शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मजरेवाडी जि़ प. शाळेवरील पत्रे उडाले

By admin | Updated: May 28, 2014 01:37 IST

५ वर्ग खोल्यांसह पोषण आहार : मुख्याध्यापकांचे कार्यालय उघड्यावर

सोलापूर : मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी वार्‍याचा फटका सर्वसामान्यांच्या घरांबरोबर मजरेवाडीतील जि़ प़ शाळेला बसला आहे़ शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून जाऊन पाच वर्ग खोल्यांसह पोषण आहार आणि मुख्याध्यापकांचे कार्यालय उघड्यावर आले असून आजच्या घटनेने शाळा इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍याचा पाऊस झाला़ मजरेवाडीतील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक कार्यालय, पाच वर्ग खोल्या आणि पोषण आहार खोलीवरील पत्रे उडून जाऊन सारे काही उघड्यावर आले आहे़ हे पत्रे दुसरा पाऊस येण्यापूर्वी बदलले नाहीत तर पोषणआहाराची नासाडी तर होणारच आहे, शिवाय तडा गेलेल्या भिंतीही कोसळणार आहेत़ परिणामत: काही दिवसात भरणारी शाळा ही मैदानावर उघड्यावर असेल़ या शाळेच्या बाजूला राहणार्‍या रहिवासी रईसा शेख यांना शाळेवरचे पत्रे उडताना दिसले़ पत्र्यावरचा मोठा दगड पडल्याने मुख्याध्यापकांच्या टेबलावरील काचेचे तुकडे-तुकडे झाले़ तसेच काही कागदपत्रे आणि दफ्तर भिजल्याचे निदर्शनास आले़ ही घटना शेजार्‍यांकडून कळताच मुख्याध्यापिका खुर्शिद शेख, बालवाडी शिक्षिका विनू गोफणे, मदतनीस मंजुषा गळवे या धावत आल्या़ शिपायाच्या मदतीने सारे साहित्य, दफ्तर आणि पोषण आहार बाजूला केले़ तसेच रात्रभर पाणी बाहेर काढून स्वच्छता करून घेतली़ २६ फे ब्रुवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेवरचे पत्रे अशाच प्रकारच्या वादळी वार्‍यात उडून विद्यार्थी जखमी झाले होते़ त्यामुळे इमारतीबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता़ सुदैवाने शाळांना सुट्ट्या असल्याने सुभाषचंद्र बोस शाळेची पुनरावृत्ती टळली़

-----------------------------

इमारत दुरुस्तीसाठी निधी नाही जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा इमारती या ५० वर्षांपूर्वीच्या आहेत़ आज या शाळा धोकादायक बनल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांची कालमर्यादा संपली तरी अशा शाळांच्या इमारती पाडून नवे वर्ग बांधून द्यायला शासनाकडे पैसे नाहीत़ किरकोळ दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत ५ हजार रुपयांची तरतूद असल्याचे सांगितले जाते, मात्र मोठ्या दुरुस्तीसाठी पैसेच उपलब्ध होत नाहीत़ नियमानुसार पडझडीचे फोटो दिले तरी त्यासाठी खास निधी लवकर उपलब्ध होत नाही़ २००४ पासून वेतनेतर अनुदानच बंद असल्याने अनेक शाळा अडचणीत सापडल्या आहेत़ २००४ पासून शासनाने वेतनेतर अनुदान बंद केल्याने शाळांच्या देखभालीवर कोण खर्च करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जातोय़

-------------------

जिल्ह्यातील जुन्या शाळांच्या दुरु स्तीबाबत काही दिवसांपूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले आहे़ त्यांच्यासाठी खास धोरण आखले आहे़ शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी पैसे उपलब्ध होत आहेत़ त्यानंतर लगेच इस्टीमेटचा आधार घेऊन काम केले जाणार आहे़ तसेच गटशिक्षण अधिकार्‍यांमार्फत मजरेवाडी शाळेची माहिती घेऊन ती दुरुस्त करू. - राजेंद्र बाबर, शिक्षणाधिकारी़