शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

महसुल विभाग राबविणार महाराजस्व अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:29 IST

चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. यामध्ये तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन व न्यायालय यात शेत रस्त्याचे तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. ...

चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. यामध्ये तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन व न्यायालय यात शेत रस्त्याचे तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. यात शेतकऱ्यांची होणारी अडचण, वाया जाणारा वेळ व पैसा, कायदा सुव्यवस्थेवर पडणारा ताण अशा अनेेक बाबींचा विचार करून वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार माळशिरस तहसील कार्यालयाने महाराजस्व अभियानांतंर्गत रस्ते तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.

रस्ते ही गावाची रक्तवाहिनी असून जेवढ रस्ते मजबूत तेवढे गावाच्या विकासाला गती येते शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी अधुनिक यंत्रसामुग्रीचा, वाहनांचा वापर केल्याशिवाय शेती करणे शक्य होत नाही व त्यासाठी अंतर्गत रस्ते फार महत्वाचा घटक आहे. परंतु याच रस्त्यांना अत्यंत हलाखीचे दिवस आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अतिक्रमित, बंंद रस्ते, शेत रस्ते, पानंद रस्ते, शिवार रस्ते अशा एकूण ६९ रस्त्यांचा प्रश्न हाती घेतला जाणार आहे. एकमेकांना क्षेत्र सरकवून देणे, बांधावरूण रस्ता तयार करणे किंवा सामंजस्याने रस्ता करणे अशा वेगवेगळ्या पर्यायांमधून तोडगा काढण्याच्या दृष्टीने तालुक्याचे लक्ष या अभियानाकडे लागले आहे.

तालुक्यात शेतातील रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपआपसातील वाद-विवाद सामंजस्याने मिटवून या अभियानात सहभाग नोंदवावा. याबाबतीत अधिक माहितीसाठी आपल्या मंडल अधिकारी अथवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी केले आहे.

या रस्त्यांचा समावेश

महाराजस्व अभियान

या योजनेत अंतर्गत सदाशिवनगर १३, नातेपुते १२, पिलीव १३, अकलूज ४, दहिगाव १०, इस्लामपूर १४, माळशिरस ३ या ७ मंडलमधील ३५ गावांच्या हद्दीतील ६९ रस्त्यांचा सामावेश करण्यात आला आहे. यामध्ये बहुतांश रस्ते बारा, पंधरा व वीस फूट रुंदीचे असून यातील अनेक रस्त्यांवर शेती, झाडे-झुडपे, रस्ता उचकटलेला असणे, अरुंद रस्ता, शोषखड्डा, जनावरे, पावसामुळे नुकसान, झालेले अशा वेगवेगळ्या कारणांनी अतिक्रमित अथवा बंद असलेल्या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्याच्या माध्यमातून अंदाजे २ हजार ५१८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.