शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ग्रामपंचायतीतून घडले तिघांचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:23 IST

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून एकच धुरळा उडाला आहे. अनेकांना गावकारभारी होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अनेक ...

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून एकच धुरळा उडाला आहे. अनेकांना गावकारभारी होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अनेक युक्त्या-प्रयुक्त्या लढवल्या जात आहेत.

यापूर्वीही जिल्ह्यात अनेकांचे नेतृत्व बहरले आहे. अकलूजचे विजयसिंह मोहिते-पाटील यांचा ग्रामपंचायतीचे सरपंच, आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे.

स्व. आनंदराव देवकते यांनी सरपंचपदापासून सुरू केलेला प्रवास मंत्रिपदापर्यंत नेला. करमाळ्याचे स्व. दिगंबरराव बागल यांनी मांगी गावातून सुरू केलेला प्रवास मंत्रिपदापर्यंत पोहोचला. या काळात त्यांनी तालुक्यात कारखान्याच्या रूपाने सहकार क्षेत्राचे जाळे विणले.

अशी आणखीही आमदारपदापर्यंतचा प्रवास करणाऱ्यांमध्ये माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, संजयमामा शिंदे या दोन्ही बंधूद्वयांनी सरपंचपदापासून राजकारणात प्रवेश केला. पुढे पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद अशी मुसाफिरी केली. साखर कारखान्याच्या रूपाने नंदनवन करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

गावपातळीवर काम करून चुणूक दाखविण्याची संधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधून मिळते. गावपातळीपासून केलेला संघर्ष आणि नेतृत्व यातून तावून सुुलाखून निघण्याची हीच ती संधी असते.

सध्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येकाचा जो आटापिटा चालला आहे, तो याचसाठी म्हणावा लागेल.

——————————————————————-

असे घडले नेतृत्व

विजयसिंह मोहिते-पाटील

गावपातळी ते राज्य पातळीवर राजकीय जीवनाची यशस्वी वाटचाल करणारे विजयसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय कारकीर्द १९६९ साली स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सुरू झाली. अकलूज ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड होऊन ते सरपंचपदी आरूढ झाले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, १९८० साली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार झाले. पुढे उपमुख्यमंत्र्यांपासून विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

————————-

स्व. दिगंबरराव बागल

मांगी (ता. करमाळा) या गावचे सलग दहा वर्षे सरपंचपद भूषविलेले स्व. दिगंबरराव बागल जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती बनले. त्यानंतर दोन टर्म आमदार व थेट राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कोणताही राजकीय वारसा नसताना प्रतिकूल परस्थितीमध्ये मांगी गावचे दोनवेळा सरपंचपद उपभोगले. दुसऱ्या टर्ममध्ये २००० ते २००४ कालावधीमध्ये आमदार व राज्याच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. तालुक्यातील पश्चिम भागात अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न सोडविण्यासाठी अवघ्या आठ महिन्यांत मकाई सह. साखर कारखान्याची उभारणी केली. २००५ मध्ये दिगंबरराव बागल यांचे निधन झाले.

————

स्व. आनंदराव देवकते

दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या राजूरसारख्या छोट्या गावातून सरपंचपदाची निवडणूक लढवून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर उपसभापती, आमदार, राज्य भू-विकास बँकेचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली. गावाची नाळ मात्र त्यांनी अखेरपर्यंत तुटू दिली नाही. तब्बल ३५ वर्षे ते राजकारणात टिकून राहिले. त्यामागे राजकारणातील ग्रामपंचायतीच्या कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले.

——————-

महाराष्ट्रातला ५० टक्के भाग ग्रामपंचायतींवर अवलंबून

ग्रामीण महाराष्ट्रात ५० टक्के भाग हा ग्रामपंचायतींवर अवलंबून आहे. राज्यातील ४३ हजार खेड्यांचा कारभार हा २८ हजार सरपंच पाहतात. ग्रामीण भागातील आर्थिक जडणघडण ही देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण व उच्च शिक्षितांचा सहभाग बघता महाराष्ट्राचे भवितव्य भविष्यात अधिक उत्कृष्ट असेल असे मला वाटते, असे मत अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

--------