शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

गाळपात अनेक कारखान्यांची आघाडी; पण पहिली उचल देण्यात पिछाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:38 IST

जिल्ह्यात ऊस गाळप करण्यात व पहिली उचल देण्यात विठ्ठलराव शिंदे कारखाना तर मोहोळ तालुक्यात ऊस गाळपात २ लाख ...

जिल्ह्यात ऊस गाळप करण्यात व पहिली उचल देण्यात विठ्ठलराव शिंदे कारखाना तर मोहोळ तालुक्यात ऊस गाळपात २ लाख टनांचा टप्पा पार करून लोकनेते शुगरने आघाडी घेतली आहे. टाकळी सिकंदर येथील भीमा कारखान्याने गाळप कमी केले तरी प्रतिटन २ हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल दिली आहे.

साखर कारखाने चालू होऊन दोन महिने झाले तरी अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी किती आहे आणि आपण पहिली उचल किती देणार हे अद्याप स्पष्ट केले नाही. जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने आजअखेर ५ लाख ८० हजार मेट्रिक टन गाळप करून पहिली उचल प्रति टन २ हजार रुपये दिली. श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्याने ३ लाख १८ हजार टन गाळप करून पहिली उचल प्रतिटन २,१०० रुपये जाहीर करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. मोहोळ तालुक्यातील अनगरच्या लोकनेते कारखान्याचे २ लाख ४६ हजार टन गाळप झाले असून, पहिली उचल प्रतिटन १,८०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा केली. वटवटे येथील जकराया शुगरने आतापर्यंत १ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप केले; मात्र पहिली उचल अद्याप जाहीर केली नाही. टाकळी सिकंदर येथील भीमा कारखान्याने ५६ हजार टन ऊस गाळप केला असून, पहिली उचल २ हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे.

कचरेवाडी येथील युटोपीयन कारखान्याने २ लाख २० हजार टन गाळप केले असून, प्रतिटन १,७०० रुपयांप्रमाणे पहिली उचल जाहीर करून बँक खात्यात जमा केली आहे. सिद्धेश्वर कारखाना व तिर्हे येथील सिद्धनाथ कारखान्यानेही दोन लाखांहून अधिक मेट्रिक टन ऊस गाळप केले असले तरी अद्यापही पहिली उचल जाहीर केली नाही . यामुळे ऊस लागवडीपासून ऊस तोडणी होईपर्यंत १५ महिने जिवापाड जपलेल्या उसाला दर किती मिळतो, याची शेतकऱ्यांना अजूनही वाट पाहावी लागत आहे.