शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

चार कोटींचे नुकसान ; त्वरित पंचनामे सुरू बागा भुईसपाट

By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST

खंडाळी, पापरी परिसरात वादळी वारा-गारपिटीचा फटका

मोहोळ : २७ मे रोजी दुपारी चार वाजता अचानक आलेल्या वादळी वार्‍यासह गारपिटीत मोहोळ तालुक्यातील खंडाळी, पापरी परिसरात सुमारे ४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या गारपिटीमुळे झालेल्या पडझडीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर सुरू केले आहे. तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या़ आहेत़ वादळी वार्‍यास गारपिटीने घातलेल्या हैदोसात खंडाळी, पापरी परिसरातील सुमारे २०० घरांवरील पत्रे उडून गेले तर केळीच्या बागांसह वीज वितरण कंपनीचे ५०० पोल निकामी झाले. यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वीज कंपनीचे २५ ते ३० कर्मचारी विद्युत खांब दुरुस्त करण्याचे काम करीत असून, खांब कमी पडत असल्याने कामात व्यत्यय येत आहे. मोहोळ तालुक्याला यावर्षी निसर्गाने दगा देत फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीत सुमारे ४५ कोटींचे नुकसान झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना महसूल व कृषी विभागाने रात्रीचा दिवस करीत गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करून सुमारे ३० कोटी रुपयांचे वाटप केले. उर्वरित अनुदानापैकी १७ कोटी पुन्हा आले असून, त्याचेही वाटप चालू असताना २७ मे रोजी खंडाळी-पापरी या दोन गावांसह अन्य गावात जोरदार वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीने कहर केला. एक तासाच्या या गारपिटीने खंंडाळी व पापरी परिसरातील सुमारे २०० घरांवरील पत्रे उडाले तर केळीच्या बागा, शेवग्याची शेती उद्ध्वस्त झाली. राजेंद्र जगन्नाथ मुळे यांची चार एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली तर रोशन नारायण जगताप (वय ८०) या वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड पडल्याने तिच्या पायाला जखम झाली. महेश जनार्दन मुळे यांची साडेचार एकराची केळीची बाग गारांचा मार्‍यामुळे जमीनदोस्त झाली.

-----------------

वीज वितरणचे मोठे नुकसान

खंडाळी, पापरी परिसरातील अन्य गावात झालेल्या वादळी वार्‍यात वीज वितरण कंपनीचे सुमारे ५०० खांब निकामी झाले. त्यामध्ये १६८ खांब मोडले तर १०६ खांब वाकले आहेत. १७८ खांबांवरील तारा तुटल्या आहेत. यामुळे तीन हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. २५ ते ३० कर्मचार्‍यांच्या मदतीने पोल उभे करण्याचे काम सुरू आहे. नवीन खांब कमी पडत असल्याने कामात व्यत्यय येत आहे. नवीन खांब उपलब्ध झाले तरी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागेल, असे वीज वितरण विभागाचे सहा़ अभियंता संजय शिंदे यांनी सांगितले.