शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पराभवातून खूप काही शिकलो

By admin | Updated: May 31, 2014 13:11 IST

लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असून, पराभवातून आम्ही खूप काही शिकलो.

सांगोला : लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असून, पराभवातून आम्ही खूप काही शिकलो. निवडणुकीत यश-अपयश येतच असते, म्हणून निवडून आलेल्या सरकारने हुरळून जाऊ नये, असे सांगून आम्ही अपयश आले म्हणून खचून जाणार नाही. या निवडणुकीत जनतेने स्थैर्याच्या बाजूने कौल दिला. आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी करून लढविणार असल्याचे सूतोवाच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. खासगी दौर्‍यानिमित्त सांगोल्यात आले असता ते बोलत होते. काँग्रेस व आम्ही यापूर्वी १९७७ व १९९५ साली पराभव पाहिला आहे. १९७७ नंतर दोन वर्षांतच जनतेने परत आम्हाला संधी दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात जनतेने कौल देताना देशाच्या स्थैर्यासाठी भाजपाला साथ दिली. मात्र तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश व ओडिशा येथे मात्र जनतेने सक्षम पर्याय म्हणून राज्यातील घटक पक्षास मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले. आगामी विधानसभेच्या निवडणुका एकत्रितच लढविणार असून कोणाला किती जागा याविषयी अद्याप निर्णय झाला नाही. देशात जनतेने स्थौर्याला संधी दिली आहे. एखादी विचारधारा किंंवा लाटेचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले. स्मृती इराणी अन् काँग्रेसला सल्ला लोकांचा आदर करणे, पराभवाची कारणेमीमांसा शोधून पुन्हा आत्मविश्वासाने कामाला लागणे गरजेचे आहे. नव्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक मुद्द्यावरुन काँग्रेसने विनाकारण वादात पडू नये. संबंधित मंत्र्याची अगोदर कामगिरी पहावी आणि मगच त्या विषयावर आपले मत प्रकट करावे, असे म्हणत पवारांनी काँग्रेसला सल्ला दिला. यावेळी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. भारत भालके, मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, आ. बबनराव शिंंदे, आ. दीपक साळुंखे, माजी आ. सुधाकरपंत परिचारक उपस्थित होते.

--------------------------------

मोदींचे कौतुक ४पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२ वर्षे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिल्याने त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, देशाची सूत्रे हलविताना अडचण येणार आहे, असे म्हणत त्यांनी मोदींचे कौतुकच केले.