शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

विधानसभा म्हणजे जबरदस्त युद्ध !

By admin | Updated: June 22, 2014 00:53 IST

सुशीलकुुमार शिंदे यांचे आवाहन : पराभव विसरा; पुन्हा जोमाने कामाला लागा

सोलापूर : लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाची उणीदुणी न काढता गट-तट विसरून काँग्रेसी सत्ता कायम ठेवण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागले पाहिजे. येणारी विधानसभा आपल्यासाठी जबरदस्त युद्ध आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस भवन येथे बोलावण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप माने, आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, सभागृह नेते महेश कोठे, सुधीर खरटमल, धर्मा भोसले, विश्वनाथ चाकोते, महिला आघाडी अध्यक्ष ज्योती वाघमारे, साधना उगले, अशोक कलशेट्टी, माजी खासदार धर्मण्णा सादूल, सुमन जाधव आदी ज्येष्ठ नेते, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, मी निवडून येणार या विश्वासावर कार्यकर्ते घराबाहेर पडले नाहीत. घराघरांत जो संपर्क साधायला हवा होता तो साधता आला नाही; मात्र या सर्व गोष्टींची उणीदुणी काढत बसण्यात आता अर्थ नाही. एकेकाळी इंदिरा गांधी यांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्या डगमगल्या नाहीत, त्यामुळे माझ्या पराभवाची चर्चा करू नका, झाले गेले विसरून जावा. पराभव झाला म्हणून घाबरू नका, अजूनही वेळ गेली नाही. सर्वांनी मनात आणले तर मी आता पराभव बघणार नाही. सोलापूर हे माझे गाव आहे, त्याला सोडून मी कधीही जाणार नाही. सहकारी रागाच्या भरात काही बोलतात तसे करू नका, एकमेकांतील मतभेद विसरून एकत्र या. काँग्रेस ही आठरा पगड समाजाला एकत्र करून देश चालवते. काँग्रेस प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक गावात पोहोचली पाहिजे. येणारी विधानसभा म्हणजे जबरदस्त युद्ध आहे, या निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागले पाहिजे, असे आवाहन शिंदे यांनी केले. गेल्या ४० वर्षांच्या राजकारणात मला खूप काही बघायला मिळाले आहे. जय-पराजय या गोष्टी चालत राहणार आहेत. आता खऱ्या अर्थाने काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळींनी थोडे बाजूला झाले पाहिजे. तरुणांना संधी द्या, त्यांना मार्गदर्शन करा. पदे कुणाला मिळतात कुणाला नाही, त्यावर नाराज होऊ नका. मी आता शांत बसणार नाही, पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो आहे, तुम्हीसुद्धा याच पद्धतीने काम करा, असेही यावेळी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. --------------सोशल मीडियाचा गैरवापरसध्या इंटरनेटच्या माध्यमातून वाढणारा सोशल मीडियाचा वापर चुकीच्या कामासाठी केला जात आहे. महापुरुषांचे विद्रुपीकरण करून सामाजिक भावना दुखावल्या जात आहेत. भारत सरकारने या व्हॉट्स अप, इंटरनेटवर बंदी घातली पाहिजे, असे यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले. ----------------विकासकामे पोहचवाकाँग्रेस सरकारने जनतेच्या हितासाठी अन्नसुरक्षा योजना, राजीव गांधी आरोग्य योजना यासारख्या अनेक योजना सुरू केल्या होत्या; मात्र त्या तळागाळापर्यंत म्हणाव्या तशा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे यंदा काँग्रेसला अपयश आले आहे, अशी खंतही यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा, असे ते म्हणाले.