शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गावांपाठोपाठ आता महाराष्ट्र निर्मलग्राम

By admin | Updated: July 10, 2014 01:22 IST

पृथ्वीराज चव्हाण: पुणे-पंढरपूर स्वच्छता दिंडीचा समारोप

पंढरपूर : देशात निर्मलग्राम अभियानात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लवकरच गावांपाठोपाठ संपूर्ण राज्य निर्मलग्राम होणार असून, याचा सर्वप्रथम मान कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार आहे. यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे ते पंढरपूर स्वच्छता दिंडी काढण्यात आली होती. स्वच्छता दिंंडी व ग्रामसभा दिंडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री आ. लक्ष्मणराव ढोबळे, आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, नगराध्यक्षा उज्वला भालेराव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. झेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सभापती पुष्पा जाधव, उपसभापती विष्णू बागल, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, माऊली हळवणकर, संतोष सुळे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड आदी उपस्थित होते.शौचालय बांधण्यासाठी शासन प्रत्येकाला ९१०० रूपये अनुदान देत आहे. निर्मलग्राम मध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकणात चांगली प्रगती आहे परंतू विदर्भ, मराठवाडा भागात चांगली स्थिती नाही, तेथे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लोककलेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पाणीपुरवठा व ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रभावी जनजागृतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला यश येत असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.पालकमंत्री सोपल म्हणाले, लोककलावंताच्या माध्यमातून या सोहळयातील भाविकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न लोककलावंत करतात. घर तेथे शौचालय हा कार्यक्रम शासनाचा न राहता तो लोक चळवळीतून उभारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण देशात महाराष्ट्राचा स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचा क्रमांक पहिला असून जलस्वराज्य टप्पा - २ साठी संपूर्ण देशात महाराष्ट्राची निवड जागतिक बॅकेने याच निकषावर केली असल्याचेही सोपल यांनी सांगितले.---------------------राज्याला तीन कोटींचा पुरस्कारग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले की, शासनाचे उपक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या दिंडीतील कलाकारांनी केलेले आहे. लोककला ही अतिशय प्रभावी माध्यम आहे. स्वच्छता अभियान व निर्मल अभियान यामध्ये राज्याचे देशात योगदान महत्वाचे आहे. यामुळे पंचायत राज्य व्यवस्थेचा ग्रामविकास विभागाला केंद्र शासनाचा ३ कोटी रुपयाचा पुरस्कार राज्याला मिळाला.