटना आहे. या कार्यामुळे आजही समाजात माणुसकी शिल्लक असल्याचे अक्कलकोटकरांनी दाखवून दिले आहे.

----

फोटो : २७ अक्कलकोट १

अक्कलकोट बुधवार पेठ येथील समाधी मठाजवळ भिक्षा मागून खाणाऱ्या एका बेवारस मृत महिलेचे अंत्यविधी करताना वसंत देढे, रॉबिडचे रशीद खिस्तके आदी दिसत आहेत.