शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

बार्शीतील महात्मा फुले भाजी मंडई ग्राहकांसाठी खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:21 IST

२४ मार्च रोजी केंद्र सरकारने कोरोना काळात गर्दी होऊन संसर्ग वाढू नये, यासाठी टाळेबंदी घोषित केली. त्यानंतर राज्य सरकारनेही ...

२४ मार्च रोजी केंद्र सरकारने कोरोना काळात गर्दी होऊन संसर्ग वाढू नये, यासाठी टाळेबंदी घोषित केली. त्यानंतर राज्य सरकारनेही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाला तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतचे निर्णय घेण्यास सांगितले. त्यानुसार नगरपालिका व महसूल प्रशासनाने शहरातील दररोज गर्दी होणारे स्थळ म्हणून भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गेले आठ महिने शहरातील घोडे गल्ली येथील भाजी मंडई बंद होती.

शहरातील वेगवेगळ्या भागात भाजीविक्रेत्यांना भाजीविक्री करण्यास तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरून भाजी विकण्यास सांगितले होते. या आदेशाची अंमलबजावणी झाली, मात्र शहराच्या हद्दवाढ व विस्तारित भागात भाजीविक्रेते पोहोचत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. मात्र आता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली महात्मा फुले भाजी मंडई खुली झाल्यामुळे सर्व नागरिकांची सोय झाली आहे. तसेच अनेक भाजीविक्रेते जवळच्या रहदारीचा रस्त्यावरच ठाण मांडून बसत विक्री करीत होते. आता भाजी मंडई सुरू झाल्याने तेही तेथेच बसून विक्री करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी मंडई सुरू करावी, अशी मागणी समता परिषदेने केली होती.