शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
3
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
4
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
5
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
6
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
7
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
8
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
9
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
10
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
11
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
12
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
13
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
14
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
15
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!
16
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
17
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
18
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
19
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
20
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!

बिबट्या भुकेला.. वासराचा पाडला फडशा; गाय बेशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST

नरभक्षक बिबट्याने तालुक्‍यात तीन माणसांचे जीव घेतले आहेत. माणसाच्या रक्ताला चटाविलेल्या बिबट्याला मात्र ७ डिसेंबरपासून माणसावर हल्ला करणे शक्‍य ...

नरभक्षक बिबट्याने तालुक्‍यात तीन माणसांचे जीव घेतले आहेत. माणसाच्या रक्ताला चटाविलेल्या बिबट्याला मात्र ७ डिसेंबरपासून माणसावर हल्ला करणे शक्‍य न झाल्याने त्याने वांगी (भिवरवाडी) भागातील गाय व वासरावर हल्ला करून आपली भूक भागविली. चिखलठाण व बिटरगाव (वांगी) या दोन ठिकाणी येऊनही शार्पशूटरचा नेम चुकल्याने तो मोकाट सुटला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याचे सांगवी, बिटरगाव व भिवरवाडी परिसरात त्याचे वास्तव्य आहे. सांगवीतील महिलेवर हल्ला केल्यानंतर तो बिटरगाव शिवारात विठ्ठल रोडगे यांच्या शेतात दिसला. तीन शार्पशुटरच्या मदतीला आता आणखी एक बारामतीहून खासगी शार्पशुटरला पाचारण केल्याचे वनविभाकडून स्पष्ट करण्यात आले.

सोमवारी (दि.१४) पहाटे भिवरवाडी येथील गोरख आरकिले यांच्या वस्तीवर बिबट्याने गाय व वासरावर हल्ला केला. यामध्ये या दोन्ही प्राण्यांच्या नरड्याच्या भागावर चावा घेऊन प्रथम त्यांना मारण्याचा प्रयत्न केला व नंतर लहान वासराचा फडशा पाडला. माणसाच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने सात-आठ दिवसांत माणसाची शिकार न मिळाल्याने शेतातील गोठ्यात असलेल्या जनावरावर हल्ला करून ठार मारल्याने दहशतीच्या सावटाखाली आहेत. रविवारी ढोकरी हद्दीतील भानुदास सलगर यांच्या शेतात बिबट्या खात्रीने आहे, असे लोक सांगत असतानाही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

-----

वनविभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

सोमवारी पहाटे कुत्रे मोठ्याने भुंकत होती. त्याच सुमारास गाय गोठ्यात धडपड असल्याचा आवाजही आला. मात्र भीतीने आम्ही बाहेर आलो नाही. आम्हाला बिबट्या असल्याची शंका आली होती. त्यादरम्यान वनविभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झाला नाही. वनविभागाला बिबट्याचे काही गांभीर्य दिसत नाही, असा आरोप भिवरवाडीचे रहिवासी अनिल आरकिले यांनी केला आहे.

---------

बिबट्या पसार होतोच कसा?

बिबट्याकडून आणखी एक जीवघेणा हल्ला होण्याची वाट वनविभाग पाहत आहे काय? असा सवाल अंगद देवकते यांनी केला आहे. उजनी भागासह जनावरे दावणीला, शेतीला पाणी देणे, ऊसतोड, तूर काढणी शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईस जबाबदार कोण? शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सारी यंत्रणा कामाला असताना बिबट्या तब्बल चारवेळा कसा पसार होतो? असा प्रश्न देवकते यांनी केला.