शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या भुकेला.. वासराचा पाडला फडशा; गाय बेशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST

नरभक्षक बिबट्याने तालुक्‍यात तीन माणसांचे जीव घेतले आहेत. माणसाच्या रक्ताला चटाविलेल्या बिबट्याला मात्र ७ डिसेंबरपासून माणसावर हल्ला करणे शक्‍य ...

नरभक्षक बिबट्याने तालुक्‍यात तीन माणसांचे जीव घेतले आहेत. माणसाच्या रक्ताला चटाविलेल्या बिबट्याला मात्र ७ डिसेंबरपासून माणसावर हल्ला करणे शक्‍य न झाल्याने त्याने वांगी (भिवरवाडी) भागातील गाय व वासरावर हल्ला करून आपली भूक भागविली. चिखलठाण व बिटरगाव (वांगी) या दोन ठिकाणी येऊनही शार्पशूटरचा नेम चुकल्याने तो मोकाट सुटला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याचे सांगवी, बिटरगाव व भिवरवाडी परिसरात त्याचे वास्तव्य आहे. सांगवीतील महिलेवर हल्ला केल्यानंतर तो बिटरगाव शिवारात विठ्ठल रोडगे यांच्या शेतात दिसला. तीन शार्पशुटरच्या मदतीला आता आणखी एक बारामतीहून खासगी शार्पशुटरला पाचारण केल्याचे वनविभाकडून स्पष्ट करण्यात आले.

सोमवारी (दि.१४) पहाटे भिवरवाडी येथील गोरख आरकिले यांच्या वस्तीवर बिबट्याने गाय व वासरावर हल्ला केला. यामध्ये या दोन्ही प्राण्यांच्या नरड्याच्या भागावर चावा घेऊन प्रथम त्यांना मारण्याचा प्रयत्न केला व नंतर लहान वासराचा फडशा पाडला. माणसाच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने सात-आठ दिवसांत माणसाची शिकार न मिळाल्याने शेतातील गोठ्यात असलेल्या जनावरावर हल्ला करून ठार मारल्याने दहशतीच्या सावटाखाली आहेत. रविवारी ढोकरी हद्दीतील भानुदास सलगर यांच्या शेतात बिबट्या खात्रीने आहे, असे लोक सांगत असतानाही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

-----

वनविभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

सोमवारी पहाटे कुत्रे मोठ्याने भुंकत होती. त्याच सुमारास गाय गोठ्यात धडपड असल्याचा आवाजही आला. मात्र भीतीने आम्ही बाहेर आलो नाही. आम्हाला बिबट्या असल्याची शंका आली होती. त्यादरम्यान वनविभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झाला नाही. वनविभागाला बिबट्याचे काही गांभीर्य दिसत नाही, असा आरोप भिवरवाडीचे रहिवासी अनिल आरकिले यांनी केला आहे.

---------

बिबट्या पसार होतोच कसा?

बिबट्याकडून आणखी एक जीवघेणा हल्ला होण्याची वाट वनविभाग पाहत आहे काय? असा सवाल अंगद देवकते यांनी केला आहे. उजनी भागासह जनावरे दावणीला, शेतीला पाणी देणे, ऊसतोड, तूर काढणी शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईस जबाबदार कोण? शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सारी यंत्रणा कामाला असताना बिबट्या तब्बल चारवेळा कसा पसार होतो? असा प्रश्न देवकते यांनी केला.