शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फळे, भाजीपाला साठवणूक व नियातीसाठी व्यवस्था निर्माण करणार : पणनमंत्री सुभाष देशमुख

By admin | Updated: April 21, 2017 18:00 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि. २१ :- फळे, भाजीपाला पिकांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी या मालाची साठवणूक, प्रक्रिया आणि नियातीसाठी मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. फळे, भाजीपाला उत्पादनास हमी भाव मिळावा, यासाठी शासन स्तरावरुन केंद्रशासनाकडे शिफारस करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज आंबा महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी केले.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि कृषी उत्पन बाजार समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील होम मैदान येथे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन पणन मंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर शोभा बनशेट्टी, बाजार समितीचे प्रशासक कुंदन भोळे, पणन मंडळ पुणेचे उपव्यवस्थापक प्रशांत सोनवणे, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवतारे, अविनाश महागावकर, शहाजी पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, आंबा उत्पादक शेतकरी, स्टॉलधारक व नागरिक उपस्थित होते.पणन मंत्री देशमुख म्हणाले, राज्यातील सर्व फळ व भाजीपाला पिकांना बाजार पेठ उपलब्ध करुन देण्यासाठी पणन मंडळ व कृषी उत्पन बाजार समिती मार्फत प्रयत्न केले जातील. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर फळ महोत्सव आयोजित करण्यात येईल. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा, त्याला त्याचे मार्केटिंग करता यावे यासाठी शेतकऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल.ज्यावेळी शेतकऱ्याचा माल विक्रीसाठी उपलब्ध असतो त्यावेळी त्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. यावर मात करण्यासाठी व शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शासनाने शेतीमाल तारण योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन पणन मंत्री देशमुख यांनी केले. या योजनेतून शेतकऱ्याला केवळ सहा टक्के दराने रक्कम मिळते असेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायात पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांबरोबरच गावातील सेवा सोसायट्यांनी एकतरी शेती पूरक व्यवसाय सुरु करुन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावावा. यासाठी आवश्यक असणारी मदत शासन स्तरावरुन केली जाईल, असेही पणन मंत्री देशमुख म्हणाले.सोलापूर येथील आंबा महोत्सवातील सहभागी शेतकऱ्याला आकारण्यात येणाऱ्या स्टॉल भाड्यात ५० टक्के सवलत द्यावी,अशा सूचना पणन मंत्री देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महोत्सवामध्ये सर्व सोलापुरकरांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करावा असे आवाहन देशमुख यांनी केले.शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी शासनस्तरावरुन सकारात्मक निर्णय होत आहे ही कौतुकाची बाब आहे. शेतकऱ्यांचा जीवनात परिवर्तन होण्यास शासनाने फळ व भाजीपाला पिकांनाही हमी भाव देणे गरजचे असल्याचे मत स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवतारे यांनी व्यक्त केले.आंबा महोत्सव सोलापूरकरांसाठी पर्वणी असून पणन मंडळाने घेतलेल्या आंबा महोत्सवास सोलापूरकरांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापौर शोभा बनशेट्टी यांनी केली.