शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

हमीभाव केंद्र सुरू होताच बाजारात मक्याचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST

शेतकऱ्यांचे कोणतेही पीक उत्पादन बाजारात आले की दरात घसरण होते अन् बाजारात शेतकऱ्यांकडून आवक थांबली की दरात वाढ ...

शेतकऱ्यांचे कोणतेही पीक उत्पादन बाजारात आले की दरात घसरण होते अन् बाजारात शेतकऱ्यांकडून आवक थांबली की दरात वाढ होते. यामुळेच केंद्र सरकार काही शेती उत्पादने हमीभावाने खरेदी करते. ज्यावेळी बाजारात धान्याचे दर पडतील, त्यावेळी शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीचा उद्देश हमीभाव केंद्राचा आहे. मकाही हमीभावाने खरेदी केला जातो.

या महिन्यात मक्याचा बाजारात हमीभावापेक्षा दर खाली आल्याने जिल्ह्यात १० ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली. हमीभावाने मका खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील ५२५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. हमीभाव केंद्र सुरू होताच व्यापाऱ्यांनी मक्याचे दर हमीभावाप्रमाणे व त्यापेक्षा ५० रुपये अधिक केले आहेत. हमीभाव प्रति क्विंटल १८५० रुपये इतका असताना १९०० रुपयाने अडते मका खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले.

यामुळे नोंदणी केलेले शेतकरीही हमीभाव केंद्राकडे फिरकत नाहीत.

जिल्ह्यात सांगोला, अनगर, पंढरपूर, नातेपुते, मंगळवेढा, अकलूज, माळकवठे, बार्शी, करमाळा व कुर्डूवाडी या ठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

-----

११७ क्विंटल मका खरेदी

जिल्ह्यातील १० पैकी केवळ सांगोला येथे ९८ क्विंटल व नातेपुते येथे १७ क्विंटल मका खरेदी झाली आहे. इतर केंद्रांवर मका खरेदी झाली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाडीकर यांनी सांगितले.

----

हरभरा खरेदीचा आज शेवट दिवस

हरभरा खरेदीसाठी ६०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हरभऱ्याची बार्शी, मंगळवेढा व करमाळा येथे खरेदी सुरू आहे. येत्या २५ जूनपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपये आहे. बाजारात हरभरा ४,३०० ते ४,४०० रुपयाने विकला जात असल्याचे सांगण्यात आले.

-----