शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

जिल्ह्यात ग्रामपंचायतीतून घडले तिघांचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:23 IST

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून एकच धुरळा उडाला आहे. अनेकांना गावकारभारी होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अनेक ...

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून एकच धुरळा उडाला आहे. अनेकांना गावकारभारी होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अनेक युक्त्या-प्रयुक्त्या लढवल्या जात आहेत.

यापूर्वीही जिल्ह्यात अनेकांचे नेतृत्व बहरले आहे. अकलूजचे विजयसिंह मोहिते-पाटील यांचा ग्रामपंचायतीचे सरपंच, आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे.

स्व. आनंदराव देवकते यांनी सरपंचपदापासून सुरू केलेला प्रवास मंत्रिपदापर्यंत नेला. करमाळ्याचे स्व. दिगंबरराव बागल यांनी मांगी गावातून सुरू केलेला प्रवास मंत्रिपदापर्यंत पोहोचला. या काळात त्यांनी तालुक्यात कारखान्याच्या रूपाने सहकार क्षेत्राचे जाळे विणले.

अशी आणखीही आमदारपदापर्यंतचा प्रवास करणाऱ्यांमध्ये माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, संजयमामा शिंदे या दोन्ही बंधूद्वयांनी सरपंचपदापासून राजकारणात प्रवेश केला. पुढे पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद अशी मुसाफिरी केली. साखर कारखान्याच्या रूपाने नंदनवन करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

गावपातळीवर काम करून चुणूक दाखविण्याची संधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधून मिळते. गावपातळीपासून केलेला संघर्ष आणि नेतृत्व यातून तावून सुुलाखून निघण्याची हीच ती संधी असते.

सध्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येकाचा जो आटापिटा चालला आहे, तो याचसाठी म्हणावा लागेल.

——————————————————————-

असे घडले नेतृत्व

विजयसिंह मोहिते-पाटील

गावपातळी ते राज्य पातळीवर राजकीय जीवनाची यशस्वी वाटचाल करणारे विजयसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय कारकीर्द १९६९ साली स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सुरू झाली. अकलूज ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड होऊन ते सरपंचपदी आरूढ झाले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, १९८० साली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार झाले. पुढे उपमुख्यमंत्र्यांपासून विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

————————-

स्व. दिगंबरराव बागल

मांगी (ता. करमाळा) या गावचे सलग दहा वर्षे सरपंचपद भूषविलेले स्व. दिगंबरराव बागल जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती बनले. त्यानंतर दोन टर्म आमदार व थेट राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कोणताही राजकीय वारसा नसताना प्रतिकूल परस्थितीमध्ये मांगी गावचे दोनवेळा सरपंचपद उपभोगले. दुसऱ्या टर्ममध्ये २००० ते २००४ कालावधीमध्ये आमदार व राज्याच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. तालुक्यातील पश्चिम भागात अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न सोडविण्यासाठी अवघ्या आठ महिन्यांत मकाई सह. साखर कारखान्याची उभारणी केली. २००५ मध्ये दिगंबरराव बागल यांचे निधन झाले.

————

स्व. आनंदराव देवकते

दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या राजूरसारख्या छोट्या गावातून सरपंचपदाची निवडणूक लढवून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर उपसभापती, आमदार, राज्य भू-विकास बँकेचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली. गावाची नाळ मात्र त्यांनी अखेरपर्यंत तुटू दिली नाही. तब्बल ३५ वर्षे ते राजकारणात टिकून राहिले. त्यामागे राजकारणातील ग्रामपंचायतीच्या कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले.

——————-

महाराष्ट्रातला ५० टक्के भाग ग्रामपंचायतींवर अवलंबून

ग्रामीण महाराष्ट्रात ५० टक्के भाग हा ग्रामपंचायतींवर अवलंबून आहे. राज्यातील ४३ हजार खेड्यांचा कारभार हा २८ हजार सरपंच पाहतात. ग्रामीण भागातील आर्थिक जडणघडण ही देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण व उच्च शिक्षितांचा सहभाग बघता महाराष्ट्राचे भवितव्य भविष्यात अधिक उत्कृष्ट असेल असे मला वाटते, असे मत अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

--------