शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शेतीची कामे पूर्वपदावर येत असताना पुन्हा बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST

वांगी नं. १ व बिटरगाव शिवारात वावरत असलेल्या बिबट्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागास वारंवार कळवूनही ते दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ...

वांगी नं. १ व बिटरगाव शिवारात वावरत असलेल्या बिबट्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागास वारंवार कळवूनही ते दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार होत आहे. १८ डिसेंबर रोजी वनविभागाच्या कारवाईत तिघांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर वांगी, बिटरगाव, चिखलठाण, शेटफळ या परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असताना व १५ दिवसापासून खोळंबून राहिलेली शेतीची कामे व गावातील दैनंदिन जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते. दरम्यान, २२ डिसेंबर रोजी वांगी नं. १ येथे धनाजी देशमुख यांना सायंकाळी ६.३० वाजता शेतीत ट्रॅक्टरद्वारे मशागत सुरू असताना ट्रॅक्टर उजेडात बिबट्या दिसला. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी वांगी नं. १ येथेच मयूर जाधव यांच्या वस्तीवर पाळीव चार श्वानांवर हल्ला करून ठार मारले.

२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजता बिटरगाव येथे रामा रोडगे यांच्या केळीच्या बागेजवळ शोभा सरडे व रामा रोडगे यांना तो वावरत असताना दिसून आला. त्यापूर्वी सकाळी वांगी नं. १ येथे गॅस गोडावूनमधून गॅस टाक्या वाटप करणारऱ्या कामगारास त्याने दर्शन दिले. एक बिबट्या मारल्यानंतर दुसरा बिबट्या वारंवार वांगी नं. १ व बिटरगाव शिवारात दिसून येत असल्याने शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत. शेतीची कामे पुन्हा ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. शेतात पिकांना पाणी द्यायला व खुरपणी करायला शेतकरी चार ते पाच जणांच्या टोळीने जात आहेत तर जनावरांच्या गोठ्याला रात्रभर राखण करावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मादी बिबट्या शरीराने जाडजूड

वांगी नं. १ व बिटरगाव येथे दिसून आलेला बिबट्या मारला गेला. तो नरभक्षक बिबट्यापेक्षा खूपच जाड असल्याचे प्रत्यक्षदर्शी धनाजी देशमुख व रामा रोडगे यांनी सांगितले. ज्या ज्या वेळी तो दिसला त्याने अद्यापपर्यंत तरी कोणत्याही मनुष्य प्राण्यावर हल्ला केलेला नाही. केवळ पशूंवर हल्ला केला आहे. त्यामुळे हल्ला करण्याची वाट कशाला पाहायची, त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी बिटरगावचे महेंद्र पाटील यांनी केली.