शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पराभवातून खूप काही शिकलो

By admin | Updated: May 31, 2014 13:11 IST

लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असून, पराभवातून आम्ही खूप काही शिकलो.

सांगोला : लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असून, पराभवातून आम्ही खूप काही शिकलो. निवडणुकीत यश-अपयश येतच असते, म्हणून निवडून आलेल्या सरकारने हुरळून जाऊ नये, असे सांगून आम्ही अपयश आले म्हणून खचून जाणार नाही. या निवडणुकीत जनतेने स्थैर्याच्या बाजूने कौल दिला. आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी करून लढविणार असल्याचे सूतोवाच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. खासगी दौर्‍यानिमित्त सांगोल्यात आले असता ते बोलत होते. काँग्रेस व आम्ही यापूर्वी १९७७ व १९९५ साली पराभव पाहिला आहे. १९७७ नंतर दोन वर्षांतच जनतेने परत आम्हाला संधी दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात जनतेने कौल देताना देशाच्या स्थैर्यासाठी भाजपाला साथ दिली. मात्र तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश व ओडिशा येथे मात्र जनतेने सक्षम पर्याय म्हणून राज्यातील घटक पक्षास मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले. आगामी विधानसभेच्या निवडणुका एकत्रितच लढविणार असून कोणाला किती जागा याविषयी अद्याप निर्णय झाला नाही. देशात जनतेने स्थौर्याला संधी दिली आहे. एखादी विचारधारा किंंवा लाटेचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले. स्मृती इराणी अन् काँग्रेसला सल्ला लोकांचा आदर करणे, पराभवाची कारणेमीमांसा शोधून पुन्हा आत्मविश्वासाने कामाला लागणे गरजेचे आहे. नव्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक मुद्द्यावरुन काँग्रेसने विनाकारण वादात पडू नये. संबंधित मंत्र्याची अगोदर कामगिरी पहावी आणि मगच त्या विषयावर आपले मत प्रकट करावे, असे म्हणत पवारांनी काँग्रेसला सल्ला दिला. यावेळी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. भारत भालके, मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, आ. बबनराव शिंंदे, आ. दीपक साळुंखे, माजी आ. सुधाकरपंत परिचारक उपस्थित होते.

--------------------------------

मोदींचे कौतुक ४पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२ वर्षे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिल्याने त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, देशाची सूत्रे हलविताना अडचण येणार आहे, असे म्हणत त्यांनी मोदींचे कौतुकच केले.