शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

गावांपाठोपाठ आता महाराष्ट्र निर्मलग्राम

By admin | Updated: July 10, 2014 01:22 IST

पृथ्वीराज चव्हाण: पुणे-पंढरपूर स्वच्छता दिंडीचा समारोप

पंढरपूर : देशात निर्मलग्राम अभियानात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लवकरच गावांपाठोपाठ संपूर्ण राज्य निर्मलग्राम होणार असून, याचा सर्वप्रथम मान कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार आहे. यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे ते पंढरपूर स्वच्छता दिंडी काढण्यात आली होती. स्वच्छता दिंंडी व ग्रामसभा दिंडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री आ. लक्ष्मणराव ढोबळे, आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, नगराध्यक्षा उज्वला भालेराव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. झेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सभापती पुष्पा जाधव, उपसभापती विष्णू बागल, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, माऊली हळवणकर, संतोष सुळे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड आदी उपस्थित होते.शौचालय बांधण्यासाठी शासन प्रत्येकाला ९१०० रूपये अनुदान देत आहे. निर्मलग्राम मध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकणात चांगली प्रगती आहे परंतू विदर्भ, मराठवाडा भागात चांगली स्थिती नाही, तेथे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लोककलेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पाणीपुरवठा व ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रभावी जनजागृतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला यश येत असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.पालकमंत्री सोपल म्हणाले, लोककलावंताच्या माध्यमातून या सोहळयातील भाविकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न लोककलावंत करतात. घर तेथे शौचालय हा कार्यक्रम शासनाचा न राहता तो लोक चळवळीतून उभारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण देशात महाराष्ट्राचा स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचा क्रमांक पहिला असून जलस्वराज्य टप्पा - २ साठी संपूर्ण देशात महाराष्ट्राची निवड जागतिक बॅकेने याच निकषावर केली असल्याचेही सोपल यांनी सांगितले.---------------------राज्याला तीन कोटींचा पुरस्कारग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले की, शासनाचे उपक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या दिंडीतील कलाकारांनी केलेले आहे. लोककला ही अतिशय प्रभावी माध्यम आहे. स्वच्छता अभियान व निर्मल अभियान यामध्ये राज्याचे देशात योगदान महत्वाचे आहे. यामुळे पंचायत राज्य व्यवस्थेचा ग्रामविकास विभागाला केंद्र शासनाचा ३ कोटी रुपयाचा पुरस्कार राज्याला मिळाला.