शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजातील नेते मंडळीचाच मराठा आरक्षणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:42 IST

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मराठा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे गायकवाड आयोगाने स्पष्ट केले आहे. ...

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मराठा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे गायकवाड आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हे आरक्षण देऊन टिकवले सुद्धा होते मात्र सध्याच्या ठाकरे सरकारने योग्य पद्धतीने समाजाची बाजू सर्वोच्च न्यायालयात न मांडल्यामुळे या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. देशातील इतर राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा पुढे गेलेले आरक्षण मंजूर करून न्यायालयातही टिकलेले आहे. मात्र न्यायालयीन कामकाजात जाणीवपूर्वक सरकारकडून केली जाणारी दिरंगाई यामुळेच हे आरक्षण लांबणीवर पडले आहे.

केंद्र सरकारने आर्थिक निकषावर दिलेले दहा टक्के आरक्षण हे देशातील सुमारे ३०० जातींना समाविष्ट करणारे आहे. यामुळे या आरक्षणाचा मराठा समाजाला झिरो पॉईंट झिरो एक टक्के सुद्धा फायदा होणार नाही. केवळ दिशाभूल करण्यासाठी मराठा समाजातील नेते मंडळी हे आरक्षण स्वीकारण्यास तयार झालेले आहेत.

खऱ्या अर्थाने सर्वांना समान आरक्षण मिळायचे असेल तर जातिनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. मात्र सरकार या जनगणनेला बगल देत आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, आरपीआयसह सर्व पक्ष एकत्रित करीत असताना सुद्धा आरक्षण मिळत नाही हे सुद्धा एक गौडबंगाल आहे. या विषयावर राजकारण करणाऱ्या मंडळींना हा विषय सातत्याने चर्चित ठेवून आपल्या मताच्या बँका मजबूत करायच्या आहेत.

त्यासाठी हा मराठा आरक्षणाचा विषय प्रत्येक तरुणाने समजावून घेऊन या लढ्यात सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एकंदरीतच सत्ताधाऱ्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला राजकीय तोटा दिसत असल्यामुळे हा विषय प्रलंबित ठेवला जातो काय अशी शंका व्यक्त केली जात असल्याचे कोकाटे म्हणाले.

---

अडसर ठरणारी मंडळी बाजूला काढा

आरक्षणाच्या लढ्याला अडचण ठरणारे वर्षानुवर्ष पै पाहुण्यांचे राजकारण करून सत्ता हस्तगत करणारी नेते मंडळी खड्यासारखी या प्रक्रियेतून बाजूला काढली पाहिजे.

मराठा आरक्षण हे मिळालेले आहे केवळ त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आहे ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारनी दर्जेदार अभ्यासू वकिलांची फौज सर्वोच्च न्यायालयात उभी करून मराठा समाजाला न्याय देणे गरजेचे आहे.