शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुदाम ताब्यात मिळाले त्याच दिवशी मका खरेदी झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:19 IST

केंद्राच्या धोरणानुसार राज्य सरकार हमीभावाने धान्याची खरेदी करते. यंदा राज्यात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारभाव कोसळला, त्यामुळे शेतकऱ्यांची ...

केंद्राच्या धोरणानुसार राज्य सरकार हमीभावाने धान्याची खरेदी करते. यंदा राज्यात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारभाव कोसळला, त्यामुळे शेतकऱ्यांची सारी भिस्त शासनाच्या हमीभाव केंद्रावर मका विक्री करण्याकडे अधिक राहिली आहे. मात्र जिल्ह्यातील मका विक्रीची केंद्रे लवकर बंद केल्याने जवळपास ९० हजार क्विंटल मका शेतकऱ्याकडे पडून आहे. आता खुल्या बाजारात दर कोसळल्याने त्याची विक्री करण्याचा एकच पर्याय त्यांच्यासमोर राहिला आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

बाजारात मक्याचे दर प्रतिक्विंटल १३०० ते १४०० रुपये आहेत. शासनाचा हमीभाव प्रतिक्विंटल १८५० रुपये आहे. खुल्या बाजारात पडेल भावाने विक्री केल्यास शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल ५०० रुपयांपेक्षा अधिक नुकसान होणार आहे. त्यामुळे बंद केलेली हमीभाव केंद्रे तातडीने सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातून होत आहे. जिल्ह्यात अकरा केंद्रातून मका खरेदी करण्यात आला होता. निर्धारित वेळेत केवळ २५ हजार क्विंटल मका शासनाने खरेदी केला आहे.

--------

केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय

अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यात मक्याचे उत्पादन अधिक आहे. या तिन्ही तालुक्यासाठी माळकवठे येथील सोलापूर ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीला हमीभाव खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. कंपनीकडे स्वतःचे गुदाम नव्हते. तहसीलदार अमोल कुंभार यांनी रामवाडी येथील गुदाम त्यासाठी उपलब्ध करून दिले. केंद्राने राज्यासाठी चार लाख मे. टन मका खरेदीचा इष्टांक दिला होता. तो पूर्ण झाल्याने गुदाम मिळाले, त्याच दिवशी खरेदी बंद केल्याचे पत्रही मिळाल्याने केंद्र उघडता आले नाही. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.

----------

खरेदीचा इष्टांक पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील मका हमीभाव केंद्रे बंद करावी लागली. अद्याप ८० ते ९० हजार क्विंटल मका शेतकऱ्याकडे शिल्लक आहे. त्यासाठी शासनाकडे वाढीव मुदत मागितली आहे.

-बी.बी. वाडीकर, जिल्हा पणन अधिकारी, सोलापूर

--------

मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष

जिल्ह्यातून मका विक्रीसाठी नोंदी केलेल्या २७९ शेतकऱ्यांकडे मका विक्री न झाल्याने शिल्लक आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून मका विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे, मात्र केंद्राचा हिरवा कंदील मिळाल्याशिवाय आणि राज्याला खरेदीसाठी वाढीव इष्टांक मिळाल्याशिवाय खरेदी केंद्र सुरू करता येणार नाहीत. राज्य सरकार त्यासाठी सकारात्मक असले तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हमीभाव केंद्रासाठी वाढीव मुदतीचा निर्णय होण्याची गरज आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

-------