शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

मराठा समाजातील नेते मंडळीचाच मराठा आरक्षणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:42 IST

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मराठा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे गायकवाड आयोगाने स्पष्ट केले आहे. ...

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मराठा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे गायकवाड आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हे आरक्षण देऊन टिकवले सुद्धा होते मात्र सध्याच्या ठाकरे सरकारने योग्य पद्धतीने समाजाची बाजू सर्वोच्च न्यायालयात न मांडल्यामुळे या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. देशातील इतर राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा पुढे गेलेले आरक्षण मंजूर करून न्यायालयातही टिकलेले आहे. मात्र न्यायालयीन कामकाजात जाणीवपूर्वक सरकारकडून केली जाणारी दिरंगाई यामुळेच हे आरक्षण लांबणीवर पडले आहे.

केंद्र सरकारने आर्थिक निकषावर दिलेले दहा टक्के आरक्षण हे देशातील सुमारे ३०० जातींना समाविष्ट करणारे आहे. यामुळे या आरक्षणाचा मराठा समाजाला झिरो पॉईंट झिरो एक टक्के सुद्धा फायदा होणार नाही. केवळ दिशाभूल करण्यासाठी मराठा समाजातील नेते मंडळी हे आरक्षण स्वीकारण्यास तयार झालेले आहेत.

खऱ्या अर्थाने सर्वांना समान आरक्षण मिळायचे असेल तर जातिनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. मात्र सरकार या जनगणनेला बगल देत आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, आरपीआयसह सर्व पक्ष एकत्रित करीत असताना सुद्धा आरक्षण मिळत नाही हे सुद्धा एक गौडबंगाल आहे. या विषयावर राजकारण करणाऱ्या मंडळींना हा विषय सातत्याने चर्चित ठेवून आपल्या मताच्या बँका मजबूत करायच्या आहेत.

त्यासाठी हा मराठा आरक्षणाचा विषय प्रत्येक तरुणाने समजावून घेऊन या लढ्यात सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एकंदरीतच सत्ताधाऱ्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला राजकीय तोटा दिसत असल्यामुळे हा विषय प्रलंबित ठेवला जातो काय अशी शंका व्यक्त केली जात असल्याचे कोकाटे म्हणाले.

---

अडसर ठरणारी मंडळी बाजूला काढा

आरक्षणाच्या लढ्याला अडचण ठरणारे वर्षानुवर्ष पै पाहुण्यांचे राजकारण करून सत्ता हस्तगत करणारी नेते मंडळी खड्यासारखी या प्रक्रियेतून बाजूला काढली पाहिजे.

मराठा आरक्षण हे मिळालेले आहे केवळ त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आहे ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारनी दर्जेदार अभ्यासू वकिलांची फौज सर्वोच्च न्यायालयात उभी करून मराठा समाजाला न्याय देणे गरजेचे आहे.